शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना शेतकऱ्यांचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 21:09 IST

प्रचंड पिकांचे नुकसान : शेतकरी बांधव हवालदील ; आणखी मदतीची अपेक्षा

नशिराबाद - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला़ अन् यात शेतकरी राजा होरपळला गेला़ शासनाकडून मदत जरी जाहीर करण्यात आली असली तरी खर्चीचा मोह व सत्तेचा ध्यास धरणाºया सर्वच राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचा विसर पडलाय दिसतो़राजकारण्यांच्या आडमुठेपणामुळे सरकार स्थापन होत नाही़ त्यामुळे शेतकºयांना शासनाची मदत मिळणार कधी याची प्रतीक्षा आहे़ दरम्यान, शेतकरी बांधवांना जाहीर झालेली मदतही आणखी वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी राजाकडून होत आहे़ मात्र, सरकार स्थापनेच्या घोळात जगाचा पोशिंदा मानल्या जोणाºया शेतकºयांला का कोणती सवलत त्वरित दिली जाते नाही, कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. कधी सरकार मारते तर कधी निसर्ग शेतकºयाला मारतोय असे स्थिती झाली आहे़यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडाला असून नशिराबाद परिसरातील शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे शेतातील सर्व पिके उध्वस्त केली आहेत.पोशिंदा आर्थिक विवंचनेतचांगला पाऊस पडला नाही तरी शेतकºयाला चिंता असते आणि पाऊस जास्त प्रमाणात पडला तरी देखील शेतकºयाचे नुकसान होते़ यंदा अवकाळी पावसाने तर खूपच मोठा फटका दिला आहे. रब्बीची पेरणी कशी करावी याच्या आर्थिक विवंचनेत शेतकरी आहे. आश्वासनांची खैरात करणारे राजकीय पक्ष व नेते सत्तारूढ होण्यासाठी व्यस्त आहे. मात्र शेतकºयांची दखल घेत न्याय द्यावा व अधिक मदत करावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे़ संजय काळे शेतकरीराष्टपती राजवट येणे हे दूर्दैव आहे.सरकार स्थापनेचा ठावठिकाणा नाही आणि अवकाळी पावसाचा मारा सुरूच आहे. बळीराजा कडे कोणी लक्ष देईना. खरीपाने कंबरडे मोडले. रब्बीची पेरणी करण्यासाठी पैसा नाही. शासनाची मदत मिळणार कधी याची प्रतीक्षा आहे. शासनाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे- डॉ.किरण चौधरी, शेतकरीपरतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले मात्र अद्याप मदत मिळाली नाही. गत कालखंडातील कोरड्या दुष्काळाचे अद्याप मदत मिळाली नाही तर आता ओल्या दुष्काळाची मदत मिळेल कधी? की शेतकरीची थट्टाच करताय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. सत्ता संघर्ष करणाºया राजकीय पक्षांनी तात्काळ सरकार स्थापन करावे शेतकºयांना न्याय द्यावा हीच अपेक्षा.- सतीश कावळे, शेतकरीअवकाळी पावसामुळे शेतकरी राजा अडचणीत आहे़ मात्र सत्तेच्या संघर्षात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा राजकीय नेत्यांना विसर पडलेला आहे. भाजप-शिवसेना स्पष्ट बहुमत असतानाही खुर्चीच्या स्वार्थासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकार स्थापन झाले तर शेतकºयांच्या डोळ्यातील अश्रू पुसतील व दिलासा देतील अपेक्षा होती मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.-हर्षल वाघुळदे, शेतकरीअवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मदत कधी येणार याची प्रतीक्षा आहे. सर्वच राजकीय पक्षांना मुख्यमंत्री पदाची लालसा असल्याने सरकार स्थापनेत अनेक अडथळे निर्माण झाले आहे. सरकार लवकर स्थापन होऊन शेतकºयांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.- कल्पेश पाटील, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव