शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

पाॕझिटिव्ह स्टोरी-  चाळीसगावी कोरोना रुग्णांची अक्षयतृतीया गोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 2:10 PM

शुक्रवारी कोरोना बाधितांची अक्षयतृतीया पर्वणी मोफत अन्नसेवा पुरविणा-या मित्र मंडळांसह सामाजिक संघटनांनी 'गोड' केली.

ठळक मुद्देमोफत पुरणपोळी व आंब्याचा रस शिवभोजन थाळीतही स्वीट मेनू

चाळीसगाव :  कोरोनाने सणासुदीचा आनंद हिरावलाय.  अत्यंत साध्या पद्धतीनेही का असेना सण साजरे होत आहे. यातून सणाचा पारंपरिक गोडवादेखील जपला जातोय. शुक्रवारी कोरोना बाधितांची अक्षयतृतीया पर्वणी मोफत अन्नसेवा पुरविणा-या मित्र मंडळांसह सामाजिक संघटनांनी 'गोड' केली. त्यांना खान्देशी मेनू असलेले पुरणपोळी व आंब्याचा रस, तिखट आमटी, भात असे सुग्रास ताट वाढले.  शहरातील दोन्ही शिवभोजन केंद्रांवर अक्षयतृतीयेची स्वीट थाळी देण्यात आली. यापर्वणीवर गरजूंनी समाधान व्यक्त केले आहे.शहरात दहाहून अधिक खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. बहुतांशी रुग्णालये फुल्ल झाले आहे. जवळपास तीनशे रुग्ण येथे उपचार घेत आहे. त्यांच्यासोबत नातेवाईकही आहेत. कोरोना काळात नाती दुरावली. अगदी रक्ताच्या नात्यांची वीण उसवली. मृतदेहांचे परस्पर अत्यसंस्कार करावे लागत आहे. तथापि, अशा भयावह व कठीण काळात सामाजिक संघटना, मित्रमंडळे, समाजमंडळे माणुसकीचा आधार घेऊनच पुढे आली आहेत. शहरात कोरोनाच्या दुस-या लाटेत उद्योजक वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ, तेली समाज मंडळातर्फे कोरोनाबाधित व त्यांच्या सोबत असणा-या नातेवाईकांसाठी मोफत अन्नसेवा सुरू करण्यात आली आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिवभोजन थाळीत आंब्याचा रसशहरात भडगाव रोडस्थित चुलामृत व घाट रोडलगत असणा-या शिवमल्हार शिवभोजन केंद्रांवर शुक्रवारी अक्षयतृतीयानिमित्त मोफत थाळीत आंब्याचा रस, साधी पोळी, वरण भात असा मेनू देण्यात आला. दोन्ही केंद्रांवर गरजूंना ३०० थाळ्या वाटण्यात आल्या. गरजूंची आखाजीही गोड झाली आहे, अशी प्रतिक्रिया चुलामृत शिवभोजन केंद्राचे राहुल राजपूत यांनी  ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

तेली समाजाची अन्नसेवाही 'गोड'संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृतींचा जागर करीत येथील तेली समाजातर्फे कोरोनाबाधित व त्यांच्यासोबत असणा-या नातेवाईकांसाठी मोफत अन्नसेवा सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयात भ्रमणध्वनी देण्यात आले आहे. आखाजीनिमित्त अन्नसेवेत गोड पदार्थ म्हणून सोनपापडी देण्यात आली. दरदिवशी ८० ते १०० गरजूंना जेवण पुरविले जाते.

धाडीवाल मित्रमंडळाची गोड अन्नवारीगेल्या दोन महिन्यांपासून उद्योजक वर्धमान धाडिवाल मित्र मंडळामार्फत कोरोनाबाधित व त्यांच्या सोबत असणा-या नातेवाईकांना मोफत थेट रुग्णालयांमध्ये जेवण दिले जात आहे. अक्षयतृतीयेची पर्वणीही गोड करण्यात आली. पुरणपोळी, आंब्याचा रस, तिखट मसाला आमटी, भात व कांदा - लिंबू असा अस्सल खान्देशी मेनू आखाजीच्या थाळीत वाढण्यात आला. घरासह आपल्या माणसांपासून दुरावलेल्या रुग्णांच्या मनावर मायेची फुकंर मारण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. अशी भावना वर्धमान धाडिवाल यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केली. सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, वीरशैव गवळी समाजाचे विजय गवळी, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल आदींनी या अन्नवारीची पालखी खांद्यावर घेतली आहे.