शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

अतिक्रमण काढल्याने रस्ता झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:27 IST

अमळनेर : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे घेतला निर्णय, दगडी दरवाजाच्या सुरक्षेवर लक्ष

अमळनेर : दगडी दरवाजाकडील वाहतूक धोक्याची झाल्याने गणपती विसर्जन करण्यास अतिक्रमण अडथळा ठरत होते. त्यामुळे तहसीलदार, पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने गांधलीपुरा पुलकडे जाणारा मार्ग व सुभाष चौक ते बालेमिया मशिदीपर्यंतच्या रस्त्याचे अतिक्रमण ५ रोजी काढण्यात आले.गेल्या काही दिवसांपूर्वी भिजपावसामुळे ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने धुळे-चोपडा राज्य मार्गावरून दरवाजाकडून होणारी वाहतूक धोक्याची असून पुरातत्व विभागाने वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचे पत्रही दिले आहे. त्यामुळे ही वाहतूक सुभाष चौक व गांधलीपुरा पुलाकडून वळवणे अनिवार्य होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अनेक मंडळांची आरती दगडी दरवाजाजवळ होत असल्याने बँड, ढोल, ताशे वाजवणेदेखील जोखमीचे असून मिरवणूक मार्ग बदलणे गरजेचे असल्याचा मुद्दा शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. नगरपालिका पथक व जेसीबी मशीन घेऊन गांधलीपुरा भागातील पुलाकडे जाणा-या मार्गावरील ५ ते 6 घरे, एक सामाजिक मंदिर, झोपड्या आदी अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या कारवाईमुळे येथील रस्ता मोकळा झाला आहे.उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, संजय चौधरी, युवराज चव्हाण, संतोष बि-हाडे, राधेश्याम अग्रवाल, नगरालिका व पोलीस कर्मचारी शरद पाटिल, हितेश चिंचोरे, दीपक माळी, तलाठी पुरुषोत्तम पाटील, स्वप्नील कुलकर्णी, हर्ष मोरे, प्रथमेश पिंगळे, ोलीस पाटील भागवत पाटील यांचे सहकार्य लाभले.