शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 16:57 IST

PM Kisan : जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते.

जळगाव : देशभरातील शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळावा, यासाठी सरकारने पीएम किसान योजना लागू केली. सुरुवातीला त्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना फायदा दिला गेला. त्यानंतर सरकारने आयकरदात्या शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते थांबवले आणि त्यांच्याकडून दिलेल्या लाभाची वसुली करण्यात आली. त्यात आतापर्यंत ५८४७ आयकरदात्या शेतकऱ्यांनी हे पैसे परत केले आहेत. तर ९,३०४ शेतकऱ्यांनी ८ कोटी ८ लाख ६०० रुपयांची रक्कम अद्यापही परत केलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते. त्यांच्याकडून ते शेतकरी नसल्याने ही वसुली करण्यात येत होती. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यात कोणतीही वसुली झालेली नाही.

पैसे परत करायला कुणीही येईना

जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले आहेत, त्या १५ हजार १०१ शेतकऱ्यांकडून २०२१ मध्येच वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यातच ५८४७ शेतकऱ्यांनी स्वत:हून हे पैसे करत केले. मात्र नंतर कुणीही पैसे परत करायला पुढे आले नाही. त्यात सुरुवातीला प्रशासनाने वारंवार आवाहन देखील केले. मात्र अजून तरी त्याचा फायदा झालेला नाही.

खाती गोठवण्याचाही प्रयत्न

जिल्ह्यात ज्या ९३०४ अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचे पैसे परत केलेले नाही, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना पत्र दिले होते. त्यात बँकांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या खात्यातील हप्ते दिले गेले तेवढी रक्कम गोठवण्याच्या सूचना होत्या. मात्र अजून तरी त्यात फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही.

ई केवायसी की आधारसंलग्न?

सध्या ई केवायसी हे पीएम किसान योजनेतील मोठी अडचण आहे. मात्र आता ही योजना ई केवायसीपेक्षा आधारबेस्ड पेमेंटवर कार्यरत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेच काम सुरू असल्याचे योजनेशी संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अजूनही काही जणांचे ई केवायसी केले जात आहे. आधार बेस्ड पेमेंट झाल्यास ई केवायसीचा उपयोग राहणार नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साडेपाच कोटींची झाली वसुली

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ८४७ शेतकऱ्यांकडून ५ कोटी ५४ लाख २६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ६६६ शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत.

८ कोटी रुपये अद्याप लटकले

जळगाव जिल्ह्यात या योजनेत ९ हजार ३०४ शेतकऱ्यांकडून अद्यापही ८ कोटी ८ लाख ६ हजार रुपये वसूल करण्याचे बाकी आहेत. त्यात अमळनेर तालुक्यातील ९१८ शेतकरी आहेत, तर जळगाव तालुक्यातील ८५४ आणि यावल तालुक्यातील ८५५ शेतकरी आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाJalgaonजळगाव