शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना शेतकऱ्यांचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 21:09 IST

प्रचंड पिकांचे नुकसान : शेतकरी बांधव हवालदील ; आणखी मदतीची अपेक्षा

नशिराबाद - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला़ अन् यात शेतकरी राजा होरपळला गेला़ शासनाकडून मदत जरी जाहीर करण्यात आली असली तरी खर्चीचा मोह व सत्तेचा ध्यास धरणाºया सर्वच राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचा विसर पडलाय दिसतो़राजकारण्यांच्या आडमुठेपणामुळे सरकार स्थापन होत नाही़ त्यामुळे शेतकºयांना शासनाची मदत मिळणार कधी याची प्रतीक्षा आहे़ दरम्यान, शेतकरी बांधवांना जाहीर झालेली मदतही आणखी वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी राजाकडून होत आहे़ मात्र, सरकार स्थापनेच्या घोळात जगाचा पोशिंदा मानल्या जोणाºया शेतकºयांला का कोणती सवलत त्वरित दिली जाते नाही, कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. कधी सरकार मारते तर कधी निसर्ग शेतकºयाला मारतोय असे स्थिती झाली आहे़यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडाला असून नशिराबाद परिसरातील शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे शेतातील सर्व पिके उध्वस्त केली आहेत.पोशिंदा आर्थिक विवंचनेतचांगला पाऊस पडला नाही तरी शेतकºयाला चिंता असते आणि पाऊस जास्त प्रमाणात पडला तरी देखील शेतकºयाचे नुकसान होते़ यंदा अवकाळी पावसाने तर खूपच मोठा फटका दिला आहे. रब्बीची पेरणी कशी करावी याच्या आर्थिक विवंचनेत शेतकरी आहे. आश्वासनांची खैरात करणारे राजकीय पक्ष व नेते सत्तारूढ होण्यासाठी व्यस्त आहे. मात्र शेतकºयांची दखल घेत न्याय द्यावा व अधिक मदत करावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे़ संजय काळे शेतकरीराष्टपती राजवट येणे हे दूर्दैव आहे.सरकार स्थापनेचा ठावठिकाणा नाही आणि अवकाळी पावसाचा मारा सुरूच आहे. बळीराजा कडे कोणी लक्ष देईना. खरीपाने कंबरडे मोडले. रब्बीची पेरणी करण्यासाठी पैसा नाही. शासनाची मदत मिळणार कधी याची प्रतीक्षा आहे. शासनाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे- डॉ.किरण चौधरी, शेतकरीपरतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले मात्र अद्याप मदत मिळाली नाही. गत कालखंडातील कोरड्या दुष्काळाचे अद्याप मदत मिळाली नाही तर आता ओल्या दुष्काळाची मदत मिळेल कधी? की शेतकरीची थट्टाच करताय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. सत्ता संघर्ष करणाºया राजकीय पक्षांनी तात्काळ सरकार स्थापन करावे शेतकºयांना न्याय द्यावा हीच अपेक्षा.- सतीश कावळे, शेतकरीअवकाळी पावसामुळे शेतकरी राजा अडचणीत आहे़ मात्र सत्तेच्या संघर्षात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा राजकीय नेत्यांना विसर पडलेला आहे. भाजप-शिवसेना स्पष्ट बहुमत असतानाही खुर्चीच्या स्वार्थासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकार स्थापन झाले तर शेतकºयांच्या डोळ्यातील अश्रू पुसतील व दिलासा देतील अपेक्षा होती मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.-हर्षल वाघुळदे, शेतकरीअवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मदत कधी येणार याची प्रतीक्षा आहे. सर्वच राजकीय पक्षांना मुख्यमंत्री पदाची लालसा असल्याने सरकार स्थापनेत अनेक अडथळे निर्माण झाले आहे. सरकार लवकर स्थापन होऊन शेतकºयांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.- कल्पेश पाटील, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव