शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 16:57 IST

PM Kisan : जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते.

जळगाव : देशभरातील शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळावा, यासाठी सरकारने पीएम किसान योजना लागू केली. सुरुवातीला त्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना फायदा दिला गेला. त्यानंतर सरकारने आयकरदात्या शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते थांबवले आणि त्यांच्याकडून दिलेल्या लाभाची वसुली करण्यात आली. त्यात आतापर्यंत ५८४७ आयकरदात्या शेतकऱ्यांनी हे पैसे परत केले आहेत. तर ९,३०४ शेतकऱ्यांनी ८ कोटी ८ लाख ६०० रुपयांची रक्कम अद्यापही परत केलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते. त्यांच्याकडून ते शेतकरी नसल्याने ही वसुली करण्यात येत होती. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यात कोणतीही वसुली झालेली नाही.

पैसे परत करायला कुणीही येईना

जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले आहेत, त्या १५ हजार १०१ शेतकऱ्यांकडून २०२१ मध्येच वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यातच ५८४७ शेतकऱ्यांनी स्वत:हून हे पैसे करत केले. मात्र नंतर कुणीही पैसे परत करायला पुढे आले नाही. त्यात सुरुवातीला प्रशासनाने वारंवार आवाहन देखील केले. मात्र अजून तरी त्याचा फायदा झालेला नाही.

खाती गोठवण्याचाही प्रयत्न

जिल्ह्यात ज्या ९३०४ अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचे पैसे परत केलेले नाही, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना पत्र दिले होते. त्यात बँकांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या खात्यातील हप्ते दिले गेले तेवढी रक्कम गोठवण्याच्या सूचना होत्या. मात्र अजून तरी त्यात फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही.

ई केवायसी की आधारसंलग्न?

सध्या ई केवायसी हे पीएम किसान योजनेतील मोठी अडचण आहे. मात्र आता ही योजना ई केवायसीपेक्षा आधारबेस्ड पेमेंटवर कार्यरत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेच काम सुरू असल्याचे योजनेशी संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अजूनही काही जणांचे ई केवायसी केले जात आहे. आधार बेस्ड पेमेंट झाल्यास ई केवायसीचा उपयोग राहणार नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साडेपाच कोटींची झाली वसुली

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ८४७ शेतकऱ्यांकडून ५ कोटी ५४ लाख २६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ६६६ शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत.

८ कोटी रुपये अद्याप लटकले

जळगाव जिल्ह्यात या योजनेत ९ हजार ३०४ शेतकऱ्यांकडून अद्यापही ८ कोटी ८ लाख ६ हजार रुपये वसूल करण्याचे बाकी आहेत. त्यात अमळनेर तालुक्यातील ९१८ शेतकरी आहेत, तर जळगाव तालुक्यातील ८५४ आणि यावल तालुक्यातील ८५५ शेतकरी आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाJalgaonजळगाव