शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मोदी सरकारची आश्वासनपूर्ती म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं : खासदार शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:46 IST

या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

ठळक मुद्देभडगावातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सरकारवर हल्लाबोलसौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभदोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

जळगाव : साडे चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, उद्योजकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित आश्वासने दिले. मात्र या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.भडगाव येथे सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा रविवारी दुपारी ३ वाजता झाला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या भडगाव येथील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.दोन वर्षात १३ हजार शेतकºयांच्या आत्महत्याशेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत शेतमालाला भाव मात्र मिळत नाही. त्यामुळे या दोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यकर्ते यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही हे आत्महत्या वाढण्याचे मूळ कारण आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आजही निम्मे शेतकºयांना याचा लाभ झालेला नाही.७१ हजार कोटींची कर्जमाफी दिलीपंतप्रधान मनमोहनसिंग व आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. त्यानंतर पंतप्रधान व आम्ही त्या कुटुंबियांची भेट घेतली होती. थकीत कर्जाची बँकेची नोटीस हे आत्महत्येचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पिक कर्ज १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले तसेच नियमित फेड करणाºयांना शून्य टक्के दराने कर्ज वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.मोदींच्या राज्यात जीव देण्याशिवाय पर्याय नाहीज्यांच्या हातात सरकार आहे ते नुसते घोषणा करीत आहेत. मात्र या घोषणांची अंमलबजावणी मात्र करीत नाहीत. मोदी सरकारच्या राज्यात शेतकरी व कष्टकºयांना जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव