शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
7
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
8
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
9
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
10
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
12
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
13
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
14
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
16
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
17
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
18
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
19
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
20
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन १५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक लोकमत ...

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

१५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महावितरणतर्फे गेल्या १५ दिवसांपासून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी पंपाचे थकबाकीदार असलेल्या जळगाव जिह्यातील सुमारे साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी शासनाने कृषी पंपधारक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी वीज बिल देण्यात आले. मात्र, देण्यात आलेले वीज बिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी करीत, बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली होती. ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे जिल्हाभरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली. यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तरीदेखील ग्राहकांकडून वीज बिल भरण्यात येत नसल्यामुळे साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकी जमा झाली आहे.

इन्फो :

तर इतर ग्राहकांप्रमाणे कृषी पंपधारकांवरही कारवाई

महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्चपासून वीज बिल न भरलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये कृषी पंपधारक शेतकरी बांधवांचाही समावेश आहे. त्यानुसार गेल्या १५ दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ४९१ शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मध्ये सर्वाधिक पाचोरा विभागातील २ हजार ३५५ ग्राहकांचा तर त्या खालोखाल धरणगाव विभागातील १ हजार १२८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

इन्फो

शेतकरी बांधवांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

शासनाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच थकीत वीज बिलात ५० टक्के सवलत लागू केली आहे. तसेच थकबाकीवरील व्याज व विलंब आकारही माफ केला आहे. शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत या योजनेचा शेतकरी बांधवांना ३१ मार्च २०२२ पर्यंत लाभ घेता येणार आहे. तरी शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

इन्फो

शासनाच्या आदेशानुसार महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, यात शेतकरी बांधवांना शासनाने पहिल्यांदाच कृषी पंपाच्या थकबाकी वीज बिलावर ५० टक्के सवलत दिली आहे. त्यांनी तत्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. तसेच ज्या गावातून कृषी पपांची जितकी वसुली होईल, त्यातील ३३ टक्के निधी त्या गावातील विजेच्या विकास कामांवरच खर्च करण्यात येणार आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण

इन्फो

विभागनिहाय वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्याकडील थकबाकी

विभाग ग्राहक थकबाकी

१) भुसावळ : ७०३ ६ कोटी ४२ लाख ६४ हजार

२) चाळीसगाव ९५४ १ कोटी ४९ लाख २ हजार

३) धरणगाव : ११२८, ५ कोटी १ लाख ४ हजार

४) जळगाव ग्रामीण : १४५, १ कोटी १८ लाख ५९ हजार

५) मुक्ताईनगर : ३३८, १ कोटी ७७ लाख २४ हजार

६) पाचोरा : २ ३२५, ४ कोटी ३५ लाख ९ हजार

७) सावदा : ८९९, १४ कोटी २६ लाख २७ हजार

एकूण : ६ ४९१, ३४ कोटी ५१ लाख ६ हजार

इन्फो

जिल्हाभरात २ हजाराहून अधिक थकबाकी

महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात सध्या ३ लाखांच्या घरात कृषी पंप ग्राहकांची संख्या असून, त्यांच्याकडे सद्यस्थितीला २ हजार कोटींच्या घरात थकबाकी आहे. तर वसुली फक्त १० टक्केच झाली असल्याचे सांगण्यात आले.