शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

राजकीय दौरे आटोपले, आता बंधने तर येणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

कोरोना संसर्ग कमी होणे हे सर्वांसाठी दिलासादायकच आहे. मात्र हा संसर्ग कमी झाला म्हणजे राजकीय मंडळींच्या दौऱ्यांना वेग येतो. ...

कोरोना संसर्ग कमी होणे हे सर्वांसाठी दिलासादायकच आहे. मात्र हा संसर्ग कमी झाला म्हणजे राजकीय मंडळींच्या दौऱ्यांना वेग येतो. (अनेक वेळा निर्बंधादरम्यानही त्यांना बंधने नसतात.) हे दौरे झाले की पुन्हा निर्बंध लागू होणे, हा अनुभव आता वारंवार येऊ लागला आहे. त्यामुळे वारंवार निर्बंध लावण्यापेक्षा सामान्यांना नियमांचे पालन करण्याचे ज्याप्रमाणे निर्देश दिले जातात, त्याचप्रमाणे राजकीय मंडळींच्या दौऱ्यांवरही निर्बंध लावल्यास सर्व काही सुरळीत चालण्यास मदत तर होऊ शकेल, असा सूर आता सर्वच क्षेत्रातून पुढे येऊ लागला आहे. मात्र तसे न होता दररोज रोजंदारी करून पोट भरणाऱ्या, सव्वा वर्षांपासून व्यवसायात फटका सहन करणारे व्यावसायिक, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच घरी राहण्याचा अजब सल्लाच जणू वारंवारच्या आदेशाने दिला जात आहे. कोरोनाची पहिला लाट ओसरल्यानंतर सर्वच जण आनंदी झाले व कोरोना गेला म्हणून प्रत्येकाचे फिरणे-हिरणे, धार्मिक भेटी-गाठी सुरू झाल्या. मात्र हा संसर्ग कमी झाल्याने या काळात ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाली व प्रत्येक राजकीय पक्षाने आपली ताकद लावत ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी नियमही धाब्यावर बसविले. याच काळात मोठी गर्दी उसळली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजकीय दौरा झाला आणि अनेकांना संसर्ग झाला. यातूनच मोठी लाट उसळली. याच काळात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दौरे केले. मात्र या निर्बंध काळात सामान्य माणूस, व्यावसायिक घरात बसले होते. यामुळे पुढे हा संसर्ग कमी झाला. मात्र आता संसर्ग व मृत्यूही रोखण्यास प्रशासनास यश आले खरे व कोरोनापासून दिलासा मिळाल्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले. हे होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा राजकीय दौरा झाला. त्यानंतर आता निर्बंध शिथिल होताच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजकीय दौरा आटोपला. त्यानंतर काही दिवसांत राज्य सरकारने सर्वच शहरे डेल्टाच्या नावाखाली तिसऱ्या टप्प्यात टाकली व व्यवसायांवर बंधने आणली. हे सर्व राजकीय दौरे पाहता, संसर्ग कमी होऊ द्यायचा, आपले दौरे करून घ्यायचे व पुन्हा सामान्य, व्यावसायिक, रोजंदारी करणारे मजूर यांच्या माथी बंधने मारायची, हे नित्याचे झाले. त्यामुळे सामान्यदेखील याला कंटाळले आहे, मात्र करणार काय? सरकारच्या बंधनापुढे कोणाचे काय चालणार या विचाराने सर्वच जण शांत आहे. मात्र सामान्यांना वेठीस धरण्यापेक्षा, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यापेक्षा, व्यावसायिकांना आर्थिक संकटात ढकलण्यापेक्षा वर्ष-दोन वर्ष राजकीय दौरेच थांबविले तर कोरोनावर नियंत्रण मिळविता येणार नाही का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या प्रत्येक राजकीय मंडळींच्या दौऱ्यादरम्यान कोठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही की मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नाही. त्यामुळे या गर्दीवर प्रशासनाने नियंत्रण मिळविल्यास कोरोनाला काही तरी आळा बसण्यास मदत होऊ शकेल, हे कोणीही सांगू शकेल.