शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्रधानमंत्री किसान सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील ९.५० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील ९.५० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील १९ हजार कोटीहून अधिक रक्कम बँक खात्यात हस्तांतरण करण्‍यात आली आहे.

हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फेब्रुवारी-२०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रूपये १.१५ लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून १३ मे, २०२ अखेर १०५.३० लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण ११ हजार ६९४ कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच १४ मे रोजीच्या कार्यक्रमात १ एप्रील ते ३१ जुलै या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण ९५.९१ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रूपये १ हजार ९१८ कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.