शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 16:57 IST

PM Kisan : जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते.

जळगाव : देशभरातील शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळावा, यासाठी सरकारने पीएम किसान योजना लागू केली. सुरुवातीला त्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना फायदा दिला गेला. त्यानंतर सरकारने आयकरदात्या शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते थांबवले आणि त्यांच्याकडून दिलेल्या लाभाची वसुली करण्यात आली. त्यात आतापर्यंत ५८४७ आयकरदात्या शेतकऱ्यांनी हे पैसे परत केले आहेत. तर ९,३०४ शेतकऱ्यांनी ८ कोटी ८ लाख ६०० रुपयांची रक्कम अद्यापही परत केलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते. त्यांच्याकडून ते शेतकरी नसल्याने ही वसुली करण्यात येत होती. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यात कोणतीही वसुली झालेली नाही.

पैसे परत करायला कुणीही येईना

जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले आहेत, त्या १५ हजार १०१ शेतकऱ्यांकडून २०२१ मध्येच वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यातच ५८४७ शेतकऱ्यांनी स्वत:हून हे पैसे करत केले. मात्र नंतर कुणीही पैसे परत करायला पुढे आले नाही. त्यात सुरुवातीला प्रशासनाने वारंवार आवाहन देखील केले. मात्र अजून तरी त्याचा फायदा झालेला नाही.

खाती गोठवण्याचाही प्रयत्न

जिल्ह्यात ज्या ९३०४ अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचे पैसे परत केलेले नाही, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना पत्र दिले होते. त्यात बँकांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या खात्यातील हप्ते दिले गेले तेवढी रक्कम गोठवण्याच्या सूचना होत्या. मात्र अजून तरी त्यात फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही.

ई केवायसी की आधारसंलग्न?

सध्या ई केवायसी हे पीएम किसान योजनेतील मोठी अडचण आहे. मात्र आता ही योजना ई केवायसीपेक्षा आधारबेस्ड पेमेंटवर कार्यरत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेच काम सुरू असल्याचे योजनेशी संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अजूनही काही जणांचे ई केवायसी केले जात आहे. आधार बेस्ड पेमेंट झाल्यास ई केवायसीचा उपयोग राहणार नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साडेपाच कोटींची झाली वसुली

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ८४७ शेतकऱ्यांकडून ५ कोटी ५४ लाख २६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ६६६ शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत.

८ कोटी रुपये अद्याप लटकले

जळगाव जिल्ह्यात या योजनेत ९ हजार ३०४ शेतकऱ्यांकडून अद्यापही ८ कोटी ८ लाख ६ हजार रुपये वसूल करण्याचे बाकी आहेत. त्यात अमळनेर तालुक्यातील ९१८ शेतकरी आहेत, तर जळगाव तालुक्यातील ८५४ आणि यावल तालुक्यातील ८५५ शेतकरी आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाJalgaonजळगाव