शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांपुढे राजकीय पेचप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:12 IST

राज्यातील सत्ता परिवर्तनाने जळगाव, धुळे महापालिकेतील भाजपच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची कसोटी, निधी, कामे, गैरव्यवहार या मुद्यावरुन शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते करतील कोंडी

मिलिंद कुलकर्णी‘शतप्रतिशत भाजप’चे अभियान राबवित असताना स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने संघटनात्मक बाबींवर जोर देण्याऐवजी ‘शॉर्ट कट’ वापरत इतर पक्षांमधील प्रभावशाली, वजनदार नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, जळगाव, धुळे अशा महापालिकांवर याच पध्दतीने भाजपने यश मिळविले. केंद्र व राज्यात सरकार आहे, महापालिकेत द्या, वर्षभरात विकास करुन दाखवतो हे आवाहन जनतेला भावले. आता मात्र राज्यात परिवर्तन झाल्याने भाजपशासीत महापालिका पदाधिकाऱ्यांपुढे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे.राजकारणातील अनिश्चितता गेल्या महिनाभरात संपूर्ण महाराष्टÑाने अनुभवली. मोदींचा करिष्मा, फडणवीस यांच्यासारखा प्रामाणिक चेहरा, गतिमान प्रशासन या जमेच्या बाजू ठासून सांगत आता ५० वर्षे भाजप सत्ता सोडत नाही, असे म्हटले जात होते. पण, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजकीय शहाणपण, मुत्सद्देगिरीत कमी पडलेल्या भाजपला थेट विरोधी बाकावर तर बसावे लागले, पण औटघटकेच्या राज्याने पुरते हसे केले. वयाच्या चाळीशीत पदार्पण करणाºया भाजपला ‘शायनिंग इंडिया’ चा फुगा फुटल्यानंतर हा दुसरा मोठा पराभव पत्करावा लागत आहे.संघटनकार्य, शिस्त, विचारप्रणाली हे भाजपचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असताना भावनिक मुद्दे आणि घाऊक पक्षांतराच्या बळावर ‘शतप्रतिशत’ साठी अभियान उघडण्यात आले. केंद्र व राज्यातील सत्तेमुळे लाभार्र्थींची गर्दी पक्षात होऊ लागली. त्यांच्या गर्दीमुळे पक्षबळ वाढल्याचा साक्षात्कार तमाम संघटनमंत्री आणि पदाधिकाºयांना झाला. मूळ संघटनकार्य बाजूला पडून केवळ निवडणुकीच्या राजकारणावर भर दिला गेला. संस्था तर ताब्यात आल्या, पण त्या ‘परक्यां’च्या बळावर हे विसरले गेले. ‘परकीय आक्रमणा’मुळे निष्ठावंत कार्यकर्ते बिथरले. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला असताना संख्याबळ घटले. धुळे, नंदुरबारमध्ये विद्यमान आमदारांना डावलले गेले, सेनेशी दगाफटका केल्याचा ठपका आला आणि संख्याबळ जैसे थेच राहिले.राज्यात ‘महाविकास आघाडी’ची स्थापना करताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा भाजपविरोध किती टोकाचा होता, हे आपण बघीतले. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. नंदुरबार, धुळ्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहे. धरणगावात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद तर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये नवीन समीकरणे उदयाला येऊ शकतात.सेना आणि राष्टÑवादीच्या नगरसेवकांच्या बळावर भाजपने जळगाव आणि धुळे महापालिकेत सत्ता हस्तगत केली. परंतु, आता सत्ता परिवर्तनानंतर या नगरसेवकांना घरवासपीचे वेध लागण्याची शक्यता आहे. जळगावात सेनेचे १५ नगरसेवक तर विधानसभा निवडणुकीतील राष्टÑवादीचे पराभूत उमेदवार अभिषेक पाटील तर धुळ्यात एमआयएमचे आमदार डॉ.फारुक शाह आणि माजी आमदार अनिल गोटे हे पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवून असतील. भाजप ज्या पारदर्शक कारभारासाठी आग्रही असते, तसा कारभार त्यांना महापालिकेत करुन दाखवावा लागेल. अन्यथा आरोप होणारच.भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव आणि धुळ्यात सत्ता आली. शिवसेना आणि राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या महापालिका भाजपने घाऊक पक्षांतराने काबीज केल्या. पण आता हे पक्ष राज्यात सत्ताधारी झाल्याने समीकरण बदलले. अशावेळी सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी घरवासपीला उत्सुक झाली, तर आश्चर्य वाटायला नको. या चढाओढीत शहरांच्या विकासावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव