शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 23:11 IST

कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाली आहे.

ठळक मुद्देकढोली येथील घटना : ५ जणांना जळगावला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव/ कढोली ता. एरंडोल : कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन जण  गंभीर आहेत. सायंकाळच्या सुमारास उपकेंद्रात रुग्णाची रांग लागली होती. 

कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी  भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या झालेल्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. दिवसभर गावातील काही नागरिकांना हा त्रास जाणवला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली.

हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना कळविला. त्यांनी  तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती देऊन, कढोली गाठले. काही वेळातच रिंगणगाव येथुन सहा डॉक्टर व दहा नर्सचे पथक येऊन त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात अति प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले.

तर अन्नातूनच विषबाधा झाल्याचा संशय

यावेळी डॉक्टरांनी गावातील नागरिकांना झालेल्या त्रासाची कारणे विचारली असता, त्यांनी लग्नात जेवल्यामुळेच हा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. गावातील अनेकांन पोटदुखीचा व जुलाबाचा त्रास जाणवत असल्याने बु‌धवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले. विषबाधा झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी ही माहिती दिली. मंगलाबाई गोकुळ बडगुजर यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

२२ तासांनी त्रास सुरु

लग्नात जेवण झाल्यानंतर  २२ तासाने हातपाय दुखणे थंडीताप व डोकेदुखी चक्कर आल्याने खाजगी डॉक्टरांकडून उपचार केला, असे कृष्णा बडगुजर यांनी सांगितले. लग्नासाठी पिंप्री ता. धरणगाव येथील सोमनाथ बडगुजर या स्वयंपाकीला बोलावण्यात आले होते, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलmarriageलग्नfood poisoningअन्नातून विषबाधा