शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

कापसाच्या ‘बीटी’ वाणांच्या किंमती निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:51 IST

खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कुंदन पाटील 

जळगाव : खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान,खरीप हंगामासाठी कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे.

या सभेत सन २०२२-२३ खरीप हंगाम व रब्बी हंगामातील बियाणे, रासायनिक खते मागणी व पुरवठयाबाबत सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगाम २०२२ मध्ये जिल्ह्यात एकुण ७ लाख ४१ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.२२ टक्के) पेरणी करण्यात आली होती. त्यासाठी ३९ हजार ६७३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते.

 खरीप हंगाम २०२३ साठी ७लाख ५६ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी सार्वजनिक व खाजगी कंपन्यांमार्फत ३८ हजार ८८१ क्विंटल बियाणे पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामबिजोत्पादन अंतर्गत १७ हजार क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकरीस्तरावर उपलब्ध आहे. 

दीड लाख टन खतांचा साठाखरीप हंगाम २०२२ मध्ये २ लाख ६८ हजार ५५० मे.टन खत पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला होता. खरीप हंगाम २०२३ साठी ३ लाख ५ हजार १४० मे. टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या १ लाख ५७ हजार ९२ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.  या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, अमळनेरचे उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, पाचोऱ्याचे विजय पवार, जि.प.चे मोहिम अधिकारी अरूण तायडे, जिल्हा डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेद्र काबरा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विक्रेते यावेळी उपस्थित होते.

पावणे सहा लाख पाकिटांची मागणी येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरीत कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापूस बियाण्याच्या संभाव्य ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रासाठी २५ लाख ५० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली आहे. निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव