शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जनकल्याण समितीचा उपक्रम : जळगावात झोपडपट्टीतील मुलांना देशभक्तीसह संस्काराचे सिंचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 10:26 IST

लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे.

विजयकुमार सैतवाल  जळगाव : लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे. दररोज संध्याकाळी वाल्मीकनगर या भागात या मुलांच्या मुखातून विविध तालबद्ध स्तोत्र कानी पडत असल्याचे सुखावह चित्र आहे. जळगावातील वाल्मीकनगर या भागात २०१२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्यावतीने बाल संस्कार केंद्र चालविले जात आहे. यामाध्यमातून संस्कारी पिढी घडविण्याचे काम समितीच्यावतीने अविरतपणे सुरू आहे.

एरव्ही झोपडपट्टी भागातील मुलांकडे फारसे कोणी लक्ष देत नाही व मोल मजुरीमुळे ते शिक्षणापासूनही दूर राहतात. मात्र या मुलांनादेखील आपल्या संस्कृती, देवदेवतांची माहिती, राष्ट्रीय पुरुष व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी समितीच्यावतीने पुढाकार घेऊन संस्कार रुजविण्याचे कार्य हाती घेण्यात आले. याठिकाणी रवींद्र अरविंद शुक्ल हे भारतीय संस्कृतीची ओळख या मुलांना करून देत आहे.सुरुवातीला या ठिकाणी चार ते पाच मुले यायची. हळूहळू त्यात वाढ होऊन सहा ते १३ वर्षे वयोगटातील मुलांची ही संख्या २५ ते ३० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यामध्ये १२-१३ मुली तर १५-१६ मुले असतात.

दररोज संध्याकाळी ही सर्व मुले या केंद्रात एकत्र येतात व हात जोडून, एका स्वरात रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा यासह विविध स्तोत्र पठण करून घेतले जातात. आता तर या मुलांचे हे स्तोत्र तोंडपाठ झाले असून दररोज संध्याकाळी या परिसरात लहानग्यांच्या मुखातून हे तालबद्ध स्वर ऐकून येणाऱ्या-जाणा-याचे आपसूकच लक्ष वेधले जाते. या सोबतच या ठिकाणी राष्ट्रीय पुरुषांची माहिती देऊन त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करून दिली जाते.

याचाच एक सुखद अनुभव सांगताना समितीतील जिल्हा आरोग्य आयाम प्रमुख नरेंद्र शुक्ल म्हणाले की, निबंध स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयावरील निबंध लिहिण्यासाठी या केंद्रातून मुलांना रात्रीच्या वेळी पुस्तक उपलब्ध करून दिले व सकाळी या निबंध स्पर्धेत याच मुलाने पारितोषिक मिळविले. त्यामुळे या केंद्रातून संस्कार रुजविले जात असल्याची भावना निर्माण होऊन हे केंद्र मुलांना आधार वाटू लागले आहे व इकडे त्यांची ओढ वाढत आहे. मुलांमध्ये देशभक्तीचीही ज्योत जागविण्याचेही काम हे केंद्र करीत आहे.