शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची आश्वासनपूर्ती म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं : खासदार शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:46 IST

या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

ठळक मुद्देभडगावातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सरकारवर हल्लाबोलसौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभदोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

जळगाव : साडे चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, उद्योजकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित आश्वासने दिले. मात्र या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.भडगाव येथे सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा रविवारी दुपारी ३ वाजता झाला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या भडगाव येथील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.दोन वर्षात १३ हजार शेतकºयांच्या आत्महत्याशेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत शेतमालाला भाव मात्र मिळत नाही. त्यामुळे या दोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यकर्ते यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही हे आत्महत्या वाढण्याचे मूळ कारण आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आजही निम्मे शेतकºयांना याचा लाभ झालेला नाही.७१ हजार कोटींची कर्जमाफी दिलीपंतप्रधान मनमोहनसिंग व आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. त्यानंतर पंतप्रधान व आम्ही त्या कुटुंबियांची भेट घेतली होती. थकीत कर्जाची बँकेची नोटीस हे आत्महत्येचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पिक कर्ज १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले तसेच नियमित फेड करणाºयांना शून्य टक्के दराने कर्ज वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.मोदींच्या राज्यात जीव देण्याशिवाय पर्याय नाहीज्यांच्या हातात सरकार आहे ते नुसते घोषणा करीत आहेत. मात्र या घोषणांची अंमलबजावणी मात्र करीत नाहीत. मोदी सरकारच्या राज्यात शेतकरी व कष्टकºयांना जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव