शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

जनकल्याण समितीचा उपक्रम : जळगावात झोपडपट्टीतील मुलांना देशभक्तीसह संस्काराचे सिंचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 10:26 IST

लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे.

विजयकुमार सैतवाल  जळगाव : लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे. दररोज संध्याकाळी वाल्मीकनगर या भागात या मुलांच्या मुखातून विविध तालबद्ध स्तोत्र कानी पडत असल्याचे सुखावह चित्र आहे. जळगावातील वाल्मीकनगर या भागात २०१२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्यावतीने बाल संस्कार केंद्र चालविले जात आहे. यामाध्यमातून संस्कारी पिढी घडविण्याचे काम समितीच्यावतीने अविरतपणे सुरू आहे.

एरव्ही झोपडपट्टी भागातील मुलांकडे फारसे कोणी लक्ष देत नाही व मोल मजुरीमुळे ते शिक्षणापासूनही दूर राहतात. मात्र या मुलांनादेखील आपल्या संस्कृती, देवदेवतांची माहिती, राष्ट्रीय पुरुष व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी समितीच्यावतीने पुढाकार घेऊन संस्कार रुजविण्याचे कार्य हाती घेण्यात आले. याठिकाणी रवींद्र अरविंद शुक्ल हे भारतीय संस्कृतीची ओळख या मुलांना करून देत आहे.सुरुवातीला या ठिकाणी चार ते पाच मुले यायची. हळूहळू त्यात वाढ होऊन सहा ते १३ वर्षे वयोगटातील मुलांची ही संख्या २५ ते ३० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यामध्ये १२-१३ मुली तर १५-१६ मुले असतात.

दररोज संध्याकाळी ही सर्व मुले या केंद्रात एकत्र येतात व हात जोडून, एका स्वरात रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा यासह विविध स्तोत्र पठण करून घेतले जातात. आता तर या मुलांचे हे स्तोत्र तोंडपाठ झाले असून दररोज संध्याकाळी या परिसरात लहानग्यांच्या मुखातून हे तालबद्ध स्वर ऐकून येणाऱ्या-जाणा-याचे आपसूकच लक्ष वेधले जाते. या सोबतच या ठिकाणी राष्ट्रीय पुरुषांची माहिती देऊन त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करून दिली जाते.

याचाच एक सुखद अनुभव सांगताना समितीतील जिल्हा आरोग्य आयाम प्रमुख नरेंद्र शुक्ल म्हणाले की, निबंध स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयावरील निबंध लिहिण्यासाठी या केंद्रातून मुलांना रात्रीच्या वेळी पुस्तक उपलब्ध करून दिले व सकाळी या निबंध स्पर्धेत याच मुलाने पारितोषिक मिळविले. त्यामुळे या केंद्रातून संस्कार रुजविले जात असल्याची भावना निर्माण होऊन हे केंद्र मुलांना आधार वाटू लागले आहे व इकडे त्यांची ओढ वाढत आहे. मुलांमध्ये देशभक्तीचीही ज्योत जागविण्याचेही काम हे केंद्र करीत आहे.