शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

By admin | Published: June 08, 2017 4:56 PM

35 एमएलडी पाण्याचा पुनर्वापर : दीपनगर वीज केंद्राला देणार पाणी

 ऑनलाईन लोकमत विशेष/पंढरीनाथ गवळी

भुसावळ, दि.8 - भुसावळ शहरातील तब्बल  35 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो तातडीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर
पालिकेच्या या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील पाण्यावर वीज निर्मिती करणे शक्य असल्याने भुसावळ पालिका या सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शहराजवळील महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला विकत देणार आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी तापीनदीतून जे पाणी उचलले जात आहे त्याची बचत होईल. यामुळे पालिकेला कायम स्वरुपी चांगले उत्पन्न मिळेल  व  पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
दरम्यान, सांडपाण्यावर प्रक्रिया झालेले पाणी दीपनगर प्रशासनाला वीज निर्मितीसाठी दिल्यानंतर दीपनगरातील शुद्ध पाणी भुसावळकरांना देण्याचेही नियोजन आहे.
शहरातून रोज निघणारे सुमारे 35 एमएलडी सांडपाणी शहराजवळील तापीनदीत जाते. त्यामुळे तापीनदीतील पाणी अशुद्ध होते. शहरातील सांडपाणी तापीनदीत न सोडता ते एका ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पालिका सुरू करणार आहे, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे, असेही  रमण भोळे म्हणाले.
अमृत योजनेत समावेश
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत पालिकेचा समावेश आहे. अमृत योजनेतूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कंडारी गावाचाही समावेश
भुसावळ शहराजवळील कंडारी या सुमारे 20 हजार लोकसंख्येच्या गावातील सांडपाण्यावर देखील भविष्यात पालिका प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करेल. कंडारी व परीसरातील सांडपाणी नदी पात्रात जावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे कंडारी ग्रा.पं.ला उत्पन्न मिळेल.
सांडपाण्यावर वीज निर्मिती
भुसावळ शहरातून तापीनदीत जाणारे 35 एमएलडी सांडपाणी तापीनदी काठावर एका ठराविक जागी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पातून निघणारे पाणी पाईप लाईनद्वारे येथून पाच कि.मी.अंतरावरील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला ते विकण्यात येईल. त्यातून भुसावळ पालिकेला उत्पन्न मिळेल.
अमृत योजनेची देण
भुसावळ पालिकेचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समावेश झाली बाब शहरवासीयांसाठी आनंदाची आहे. याच योजनेतून शहरातील सांडपाण्यावर (रिसायकलिंग) प्रक्रिया करुन त्याचा वीज निर्मितीसारख्या कार्यासाठी वापर करणे ही भूषणावह बाब ठरणार आहे. असा प्रकल्प नागपूर महापालिका राबवित आहे. त्यातून त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
मॉडेल प्रकल्प..
भुसावळ पालिकेचा हा सांडपाणी शुद्धीकरण पुनर्वापर  प्रकल्प नाशिक महसूल विभागासह राज्यात आदर्श (मॉडेल प्रोजेक्ट) प्रकल्प राहील. यासाठी आतापासूनच आमचे नियोजन सुरू आहे. तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. तांत्रिक बाबींसह प्रस्ताव तयार केला जात आहे, असे भोळे म्हणाले.
दोन लाख नागरिकांना विम्याचे कवच
भुसावळ पालिका शहरात विविध विकासाचे प्रकल्प राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे, फॅक्टरी आणि वीज कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातील प्रत्येक रहिवाशाला पालिकेकडून विम्याचे कवच दिले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भुसावळ शहराची सुमारे दोन लाख इतकी लोकसंख्या आहे. या दोन लाख लोकांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाला पालिका दोन लाख रुपयांचे विमा कवच देईल. कोणावर दु:खद प्रसंग ओढवला तर अशा व्यक्तीला त्याचा फायदा होईल.