शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

गिरणा धरणातून पिण्यासाठी १४०० दलघफू पाण्याचे आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 19:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठळक मुद्दे कानळद्यापर्यंत येण्यास लागणार ३ दिवस अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करा कारवाईसाठी भरारी पथके

जळगाव: गिरणा काठावरील चाळीसगावसह पाच तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून १४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी रविवार, ४ नोव्हेंबर रोजी दिले. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी धरणातून हे पाणी सोडले जाणार असून जळगाव तालुक्यात कानळद्यापर्यंत पोहोचण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाचोरा, भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणी योजनेचे जलस्त्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी शहरात ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने पिण्यासाठी नपाच्या पाणी योजनेजवळील कच्च्या बंधाºयात गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तर पाचोरा मुख्याधिकारी यांनी शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ ओझर के.टी. वेअरमध्ये गिरणा धरणातून बिगर सिंचन पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. याखेरीज गिरणा काठावरील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या पाणी योजनांसाठीही गिरणातून आवर्तन देण्याची मागणी होत होती.कानळदा पर्यंत सुटणार आवर्तनगिरणा धरणात ८६२४.५० दलघफू (४६.६१टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या अनुषंगाने गिरणाकाठावरील या सर्व तालुक्यातील पाणी योजनांसाठी अगदी जळगाव तालुक्यातील कानळदा ग्रा.पं.च्या पाणीयोजनेपर्यंत १४०० दलघफू पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी रविवार ४ नोव्हेंबर रोजी दिले. पाणी आवर्तन सोडल्यानंतर पाणी वापर संस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करागिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असून या पाण्याचा वापर पिण्यासाठीच होईल व कोणत्याही परिस्थितीत अपव्यय होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच गिरणा नदीपात्रातून पाण्याचा उपसा अन्य कारणासाठी होऊ नये, यासाठी नदीकाठचा थ्री-फेज वीजपुरवठा तत्काळ बंद करावा. तसेच संबंधीतांच्या मोटारी, केबल्स आदी साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून सोडण्यात आलेले पाणी लवकरात लवकर कानळद्यापर्यंत पोहोचू शकेल,असे आदेश जिल्हाधिकाºयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत.कारवाईसाठी भरारी पथकेचाळीसगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव प्रांताधिकाºयांना नदीपात्रातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून पाणी चोरी रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या भरारी पथकांमध्ये पाटबंधारे विभाग, महसूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामीण पोलीस या विभागांतील संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.