शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:35 IST

मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र हैराण

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये केवळ वांग्यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव महिनाभराच्या तुलनेत ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढून ते १००० ते २१०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र कांदा, भेंडी, कारले, कोथिंबीर, टमाटे यांचे भावदेखील कमी झाले आहे.सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील विविध भागांसह शेजारील औरंगाबाद व धुळे जिल्ह्यातूनही भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी होण्यास मदत होत आहे.कोथिंबीरच्या भावात घसरणमध्यंतरी कोथिंबीरचे भाव वाढून ती २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र हळूहळू आवक वाढत गेली व या आठवड्यात तर कोथिंबीरचे भाव केवळ ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. अशाच प्रकारे बटाट्याची आवक ३०० क्विंटलवर पोहचली असून त्याचे भाव निम्याने कमी होऊन ते ३७५ ते ६२५ रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.मेथी भाजी १० रुपयांवरहिवाळी वातावरणात हिरवा पालेभाजा खाण्यास मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे या दिवसात मेथी, पोकळा, शेपू-पालक, आंबडचुका यांना मागणी वाढते. त्यामुळे त्यांचे भावदेखील वाढू लागतात. मात्र यंदा या हिरव्या भाज्यांची आवकही वाढल्याने भाव नियंत्रणात राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे सध्या मेथीची भाजी केवळ १० रुपये प्रती किलोवर आली आहे. या शिवाय पोकळादेखील १० रुपये प्रती किलोवर असून पालक १८ रुपये प्रती किलोवर आला आहे.या शिवाय लाल कांदा २५० ते ६२५ रुपये प्रती क्विंटल, पांढरा कांदा ३७५ ते ७५० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. फूलकोबी ८०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ५०० ते ९०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे.किरकोळ बाजारात दर कमी होण्याची अपेक्षाकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कमी आहे. किरकोळ बाजारातही हे दर कमी झाले असले तरी ज्या प्रमाणात कृउबात दर कमी झाले आहे त्या तुलनेत किरकोळ बाजारात अजून भाज्याचे दर कमी होण्याची अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत.किरकोळ बाजारातील भाज्यांचे दरकिरोकळ बाजारात कोथिंबीर ५० ते ६० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. मेथी भाजी ४० ते ५० रुपये, कारले ४० रुपये, पानकोबी - ३० ते ४० रुपये, फूलकोबी - ५० ते ६० रुपये, शेवगा शेंगा ४० ते ५० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, पोकळा - ३० ते ४० रुपये, कांदा - १० ते १५ रुपये, बटाटे - १५ ते २० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.शेतकरी हैराणहाती चांगले उत्पादन आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी समाधानी होत तर आहे, मात्र बाजारात त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने तो हैराण होत आहे. दिवसेंदिवस भाज्यांचे दर कमी-कमी होत असल्याने भाजीपाला उत्पादक मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याJalgaonजळगाव