शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन १५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक लोकमत ...

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

१५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महावितरणतर्फे गेल्या १५ दिवसांपासून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी पंपाचे थकबाकीदार असलेल्या जळगाव जिह्यातील सुमारे साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी शासनाने कृषी पंपधारक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी वीज बिल देण्यात आले. मात्र, देण्यात आलेले वीज बिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी करीत, बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली होती. ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे जिल्हाभरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली. यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तरीदेखील ग्राहकांकडून वीज बिल भरण्यात येत नसल्यामुळे साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकी जमा झाली आहे.

इन्फो :

तर इतर ग्राहकांप्रमाणे कृषी पंपधारकांवरही कारवाई

महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्चपासून वीज बिल न भरलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये कृषी पंपधारक शेतकरी बांधवांचाही समावेश आहे. त्यानुसार गेल्या १५ दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ४९१ शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मध्ये सर्वाधिक पाचोरा विभागातील २ हजार ३५५ ग्राहकांचा तर त्या खालोखाल धरणगाव विभागातील १ हजार १२८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

इन्फो

शेतकरी बांधवांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

शासनाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच थकीत वीज बिलात ५० टक्के सवलत लागू केली आहे. तसेच थकबाकीवरील व्याज व विलंब आकारही माफ केला आहे. शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत या योजनेचा शेतकरी बांधवांना ३१ मार्च २०२२ पर्यंत लाभ घेता येणार आहे. तरी शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

इन्फो

शासनाच्या आदेशानुसार महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, यात शेतकरी बांधवांना शासनाने पहिल्यांदाच कृषी पंपाच्या थकबाकी वीज बिलावर ५० टक्के सवलत दिली आहे. त्यांनी तत्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. तसेच ज्या गावातून कृषी पपांची जितकी वसुली होईल, त्यातील ३३ टक्के निधी त्या गावातील विजेच्या विकास कामांवरच खर्च करण्यात येणार आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण

इन्फो

विभागनिहाय वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्याकडील थकबाकी

विभाग ग्राहक थकबाकी

१) भुसावळ : ७०३ ६ कोटी ४२ लाख ६४ हजार

२) चाळीसगाव ९५४ १ कोटी ४९ लाख २ हजार

३) धरणगाव : ११२८, ५ कोटी १ लाख ४ हजार

४) जळगाव ग्रामीण : १४५, १ कोटी १८ लाख ५९ हजार

५) मुक्ताईनगर : ३३८, १ कोटी ७७ लाख २४ हजार

६) पाचोरा : २ ३२५, ४ कोटी ३५ लाख ९ हजार

७) सावदा : ८९९, १४ कोटी २६ लाख २७ हजार

एकूण : ६ ४९१, ३४ कोटी ५१ लाख ६ हजार

इन्फो

जिल्हाभरात २ हजाराहून अधिक थकबाकी

महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात सध्या ३ लाखांच्या घरात कृषी पंप ग्राहकांची संख्या असून, त्यांच्याकडे सद्यस्थितीला २ हजार कोटींच्या घरात थकबाकी आहे. तर वसुली फक्त १० टक्केच झाली असल्याचे सांगण्यात आले.