शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

पाऊस रुसल्याने बळीराजाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

यंदा मान्सून वेळेवर असे जरी हवामान खाते सांगत असले तरी अर्धा जून संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस नाही. ...

यंदा मान्सून वेळेवर असे जरी हवामान खाते सांगत असले तरी अर्धा जून संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस नाही. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील कापसाची लागवड जास्त असून मका, ज्वारी व कडधान्ये यांचे क्षेत्र कमी अधिक प्रमाणात आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महागडे बियाणे, मजुरांची वाढलेली मजुरी, खतांची दरवाढ यामुळे शेतीचे अर्थचक्र बदलले आहे. निसर्गाने साथ दिली तर ठीक, अन्यथा लागवडीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. शासनाने हमीभाव जाहीर करूनही ज्वारी व मक्याची खरेदी होत नाही. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अजूनही सुमारे २० टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. पीक कर्जाचीही तीच स्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बँक पीक कर्जासाठी फिरवा फिराव करतात. कागदपत्रे देऊनही कर्ज मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. निसर्गाची साथ नाही व दुसरे परिस्थितीचे संकट अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. दुबार पेरणीसाठी अनेकांकडे पैसे नाही. यापूर्वी नुकसान झाले, त्याचीही भरपाई शासनाने दिली नाही. केवळ पंचनाम्यांचे सोपस्कार केले गेले. यामुळे चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. शासनाने मोफत बियाणे योजना आणली; पण तीही फारशी उपयोगाची नाही, अशीच परिस्थिती तालुक्यात सध्या दिसत आहे. तालुक्यात वाघूरसारखा प्रकल्प आहे; पण त्याचा सर्वाधिक फायदा हा अन्य तालुक्यांना असल्याचे लक्षात येते. प्रशासनाने यासाठी पाणी नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे होते; पण याबाबत येथे काहीसे दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. यामुळे शेतकरी संकटात आले आहेत.