शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:23 IST

यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरब्बी व बागायतीला पिकांना जाणवू लागलाय धोका केळीबागा वाचवण्यासाठी आतापासूनच पाणी कपात करून हजारो केळी खोडं सोडले वाºयावरउत्पादन खर्चही निघणे झाले अवघड

रावेर, जि.जळगाव : तालुक्यात यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाळ्याच्या उत्तरार्धातच १५ ते २० फुुटांनी विहिरींंची भूजलपातळी खालावली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आतापासूनच हजार- दोन हजार केळीची खोडांच्या पाण्यात कपात करून हजारो खोडं वाऱ्यावर सोडल्याची विदारक परिस्थिती आहे.रावेर तालुक्यात यावर्षी झालेल्या पर्जन्यमानातील पहिल्या रोहिणी ते आश्लेषा पर्जन्य क्षेत्रापर्यंतच्या निम्मे पर्जन्य नक्षत्रात केवळ ३४ टक्के पर्जन्यमान तीन आठवडे तथा महिनाभराच्या खंडानंतर अनियमितपणे झाले. परिणामी खरीप हंगाम केवळ आॅक्सीजनवर ठेवल्यागत तगला.दरम्यान, दुसºया सत्रातील मघा पर्जन्यनक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा अर्धशतकी टप्पा पार पडला. खरिपाची खुंटलेली वाढ वाढीस लागण्यासाठी सदरचा पाऊस अनुक ठरला होता, तर तालुक्यातील सुकी, मंगरूळ व आभोडा या मध्यमसिंचन प्रकल्पासह गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन झालेल्या विसर्गाचे जेमतेम पाणी सुकी, भोकर व नागोई नद्यांमधून वाहून निघाले होते.दरम्यान, खरीपाचा हंगाम ऐन फुल व फलधारणेच्या अवस्थेत असताना पूर्वा पर्जन्यनक्षत्र व उत्तरा नक्षत्राचा पूर्वाध अशा महिनाभराच्या कालखंडानंतर पावसाने २२ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्राच्या उत्तरार्धात रात्री संततधार व दमदार हजेरी लावून फलधारणेतील खरीपाला अमृत संजीवनी दिली होती. या तब्बल महिनाभराच्या कालखंडानंतर झालेल्या पावसाने तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाची सत्तरी पार करून ७१.१४ टक्के पर्जन्यमानाने यंदा कमाल मर्यादा गाठली. १२ पैकी १० पर्जन्यनक्षत्र आटोपूनही तालुक्यात जीवनवाहिन्या ठरलेल्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण, या नद्यांची अद्यापही घशाशी आलेली कोरड पुन्हारूपी न शमल्याची मोठी शोकांतिका आहे. चिंचाटी व मात्राण लघुसिंचन प्रकल्प अद्यापही सिंचनाची साठी ओलांडू शकली नसल्याचे भीषण आहे.या पर्जन्यमानातील उत्तराच्या उत्तरार्धातच पावसाने धूम ठोकल्याने पडत झडत तगलेला खरीप घटते उत्पन्न देणारा असला तरी, उर्वरित हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्र कोरडेठाक जाण्याची भीती असल्याने आहे. तसेच पितृपक्षातील उन्हाने उन्हाळ्यातील मे हिटच्या तडाख्यालाही लाजवत जबर उष्णता ओकल्याने तालुक्यातील भूजलपातळी आता पावसाळ्यातच तब्बल १५ ते २० फूट खोलवर घसरली असून, आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली आहे.भर पावसाळ्यात विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर खालावल्याने आतापासूनच विहिरींचा टप्पा पध्दतीने उपसा होऊ लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा भयभीत झाला आहे. रब्बी व बागायती पिकांची चिंता शेतकरीवर्गाची झोप उडवणारी ठरली आहे. या पावसाळ्यात केलेल्या मृगबहार केळीबागांमधील भविष्यातील भूजलटंचाईचा नियोजन व कृती आराखडा म्हणून तालुक्याच्या पूर्व भागातील खानापूर, चोरवड, निरूळ, पाडळे, वाघोड व कर्जोद शिवारातील केळी उत्पादक शेतकºयांनी आपापल्या भूजल साठ्याच्या व भूजलस्त्रोतांचा वेध घेत कुणी एक हजार तर कुणी दोन हजार केळी बागेतील खोडांच्या पाण्याची कपात करून हजारो खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती दुष्काळाची जणूकाही चाहूल करून देणारी ठरली आहे.तब्बल पाच ते सहा महिन्यांत केळीबागांच्या लागवडीपासून, ठिबक सिंचन, रासायनिक खतांच्या मात्रा, आंतर मशागतीचा खर्च, फर्टीगेशन, न्युट्रीशन यावर केलेला लाखो रूपयांचा खर्च निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त केळीबागा भूजलाअभावी वाºयावर सोडल्याने किमान घटत्या खरीपाचे येणाºया उत्पन्नाचे तेलही गेले अन् लागवडीखालील केळी बागायतीच्या उत्पन्नाचे तूपही गेल्याने शेतकरीवर्ग कमालीचा कर्जाच्या खाईत बुडाल्याची विदारक अवस्था निर्माण झाली आहे.खानापूर येथील ग्रामपंचायत सदस्य भुवनेश्वर महाजन, अनंत भावडू धांडे या शेतकºयांनी त्यांचे प्रत्येकी पाच ते सहा हजार केळी बागेतील एक ते दोन हजार केळीचे खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर