शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

निकालाचे होणार दूरगामी परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:21 IST

भाजपाने चारही जागा राखल्यास गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट ; ‘विधानसभे’साठी मोठी जबाबदारी, जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीला येईल उर्जितावस्था तर नंदुरबार-धुळे जिल्ह्यात वाढू शकतो आत्मविश्वास

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीचे निकाल तीन दिवसात जाहीर होतील. यंदाच्या अतीशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत निकालाविषयी मोठी अनिश्चितता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. देशात आणि खान्देशात सगळेच पक्ष आणि पदाधिकारी विजयाचे दावे करीत असले तरी खाजगीत मात्र वेगळाच सूर लावला जात आहे. मतदारसंघात वेगवेगळी समीकरणे जुळली असल्याने निकाल वेगळे लागू शकतात, असे आता कार्यकर्तेदेखील बोलू लागले आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. रावेरच्या जागेविषयी भाजप निश्चिंत आहे. दहा वर्षानंतर ‘पंजा’ हे चिन्ह या मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांच्यारुपाने पुन्हा एकदा मतदारांपर्यंत गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीचा प्रभाव निर्माण होईल.जळगावच्या जागेविषयी दोन्ही पक्ष ठामपणे विजयाचा दावा करीत आहे. भाजपमधील उमेदवारीच्या गोंधळामुळे हक्काची जागा भाजप गमावेल, असे चित्र निर्माण झाले होते. गुलाबराव देवकर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार राष्टÑवादी काँग्रेसने मैदानात उतरविल्याने वसंतराव मोरे यांच्याप्रमाणेचे विजयाची पुनरावृत्ती देवकर करतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्या मदतीने ‘युती’ची एकत्रित शक्ती पणाला लावली असल्याचे चित्र मतदारसंघात तयार झाले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनाही या दोन मंत्र्यांनी कामाला लावले. ज्याच्या मतदारसंघात मताधिक्य त्याची उमेदवारी निश्चित हा ‘फंडा’ प्रभावी ठरल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात कितपत तथ्य आहे, हे निकालानंतर कळेल.धुळे आणि नंदुरबारविषयी काँग्रेस पक्ष खूपच आशावादी आहे. ९ पैकी ५ आमदार, दोन विधान परिषद सदस्य, दोन्ही जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, पंचायत समित्या, पालिका त्यासोबतच सुरुपसिंग नाईक, माणिकराव गावीत, अमरीशभाई पटेल, रोहिदास पाटील, पद्माकर वळवी, डी.एस.अहिरे यांच्यासारखे दिग्गज नेते असल्याने काँग्रेस पक्ष ताकदवान दिसत आहे. धुळ्यात राष्टÑवादी काँग्रेसची भक्कम साथ मिळाली असली तरी नंदुरबारात तशी स्थिती नव्हती. अनिल गोटे आणि डॉ.सुहास नटावदकर यांच्या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला होऊ शकेल, असे वातावरण असले तरी प्रत्यक्षातील स्थिती पुन्हा एकदा वेगळी असू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.नंदुरबारात डॉ.विजयकुमार गावीत यांनी एकहाती ही निवडणूक पेलली. पालकमंत्री जयकुमार रावल यांची साथ त्यांना लाभली. नटावदकर यांची बंडखोरी आणि शिवसेनेची नाराजी याचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने त्यांनी रणनिती आखली. धुळ्यात कुणाल पाटील यांच्यासारखा तरुण आमदार आणि अनिल गोटे या स्वपक्षीय बंडखोरामुळे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे होते. ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यात याठिकाणी लक्ष घातले अशी चर्चा आहे, त्याचा काय परिणाम होतो, तेदेखील तीन दिवसात कळेल.केंद्रात कोणते सरकार येते, यावर महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. युती-आघाडी, पक्षांतरे हे सगळे पुढील काळात निश्चित होईल.खान्देशातील चारही जागा प्रथमच भाजपने गेल्यावेळी जिंकल्या. आता जर या जागा कायम राखल्या तर उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. कदाचित बहुप्रतिक्षित जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांना मिळू शकते. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडील अधिकारामध्ये वाढ होऊ शकते. विजय झाल्यास जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, एकनाथराव खडसे यांच्या कामगिरीची पक्ष दखल घेईल. काँग्रेस-राष्टÑवादीच्यादृष्टीने ही अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव