शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

गिरणा धरणातून पिण्यासाठी १४०० दलघफू पाण्याचे आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 19:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठळक मुद्दे कानळद्यापर्यंत येण्यास लागणार ३ दिवस अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करा कारवाईसाठी भरारी पथके

जळगाव: गिरणा काठावरील चाळीसगावसह पाच तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून १४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी रविवार, ४ नोव्हेंबर रोजी दिले. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी धरणातून हे पाणी सोडले जाणार असून जळगाव तालुक्यात कानळद्यापर्यंत पोहोचण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाचोरा, भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणी योजनेचे जलस्त्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी शहरात ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने पिण्यासाठी नपाच्या पाणी योजनेजवळील कच्च्या बंधाºयात गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तर पाचोरा मुख्याधिकारी यांनी शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ ओझर के.टी. वेअरमध्ये गिरणा धरणातून बिगर सिंचन पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. याखेरीज गिरणा काठावरील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या पाणी योजनांसाठीही गिरणातून आवर्तन देण्याची मागणी होत होती.कानळदा पर्यंत सुटणार आवर्तनगिरणा धरणात ८६२४.५० दलघफू (४६.६१टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या अनुषंगाने गिरणाकाठावरील या सर्व तालुक्यातील पाणी योजनांसाठी अगदी जळगाव तालुक्यातील कानळदा ग्रा.पं.च्या पाणीयोजनेपर्यंत १४०० दलघफू पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी रविवार ४ नोव्हेंबर रोजी दिले. पाणी आवर्तन सोडल्यानंतर पाणी वापर संस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करागिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असून या पाण्याचा वापर पिण्यासाठीच होईल व कोणत्याही परिस्थितीत अपव्यय होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच गिरणा नदीपात्रातून पाण्याचा उपसा अन्य कारणासाठी होऊ नये, यासाठी नदीकाठचा थ्री-फेज वीजपुरवठा तत्काळ बंद करावा. तसेच संबंधीतांच्या मोटारी, केबल्स आदी साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून सोडण्यात आलेले पाणी लवकरात लवकर कानळद्यापर्यंत पोहोचू शकेल,असे आदेश जिल्हाधिकाºयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत.कारवाईसाठी भरारी पथकेचाळीसगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव प्रांताधिकाºयांना नदीपात्रातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून पाणी चोरी रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या भरारी पथकांमध्ये पाटबंधारे विभाग, महसूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामीण पोलीस या विभागांतील संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.