शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:23 IST

यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरब्बी व बागायतीला पिकांना जाणवू लागलाय धोका केळीबागा वाचवण्यासाठी आतापासूनच पाणी कपात करून हजारो केळी खोडं सोडले वाºयावरउत्पादन खर्चही निघणे झाले अवघड

रावेर, जि.जळगाव : तालुक्यात यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाळ्याच्या उत्तरार्धातच १५ ते २० फुुटांनी विहिरींंची भूजलपातळी खालावली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आतापासूनच हजार- दोन हजार केळीची खोडांच्या पाण्यात कपात करून हजारो खोडं वाऱ्यावर सोडल्याची विदारक परिस्थिती आहे.रावेर तालुक्यात यावर्षी झालेल्या पर्जन्यमानातील पहिल्या रोहिणी ते आश्लेषा पर्जन्य क्षेत्रापर्यंतच्या निम्मे पर्जन्य नक्षत्रात केवळ ३४ टक्के पर्जन्यमान तीन आठवडे तथा महिनाभराच्या खंडानंतर अनियमितपणे झाले. परिणामी खरीप हंगाम केवळ आॅक्सीजनवर ठेवल्यागत तगला.दरम्यान, दुसºया सत्रातील मघा पर्जन्यनक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा अर्धशतकी टप्पा पार पडला. खरिपाची खुंटलेली वाढ वाढीस लागण्यासाठी सदरचा पाऊस अनुक ठरला होता, तर तालुक्यातील सुकी, मंगरूळ व आभोडा या मध्यमसिंचन प्रकल्पासह गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन झालेल्या विसर्गाचे जेमतेम पाणी सुकी, भोकर व नागोई नद्यांमधून वाहून निघाले होते.दरम्यान, खरीपाचा हंगाम ऐन फुल व फलधारणेच्या अवस्थेत असताना पूर्वा पर्जन्यनक्षत्र व उत्तरा नक्षत्राचा पूर्वाध अशा महिनाभराच्या कालखंडानंतर पावसाने २२ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्राच्या उत्तरार्धात रात्री संततधार व दमदार हजेरी लावून फलधारणेतील खरीपाला अमृत संजीवनी दिली होती. या तब्बल महिनाभराच्या कालखंडानंतर झालेल्या पावसाने तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाची सत्तरी पार करून ७१.१४ टक्के पर्जन्यमानाने यंदा कमाल मर्यादा गाठली. १२ पैकी १० पर्जन्यनक्षत्र आटोपूनही तालुक्यात जीवनवाहिन्या ठरलेल्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण, या नद्यांची अद्यापही घशाशी आलेली कोरड पुन्हारूपी न शमल्याची मोठी शोकांतिका आहे. चिंचाटी व मात्राण लघुसिंचन प्रकल्प अद्यापही सिंचनाची साठी ओलांडू शकली नसल्याचे भीषण आहे.या पर्जन्यमानातील उत्तराच्या उत्तरार्धातच पावसाने धूम ठोकल्याने पडत झडत तगलेला खरीप घटते उत्पन्न देणारा असला तरी, उर्वरित हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्र कोरडेठाक जाण्याची भीती असल्याने आहे. तसेच पितृपक्षातील उन्हाने उन्हाळ्यातील मे हिटच्या तडाख्यालाही लाजवत जबर उष्णता ओकल्याने तालुक्यातील भूजलपातळी आता पावसाळ्यातच तब्बल १५ ते २० फूट खोलवर घसरली असून, आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली आहे.भर पावसाळ्यात विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर खालावल्याने आतापासूनच विहिरींचा टप्पा पध्दतीने उपसा होऊ लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा भयभीत झाला आहे. रब्बी व बागायती पिकांची चिंता शेतकरीवर्गाची झोप उडवणारी ठरली आहे. या पावसाळ्यात केलेल्या मृगबहार केळीबागांमधील भविष्यातील भूजलटंचाईचा नियोजन व कृती आराखडा म्हणून तालुक्याच्या पूर्व भागातील खानापूर, चोरवड, निरूळ, पाडळे, वाघोड व कर्जोद शिवारातील केळी उत्पादक शेतकºयांनी आपापल्या भूजल साठ्याच्या व भूजलस्त्रोतांचा वेध घेत कुणी एक हजार तर कुणी दोन हजार केळी बागेतील खोडांच्या पाण्याची कपात करून हजारो खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती दुष्काळाची जणूकाही चाहूल करून देणारी ठरली आहे.तब्बल पाच ते सहा महिन्यांत केळीबागांच्या लागवडीपासून, ठिबक सिंचन, रासायनिक खतांच्या मात्रा, आंतर मशागतीचा खर्च, फर्टीगेशन, न्युट्रीशन यावर केलेला लाखो रूपयांचा खर्च निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त केळीबागा भूजलाअभावी वाºयावर सोडल्याने किमान घटत्या खरीपाचे येणाºया उत्पन्नाचे तेलही गेले अन् लागवडीखालील केळी बागायतीच्या उत्पन्नाचे तूपही गेल्याने शेतकरीवर्ग कमालीचा कर्जाच्या खाईत बुडाल्याची विदारक अवस्था निर्माण झाली आहे.खानापूर येथील ग्रामपंचायत सदस्य भुवनेश्वर महाजन, अनंत भावडू धांडे या शेतकºयांनी त्यांचे प्रत्येकी पाच ते सहा हजार केळी बागेतील एक ते दोन हजार केळीचे खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर