शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पावसाचा ७४ गावांना फटका; सात तालुक्यात पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:16 IST

अमळनरे तालुक्यात ३५ घरे पडली: सहा तालुक्यात १४० घरांच्या भिंती पडल्या, सहा बैल, १० बकऱ्या जखमी

जळगाव : संततधार पावसामुळे तसेच तापी व पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापैकी रावेर वगळता चोपडा, यावल, पाचोरा, एरंडोल, धरणगाव व अमळनेर या सहा तालुक्यांमध्ये तब्बल ७४ गावे बाधीत झाली आहेत. अमळनेर तालुक्यात तर ३० गावांमधील ३५ घरे तर ६४ घरांच्या भिंती पडल्या आहेत. या सहा तालुक्यात मिळून १४० घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर चोपडा तालुक्यात ४ घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने यात मनुष्यहानी झालेली नसली तरीही ६ बैल व १० बकºया जखमी झाल्या आहेत.अमळनेर तालुक्यात सर्वाधिक फटकाशुक्रवारी झालेल्या पावसाने तापी नदीवरील हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले. त्यामळे २ लाख ४८ हजार ५११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून ४९ हजार क्यूसेक विसर्ग होत असल्याने जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील कलाली गावाला पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. तसेच पांझरा नदीकाठच्या मांडळ, मुडी, ब्राह्मणे, बोदर्डे, कळंबे, भिलाली, शहापूर व निम या गावांपर्यंत पाणी पोहोचल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.९ बचाव पथकेउपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी ९ बचाव पथके तयार करून या गावांमध्ये सज्ज ठेवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत फायबर बोटीसह बचाव पथक अमळनेर येथे रवाना केले आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील मुडी व बोदर्डे या गावातील सुमारे १ हजार नागरिकांना मुडी येथील प्राथमिक शाळेत हलविले असून त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.बचाव साहित्याचे वितरणअमळनेर, रावेर, जामनेर व जळगाव येथे चार नग फायबर बोटी व लाईफ जॅकेट, लाईफ रीग, सर्च लाईट, दोरखंड आदी साहित्य वितरीत करण्यात आले असून ते सज्ज ठेवण्यात आले आहे,तालुकास्तरावर झाल्या आपत्कालीन नियोजनाच्या बैठकजिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात आॅगस्टच्या दुसºयाच आठवड्यात ६३.१ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ३९.९ टक्के पाऊस झाला होता. दरम्यान पावसाने उघडीप न दिल्याने शेतांमध्ये पाणीसाचून पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.गेल्या ४८ तासांपासून तर पावसाने संततधार लावली आहे. गुरूवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. एकाच दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४८.१ मिमी पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव तालुक्यात ५४.८ मिमी, जामनेर २२.८, एरंडोल ४४.८, धरणगाव ८१.३, भुसावळ ५२.४, यावल ७८.४, रावेर ५२.१, मुक्ताईनगर ५२, बोदवड ३३.३ , पाचोरा १८.६, चाळीसगाव ११, भडगाव २२.१, अमळनेर ७१.३, पारोळा ४०.०, चोपडा तालुक्यात ८७.१ मिमी पाऊस झाला.एकाच तालुक्याची सरासरी ५० च्या आतआतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ चाळीसगाव तालुक्याची पावसाची सरासरी ४८.४ टक्केच आहे. जळगाव तालुक्यात सरासरी ६२.१ टक्के, जामनेर ७३.६, एरंडोल ६६.२, धरणगाव ६३.५, भुसावळ ६९.८, यावल ७१.२, रावेर ६५.९, मुक्ताईनगर ७६, बोदवड ६३.६, पाचोरा ५७.९, भडगाव ५१.७, अमळनेर ५९.८, पारोळा ५७.७, चोपडा तालुक्यात ५८.६ टक्के पाऊस झाला आहे.अमळनेर तालुक्याला धोकाधुळे येथील पांझरा नदीपात्रातून सध्या ४९ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील मुडी गावात पाणी शिरले आहे. याठिकाणी एक होडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अक्कलपाडा धरण क्षेत्रात रात्री पावसाचा वेग आणि पांझरा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यास अमळनेर तालुक्यातील नदी काठावरील मांडळ व नीम, तांदळी, शहापूर, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, बोदर्डे या गावात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.उघडीप नसल्याने पिके धोक्यात; पंचनामे सुरूपावसाने गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने हजेरी लावलेली असल्याने उघडीप मिळालेली नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली आहे. उडीद-मूगावर रोग पडू लागला असून कपाशीची रोपे पिवळी पडू लागली आहेत. याबाबत कृषी विभागाची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात तक्रार येईल, त्यानुसार पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या बंदसंततधार पाऊस तसेच पांझरा व तापी नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाºयांच्या रजा, सुट्या रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हतनूरचे ४१ दरवाजे पूर्ण उघडलेहतनूर धरण क्षेत्रात पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून २ लाख ५१ हजार ५४९ क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तापी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे गिरणा धरण ६१ टक्के तर वाघूर धरणातील जलसाठा ३४ टक्के इतका झाला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव