शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पारोळा तालुक्यातील २१ गावांना तीव्र पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:03 IST

पारोळा तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी खालावल्याने तसेच प्रकल्पांमधील जलसाठा कमी झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून यातील २१ गावांना तीव्र चटके बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून ९ गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील प्रकल्पांनी गाठला तळभूगर्भातील जलपातळीही कमालीची खालावलीटँकरद्वारे पाणी पुरवठा आणि विहीरी अधिग्रहणाची कारवाई

आॅनलाईन लोकमतपारोळा, दि.१२ :  तालुक्यात एकूण २१ गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून ९ गावांना विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यातील आणखी ३ गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून १ गावाला विहीर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे.या वर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणच्या प्रकल्पांसह विहीरींची पाणी पातळी कमी झाली आहे. या मुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहेसद्यस्थितीत तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री, मोहाडी, दहीगाव, पोपटनगर, मंगरुळ, खेडीढोक, हिवरखेडे, कंकराज, वडगाव प्र अ , या ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर सारवे, (रामनगर) शेळावे बुद्रूक राजवड, अंंबापिंप्री, जिराळी, महालपूर, पळासखेडे बुद्रूक , कराडी, भिलाली, नेरपाट, या गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर वाघरा, वाघरी, बाभळेनाग या गावांना तीन टँकरची मागणी आहे. दरम्यान, लोणी सिम या गावातील पाणी टंचाई पाहता तेथे विहीर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे ग्रामपंचायतकडून प्राप्त झाला आहे. हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले जाणार असल्याचे गटविकास अधिकारी आर.के. गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या वर्षी तालुक्यातील भोकरबारी, म्हसवे, इंदासी या प्रमुख धरणांनी तळ गाठला असून यामुळे पाण्याचे टँकर भरण्याची पंचाईत झाली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी