शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 23:11 IST

कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाली आहे.

ठळक मुद्देकढोली येथील घटना : ५ जणांना जळगावला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव/ कढोली ता. एरंडोल : कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन जण  गंभीर आहेत. सायंकाळच्या सुमारास उपकेंद्रात रुग्णाची रांग लागली होती. 

कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी  भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या झालेल्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. दिवसभर गावातील काही नागरिकांना हा त्रास जाणवला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली.

हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना कळविला. त्यांनी  तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती देऊन, कढोली गाठले. काही वेळातच रिंगणगाव येथुन सहा डॉक्टर व दहा नर्सचे पथक येऊन त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात अति प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले.

तर अन्नातूनच विषबाधा झाल्याचा संशय

यावेळी डॉक्टरांनी गावातील नागरिकांना झालेल्या त्रासाची कारणे विचारली असता, त्यांनी लग्नात जेवल्यामुळेच हा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. गावातील अनेकांन पोटदुखीचा व जुलाबाचा त्रास जाणवत असल्याने बु‌धवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले. विषबाधा झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी ही माहिती दिली. मंगलाबाई गोकुळ बडगुजर यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

२२ तासांनी त्रास सुरु

लग्नात जेवण झाल्यानंतर  २२ तासाने हातपाय दुखणे थंडीताप व डोकेदुखी चक्कर आल्याने खाजगी डॉक्टरांकडून उपचार केला, असे कृष्णा बडगुजर यांनी सांगितले. लग्नासाठी पिंप्री ता. धरणगाव येथील सोमनाथ बडगुजर या स्वयंपाकीला बोलावण्यात आले होते, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलmarriageलग्नfood poisoningअन्नातून विषबाधा