शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

पाऊस रुसल्याने बळीराजाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

यंदा मान्सून वेळेवर असे जरी हवामान खाते सांगत असले तरी अर्धा जून संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस नाही. ...

यंदा मान्सून वेळेवर असे जरी हवामान खाते सांगत असले तरी अर्धा जून संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस नाही. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील कापसाची लागवड जास्त असून मका, ज्वारी व कडधान्ये यांचे क्षेत्र कमी अधिक प्रमाणात आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महागडे बियाणे, मजुरांची वाढलेली मजुरी, खतांची दरवाढ यामुळे शेतीचे अर्थचक्र बदलले आहे. निसर्गाने साथ दिली तर ठीक, अन्यथा लागवडीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. शासनाने हमीभाव जाहीर करूनही ज्वारी व मक्याची खरेदी होत नाही. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अजूनही सुमारे २० टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. पीक कर्जाचीही तीच स्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बँक पीक कर्जासाठी फिरवा फिराव करतात. कागदपत्रे देऊनही कर्ज मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. निसर्गाची साथ नाही व दुसरे परिस्थितीचे संकट अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. दुबार पेरणीसाठी अनेकांकडे पैसे नाही. यापूर्वी नुकसान झाले, त्याचीही भरपाई शासनाने दिली नाही. केवळ पंचनाम्यांचे सोपस्कार केले गेले. यामुळे चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. शासनाने मोफत बियाणे योजना आणली; पण तीही फारशी उपयोगाची नाही, अशीच परिस्थिती तालुक्यात सध्या दिसत आहे. तालुक्यात वाघूरसारखा प्रकल्प आहे; पण त्याचा सर्वाधिक फायदा हा अन्य तालुक्यांना असल्याचे लक्षात येते. प्रशासनाने यासाठी पाणी नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे होते; पण याबाबत येथे काहीसे दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. यामुळे शेतकरी संकटात आले आहेत.