शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाऊस : रूपे अगाध तुझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:40 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये प्रासंगिक या सदरात साहित्यिक जिजाबराव वाघ यांनी पावसाचे काव्यरूपी केलेले वर्णन.

पाऊस... ओल्या नक्षत्रांचे घमघमणारे आभाळ... नवसृजनाची प्रतिभागंधीत माळ... पावसाची रुपेही अगाध. तप्त धरतीची कुस उजवून तिची हिरवी ओटी भरणारा... मन मातीवर थेंब ओल्या शब्दांची अलवार रांगोळी रेखाटणारा. समस्त कवी कुलास तर पावसाची अगणित रूपे करतात भावविभोर. आयुष्याच्या शुष्क फेसबुक अन् व्हॉटसअपच्या पदरावर चिंब प्रतिमांचे मोर चितारुन... पाऊस तनमनाला कवेत घेतो. रोमांचित करतो..! भरल्या आभाळाच्या साक्षीनं शब्दांना ढगांचा आकार मिळतो. पावसाचा प्रवास अदिम. अनादी आणि अनंतही. स्थलकालानुसार कवींच्या शब्दांमधून पाझरलेल्या पावसाची काही लडीवाळ तर काही फटकारे मारणारी रूपे. आनंदाचा हंगाम देऊन भेटत राहतात दरवर्षी ताजेपणानं...ऊन जरा जास्त आहे. असं म्हणत दरवर्षी काहिली करणाऱ्या दिवसात रुतूचक्राभोवती फिरणारी कालदर्शिकेची पानं पालटली जातात आपसुक. यातील चार पानं असतात पावसाळ्याची. म्हटलं तर नियतकाल. साधारण चार महिन्यांचा. उभ्या रानाला चिंब साज देणारा... इंद्रधनू पालखीचा... काळ्या-कभिन्न मेघांचा... गोंधलेल्या धरणीचा... कवी मनाला सृजनाचं दान देणारा...हा रुतू असतो पाऊस गाण्यांचा आणि कवितांचाही. पाऊस जसा गर्द मेघातून डोकावतो. तसा तो खूप प्राचीन म्हणून संतसाहित्यातूनही भेटतो. अर्थात यातील त्याची जातकुळी निराळी म्हणता येईल. अभंग, विराण्यांमधील त्याचं रुपदेखील वेगळं. संदर्भही वेगळे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा..’ अशा अध्यात्म लयीत पावसाला टिपलंय. भगवंताच्या भेटीची आस यातून स्वच्छ दिसते. वणवे पेटताय. सूर्य आग ओकतोय. काहिलीच्या तडाख्याने भाजून निघणाºया कवींसाठी पावसाची ओढ अनिवार अशीच. याच आळवणीतून केशवसुतांनी... ‘ऐशी होऊनिया दशा दिवस ते झाले बहु, पावसा ये आता तर तू, त्वरा करुनिया लंकेवरुनी असा. झंझावात यावरी बसुनिया या पश्चिमाब्धीवरी लाटा झोडित, गर्जना करित ये, बा मेघराजा, तरी...’ असं साकडं पावसाला घातलंय. आपला आर्तस्वर पावसाच्या कानापर्यंत पोहचलाय, असं वाटतं आणि आभाळ भरुनही येतं. कोणत्याही क्षणी त्याचा बांध फुटेल. इतकी दाटीवाटी असतानाही तो स्थिर चित्तच. पावसाचे हेच रुप आरती प्रभू...‘जमतें आहे ढगात पाणी,अजून परंतु ढगचि फुटेना, आणि विजेचा जराजराही त्या पाण्यातून देठ तुटेना...’ अशा हेकेखोर शब्दात पकडतात. शिगोशिग भरलेलं आभाळ कोसळलं की, ना.घ.देशपांडे यांच्यासारखा कवी...‘चिंब झाली पावसाने रानोवने, वर्षती येथे सखीची पावसाळी लोचने’ अशी ओली काजळरेषा उमटवून जातो. पावसाची ही धुंद सफर बा.भ.बोरकर गुढरम्य गुंजनात ऐकवून जातात. ती अशी... ‘मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधुन, वनात गेला मोर भिजून, घुमतो पांवा सांग कुठून?’ बा.भ.बोरकर यांचा हाच भाव पुढे नेताना मंगेश पाडगावकर लिहितात... ‘कोसळली सर दक्षिण उत्तर, घमघमले मातींतुनि अत्तर, अष्टदिशांतुन अभीष्टचिंतन, घुमला जयजयकार, पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार...’‘चिंब पावसानं रान झालं आबादानि' पावसाच्या कौतुक सोहळ्याचे असे ढोल वाजविणारी ना.धों.महानोर यांची कविता पावसाचे अनेकविध रंगही दाखवते... ‘पाऊस रात्रीचा कभिन्ह-माध्यान्ही धसमुसता, काळा, वैºयासारखा...’ असे भयकंपीत दर्शनदेखील महानोर यांची कविता घडविते. ‘बाई पाऊस पाऊस कोसळतो एकचित्त, खमंग लोणच्याशी हवा वाफेचाच भात...' पावसाची अशी साजूक सात्विकता इंदिरा संत यांच्या कवितांमधून भेटते. कोसळत्या पावसात आळवणी करताना ‘ग्रेस’ लिहून जातात... ‘पाऊस आला पाऊस आला गारांचा वर्षाव, गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव...’ अवलिया सुरेश भटांचा बाजच वेगळा. कडक तितकाच मऊसूत. ‘काळ्याकाळ्या मेघांआडुन, क्षणभर चमकुन गेली बिजली, जणू मोकळ्या केसांमधुनी, पाठ तुझी मज गोरी दिसली...’ भटांच्या गझलेतील हा रोमान्स मोहवून टाकतो.हरेक कवी, साहित्यिकाची अनुभूती देणारी वाट वेगळी असते. म्हणूनच नामदेव ढसाळ... ‘जारे जारे पावसा, तुला देतो पैसा... वादळी सामुद्रिकात शरणावत झोपड्यांची करवंदी कलेवरे...पावसाला पोळवा, पावसाला भाजवा, विस्तव आणा विस्तव पाडा...’ असं खणखणीत पावसालाच सुनावून टाकतात. खरंच पाऊस नसतो हळवा. दि.पु.चित्रे यांच्या कवितेतून ते ठाशीवपणे उमटते... ‘पाऊस पाऊस पाऊस, थेंबांचे तुटले ऊस, उघडा झाला माझा गळा, उफराटा उगवला मळा...’काळ बदलतोय. पावसाची रुपेही बदललीय. तथापि, त्याच्यातील सृजन पेरा मात्र कदापि लुप्त होणार नाही. तो अनादी आणि अदिम, अनंत असला तरी प्रत्येक रुतूत तो असतो मोहतुंबी. ताजाही. जोवर पाऊस आहे, तोवर शब्दांनाही ओल राहणारच. आॅनलाईन आणि आॅफलाईन युगातही त्याने आपली सादगी जपलीय चिरंतन...-जिजाबराव वाघ

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Chalisgaonचाळीसगाव