शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:35 IST

मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र हैराण

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये केवळ वांग्यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव महिनाभराच्या तुलनेत ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढून ते १००० ते २१०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र कांदा, भेंडी, कारले, कोथिंबीर, टमाटे यांचे भावदेखील कमी झाले आहे.सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील विविध भागांसह शेजारील औरंगाबाद व धुळे जिल्ह्यातूनही भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी होण्यास मदत होत आहे.कोथिंबीरच्या भावात घसरणमध्यंतरी कोथिंबीरचे भाव वाढून ती २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र हळूहळू आवक वाढत गेली व या आठवड्यात तर कोथिंबीरचे भाव केवळ ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. अशाच प्रकारे बटाट्याची आवक ३०० क्विंटलवर पोहचली असून त्याचे भाव निम्याने कमी होऊन ते ३७५ ते ६२५ रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.मेथी भाजी १० रुपयांवरहिवाळी वातावरणात हिरवा पालेभाजा खाण्यास मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे या दिवसात मेथी, पोकळा, शेपू-पालक, आंबडचुका यांना मागणी वाढते. त्यामुळे त्यांचे भावदेखील वाढू लागतात. मात्र यंदा या हिरव्या भाज्यांची आवकही वाढल्याने भाव नियंत्रणात राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे सध्या मेथीची भाजी केवळ १० रुपये प्रती किलोवर आली आहे. या शिवाय पोकळादेखील १० रुपये प्रती किलोवर असून पालक १८ रुपये प्रती किलोवर आला आहे.या शिवाय लाल कांदा २५० ते ६२५ रुपये प्रती क्विंटल, पांढरा कांदा ३७५ ते ७५० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. फूलकोबी ८०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ५०० ते ९०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे.किरकोळ बाजारात दर कमी होण्याची अपेक्षाकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कमी आहे. किरकोळ बाजारातही हे दर कमी झाले असले तरी ज्या प्रमाणात कृउबात दर कमी झाले आहे त्या तुलनेत किरकोळ बाजारात अजून भाज्याचे दर कमी होण्याची अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत.किरकोळ बाजारातील भाज्यांचे दरकिरोकळ बाजारात कोथिंबीर ५० ते ६० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. मेथी भाजी ४० ते ५० रुपये, कारले ४० रुपये, पानकोबी - ३० ते ४० रुपये, फूलकोबी - ५० ते ६० रुपये, शेवगा शेंगा ४० ते ५० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, पोकळा - ३० ते ४० रुपये, कांदा - १० ते १५ रुपये, बटाटे - १५ ते २० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.शेतकरी हैराणहाती चांगले उत्पादन आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी समाधानी होत तर आहे, मात्र बाजारात त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने तो हैराण होत आहे. दिवसेंदिवस भाज्यांचे दर कमी-कमी होत असल्याने भाजीपाला उत्पादक मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याJalgaonजळगाव