शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोदी सरकारची आश्वासनपूर्ती म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं : खासदार शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:46 IST

या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

ठळक मुद्देभडगावातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सरकारवर हल्लाबोलसौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभदोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

जळगाव : साडे चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, उद्योजकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित आश्वासने दिले. मात्र या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.भडगाव येथे सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा रविवारी दुपारी ३ वाजता झाला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या भडगाव येथील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.दोन वर्षात १३ हजार शेतकºयांच्या आत्महत्याशेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत शेतमालाला भाव मात्र मिळत नाही. त्यामुळे या दोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यकर्ते यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही हे आत्महत्या वाढण्याचे मूळ कारण आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आजही निम्मे शेतकºयांना याचा लाभ झालेला नाही.७१ हजार कोटींची कर्जमाफी दिलीपंतप्रधान मनमोहनसिंग व आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. त्यानंतर पंतप्रधान व आम्ही त्या कुटुंबियांची भेट घेतली होती. थकीत कर्जाची बँकेची नोटीस हे आत्महत्येचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पिक कर्ज १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले तसेच नियमित फेड करणाºयांना शून्य टक्के दराने कर्ज वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.मोदींच्या राज्यात जीव देण्याशिवाय पर्याय नाहीज्यांच्या हातात सरकार आहे ते नुसते घोषणा करीत आहेत. मात्र या घोषणांची अंमलबजावणी मात्र करीत नाहीत. मोदी सरकारच्या राज्यात शेतकरी व कष्टकºयांना जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव