शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

कापसाच्या ‘बीटी’ वाणांच्या किंमती निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:51 IST

खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कुंदन पाटील 

जळगाव : खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान,खरीप हंगामासाठी कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे.

या सभेत सन २०२२-२३ खरीप हंगाम व रब्बी हंगामातील बियाणे, रासायनिक खते मागणी व पुरवठयाबाबत सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगाम २०२२ मध्ये जिल्ह्यात एकुण ७ लाख ४१ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.२२ टक्के) पेरणी करण्यात आली होती. त्यासाठी ३९ हजार ६७३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते.

 खरीप हंगाम २०२३ साठी ७लाख ५६ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी सार्वजनिक व खाजगी कंपन्यांमार्फत ३८ हजार ८८१ क्विंटल बियाणे पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामबिजोत्पादन अंतर्गत १७ हजार क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकरीस्तरावर उपलब्ध आहे. 

दीड लाख टन खतांचा साठाखरीप हंगाम २०२२ मध्ये २ लाख ६८ हजार ५५० मे.टन खत पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला होता. खरीप हंगाम २०२३ साठी ३ लाख ५ हजार १४० मे. टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या १ लाख ५७ हजार ९२ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.  या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, अमळनेरचे उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, पाचोऱ्याचे विजय पवार, जि.प.चे मोहिम अधिकारी अरूण तायडे, जिल्हा डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेद्र काबरा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विक्रेते यावेळी उपस्थित होते.

पावणे सहा लाख पाकिटांची मागणी येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरीत कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापूस बियाण्याच्या संभाव्य ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रासाठी २५ लाख ५० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली आहे. निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव