शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

दु:खाला रूप देणे म्हणजेच कविता होय- कवी अशोक कोतवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 4:41 PM

अमळनेर येथे रंगले पावसाळी काव्यसंमेलन

अमळनेर, जि.जळगाव : कविता म्हणजे व्यक्त होणं होय, दु:खाला रूप देणे म्हणजेच कविता होय, असे उदगार प्रसिद्ध कवी अशोक कोतवाल यांनी येथील मराठी वाङ््मय मंडळाच्या ‘पाऊस कवितेतला’ या जिल्हास्तरीय कविसंमेलनात काढले.येथील मराठी वाङ््मय मंडळ व प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने काव्यसंमेलन रविवारी सकाळी नांदेडकर सभागृहात पार पडले. या वेळी जिल्ह्यातील कवींच्या श्रावणसरींनी रसिक चिंब झाले. मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, डॉ.सुहास देशमाने, कार्यवाह रमेश पवार, प्रा.प्र.ज.जोशी, नरेंद्र निकुंभ व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.प्रमुख अतिथी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी बोलताना सांगितले, अमळनेर शहरात राहत असताना मी घडत गेलो. साहित्यिक झालो, ही अमळनेरची देणगी असल्याचे सांगत त्यांनी वस्ती आणि मौहला ही कविता सादर केली. त्यातून त्यांनी गावगड्यातील बालपण आणि हिंदू मुस्लीम ऐक्य याविषयी वर्णन ऐकवले.जळगावच्या डॉ.संगीता म्हसकर यांनी प्रेम निसर्ग यावर आधारित ‘पुन्हा हा चंद्र जागावा’, कधी फुलात रंगले कधी डावात न्हाले या दोन गझल सादर केल्या.धरणगावचे बी.एन.चौधरी यांनी आठवणी दंगलीच्या या कवितेतून दंगलीचे वास्तव उभे केले, तर श्रावण या कवितेतून सृष्टीचे वर्णन सादर केले. जळगावच्या माया धुप्पड यांनी माझ्या पाऊस फुला....रे तुझ्यासाठी माझ्या काळजात झुलतो झुला, देशभक्तीपर कविता भारत माझा देश ही कविता सादर केली. मिलिंद चौधरी यांनी कवितेतून खंत व्यक्त केली.भडगाव येथील रमेश धनगर यांनी पावसाची झडप आणि ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर केल्या.पाचोरा येथील कृपेश महाजन यांनी पावसाची कविता, डेथ आॅफ सोल या कवितेतून समाजाचे वास्तव यावर प्रकाश टाकला. प्रा.डॉ.रमेश माने यांनी विठ्ठलाचा अभंग यातून पेरूनिया घाम उगला दुष्काळ ही कविता सादर केली, तर सुशिक्षित बेरोजगारांचे अभंग यातून सुशिक्षित बेरोजगारांचे मनोगत व्यक्त केले.अमळनेरचे कवी रमेश पवार डिजिटल युग या कवितेतून पाण्याचे महत्व विशद करणारी कविता सादर केले. तुला कसं सांगू माझ्या देशा ही निर्भया गँगरेपवर आधारित कविता सादर केली.काव्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोतवाल यांनी पंढरपूर आणि वारकरी यांची श्रद्धा व्यक्त करणारी कविता सादर केली. सूत्रसंचालन रमेश पवार यांनी, तर आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर