शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

गिरणा धरणातून पिण्यासाठी १४०० दलघफू पाण्याचे आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 19:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठळक मुद्दे कानळद्यापर्यंत येण्यास लागणार ३ दिवस अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करा कारवाईसाठी भरारी पथके

जळगाव: गिरणा काठावरील चाळीसगावसह पाच तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून १४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी रविवार, ४ नोव्हेंबर रोजी दिले. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी धरणातून हे पाणी सोडले जाणार असून जळगाव तालुक्यात कानळद्यापर्यंत पोहोचण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाचोरा, भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणी योजनेचे जलस्त्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी शहरात ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने पिण्यासाठी नपाच्या पाणी योजनेजवळील कच्च्या बंधाºयात गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तर पाचोरा मुख्याधिकारी यांनी शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ ओझर के.टी. वेअरमध्ये गिरणा धरणातून बिगर सिंचन पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. याखेरीज गिरणा काठावरील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या पाणी योजनांसाठीही गिरणातून आवर्तन देण्याची मागणी होत होती.कानळदा पर्यंत सुटणार आवर्तनगिरणा धरणात ८६२४.५० दलघफू (४६.६१टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या अनुषंगाने गिरणाकाठावरील या सर्व तालुक्यातील पाणी योजनांसाठी अगदी जळगाव तालुक्यातील कानळदा ग्रा.पं.च्या पाणीयोजनेपर्यंत १४०० दलघफू पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी रविवार ४ नोव्हेंबर रोजी दिले. पाणी आवर्तन सोडल्यानंतर पाणी वापर संस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करागिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असून या पाण्याचा वापर पिण्यासाठीच होईल व कोणत्याही परिस्थितीत अपव्यय होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच गिरणा नदीपात्रातून पाण्याचा उपसा अन्य कारणासाठी होऊ नये, यासाठी नदीकाठचा थ्री-फेज वीजपुरवठा तत्काळ बंद करावा. तसेच संबंधीतांच्या मोटारी, केबल्स आदी साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून सोडण्यात आलेले पाणी लवकरात लवकर कानळद्यापर्यंत पोहोचू शकेल,असे आदेश जिल्हाधिकाºयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत.कारवाईसाठी भरारी पथकेचाळीसगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव प्रांताधिकाºयांना नदीपात्रातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून पाणी चोरी रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या भरारी पथकांमध्ये पाटबंधारे विभाग, महसूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामीण पोलीस या विभागांतील संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.