शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

जिल्ह्यात लवकरच निर्बंध शिथिल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. त्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे. याबाबत शासनाचे विस्तृत आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन कार्यवाही सुरू करेल.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. जिल्ह्याचा गेल्या काही दिवसांमधील पॉझिटिव्हिटी रेट हा ०.१९ टक्के इतका आहे. त्यामुळे जळगावमधील निर्बंध आता हटणार आहेत. या आधी राज्य सरकारने जिल्ह्यातील निर्बंध हटवले होते; मात्र डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू केले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात नागरिकांना मोकळीक मिळणार आहे.

सध्या जिल्ह्यात चार वाजेपर्यंतच अत्यावश्यक आणि इतर सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्येवर निर्बंध आहेत. हे निर्बंधदेखील या टप्प्यात शिथिल केले जाऊ शकतात. जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेले असले तरी याबाबत अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. किंवा तसे आदेशदेखील स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेेले नाहीत.

काय असेल मोकळीक

दुकाने, हॉटेल्स पूर्णवेळ सुरू करण्यास मोकळीक देण्याची शक्यता

मॉल्समध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून पूर्णवेळ सुरू होण्याची शक्यता

मंदिरे सुरू होऊ शकतात

व्यायामशाळा आणि सिनेमागृहांना निर्बंधातून सुट

लग्न आणि इतर खासगी सोहळ्यांना थोडीफार सुट

जमावबंदीतून मिळण्याची शक्यता

खासगी आणि सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सुट

कोट - निर्बंध शिथिल करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या कळवलेले नाही. याचे आदेश आले की जिल्हा पातळीवर योग्य ते आदेश निर्गमित केले जातील - अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी.

कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली असताना शिवाय तिसऱ्या लाटेबाबत ठोस कोणीच काही सांगत नसताना अशा स्थितीत व्यापारी वर्गाला वेठीस न धरता, ते पूर्वपदावर आणावे लागणार आहे. जळगाव शहरात रुग्णसंख्या घटली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्ण आहेत तेथे निर्बंध हवेत. शासनाने तातडीने सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावे.

पुरुषोत्तम टावरी, कॅट संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष.