शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन १५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक लोकमत ...

महावितरण : शेतकरी बांधवांनी ५० टक्के वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

१५ दिवसातील कारवाई : महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महावितरणतर्फे गेल्या १५ दिवसांपासून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी पंपाचे थकबाकीदार असलेल्या जळगाव जिह्यातील सुमारे साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी शासनाने कृषी पंपधारक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी वीज बिल देण्यात आले. मात्र, देण्यात आलेले वीज बिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी करीत, बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली होती. ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे जिल्हाभरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली. यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तरीदेखील ग्राहकांकडून वीज बिल भरण्यात येत नसल्यामुळे साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकी जमा झाली आहे.

इन्फो :

तर इतर ग्राहकांप्रमाणे कृषी पंपधारकांवरही कारवाई

महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्चपासून वीज बिल न भरलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये कृषी पंपधारक शेतकरी बांधवांचाही समावेश आहे. त्यानुसार गेल्या १५ दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ४९१ शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मध्ये सर्वाधिक पाचोरा विभागातील २ हजार ३५५ ग्राहकांचा तर त्या खालोखाल धरणगाव विभागातील १ हजार १२८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

इन्फो

शेतकरी बांधवांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

शासनाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच थकीत वीज बिलात ५० टक्के सवलत लागू केली आहे. तसेच थकबाकीवरील व्याज व विलंब आकारही माफ केला आहे. शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत या योजनेचा शेतकरी बांधवांना ३१ मार्च २०२२ पर्यंत लाभ घेता येणार आहे. तरी शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

इन्फो

शासनाच्या आदेशानुसार महावितरणतर्फे सर्व प्रकारच्या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, यात शेतकरी बांधवांना शासनाने पहिल्यांदाच कृषी पंपाच्या थकबाकी वीज बिलावर ५० टक्के सवलत दिली आहे. त्यांनी तत्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. तसेच ज्या गावातून कृषी पपांची जितकी वसुली होईल, त्यातील ३३ टक्के निधी त्या गावातील विजेच्या विकास कामांवरच खर्च करण्यात येणार आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण

इन्फो

विभागनिहाय वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्याकडील थकबाकी

विभाग ग्राहक थकबाकी

१) भुसावळ : ७०३ ६ कोटी ४२ लाख ६४ हजार

२) चाळीसगाव ९५४ १ कोटी ४९ लाख २ हजार

३) धरणगाव : ११२८, ५ कोटी १ लाख ४ हजार

४) जळगाव ग्रामीण : १४५, १ कोटी १८ लाख ५९ हजार

५) मुक्ताईनगर : ३३८, १ कोटी ७७ लाख २४ हजार

६) पाचोरा : २ ३२५, ४ कोटी ३५ लाख ९ हजार

७) सावदा : ८९९, १४ कोटी २६ लाख २७ हजार

एकूण : ६ ४९१, ३४ कोटी ५१ लाख ६ हजार

इन्फो

जिल्हाभरात २ हजाराहून अधिक थकबाकी

महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात सध्या ३ लाखांच्या घरात कृषी पंप ग्राहकांची संख्या असून, त्यांच्याकडे सद्यस्थितीला २ हजार कोटींच्या घरात थकबाकी आहे. तर वसुली फक्त १० टक्केच झाली असल्याचे सांगण्यात आले.