शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गिरणा धरणातून पिण्यासाठी १४०० दलघफू पाण्याचे आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 19:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठळक मुद्दे कानळद्यापर्यंत येण्यास लागणार ३ दिवस अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करा कारवाईसाठी भरारी पथके

जळगाव: गिरणा काठावरील चाळीसगावसह पाच तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून १४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी रविवार, ४ नोव्हेंबर रोजी दिले. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी धरणातून हे पाणी सोडले जाणार असून जळगाव तालुक्यात कानळद्यापर्यंत पोहोचण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाचोरा, भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणी योजनेचे जलस्त्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी शहरात ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने पिण्यासाठी नपाच्या पाणी योजनेजवळील कच्च्या बंधाºयात गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तर पाचोरा मुख्याधिकारी यांनी शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ ओझर के.टी. वेअरमध्ये गिरणा धरणातून बिगर सिंचन पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. याखेरीज गिरणा काठावरील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या पाणी योजनांसाठीही गिरणातून आवर्तन देण्याची मागणी होत होती.कानळदा पर्यंत सुटणार आवर्तनगिरणा धरणात ८६२४.५० दलघफू (४६.६१टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या अनुषंगाने गिरणाकाठावरील या सर्व तालुक्यातील पाणी योजनांसाठी अगदी जळगाव तालुक्यातील कानळदा ग्रा.पं.च्या पाणीयोजनेपर्यंत १४०० दलघफू पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी रविवार ४ नोव्हेंबर रोजी दिले. पाणी आवर्तन सोडल्यानंतर पाणी वापर संस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करागिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असून या पाण्याचा वापर पिण्यासाठीच होईल व कोणत्याही परिस्थितीत अपव्यय होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच गिरणा नदीपात्रातून पाण्याचा उपसा अन्य कारणासाठी होऊ नये, यासाठी नदीकाठचा थ्री-फेज वीजपुरवठा तत्काळ बंद करावा. तसेच संबंधीतांच्या मोटारी, केबल्स आदी साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून सोडण्यात आलेले पाणी लवकरात लवकर कानळद्यापर्यंत पोहोचू शकेल,असे आदेश जिल्हाधिकाºयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत.कारवाईसाठी भरारी पथकेचाळीसगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव प्रांताधिकाºयांना नदीपात्रातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून पाणी चोरी रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या भरारी पथकांमध्ये पाटबंधारे विभाग, महसूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामीण पोलीस या विभागांतील संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.