शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

वाढदिवशी केले जाते वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:50 IST

कासोदा येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवायचे. असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देएरंडोल तालुक्यातील कासोदा येथे स्तुत्य उपक्रमग्रीन आर्मी ग्रुपने घेतला पुढाकारनागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवायचे. असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम इतका भावतो आहे की, परिसरातील अनेक गावात ह्या ग्रीनआर्मी ग्रुपचे झपाट्याने अनुकरण सुरू झाले आहे. वर्षभरात गावातील प्रत्येक घरापुढे एक झाड जगलेले दिसेल असा प्रयत्न आहे, तेही शासनाचा एक नया पैसा न खर्च करता...गावातील काही ज्येष्ठ व तरुण मित्रांनी एकत्रित येऊन वाढदिवसाला वृक्षारोपणाची कल्पना सुचवली. यासाठी कासोदा ग्रीन आर्मी या नावाने आधी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवला. हा ग्रुप तयार करण्याबाबत आधी प्रचार प्रसार केला. उद्देश लोकांना कळविण्यात आला. एक अ‍ॅप बनवून स्वेच्छेने सभासद व्हा, असे आवाहन करण्यात आले. या ग्रुपला एकाच दिवसात मोठा प्रतिसाद मिळाला. २५६ सभासद काही तासातच जुळले. यामुळे आयोजकांचा उत्साह वाढला. गावातील देशविदेशात असणारे सामान्य नागरिक व उच्चपदस्थ सगळेच एका ग्रुपवर दिसू लागले. विचारांची देवाणघेवाण सुरु झाली.ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्याला फोन करुन शुभेच्छा द्यायच्या व आम्ही तुमच्या घरी रोप देऊन सत्कार करायला येत आहोत. किती वाजेला यायचे ते कळवा. खड्डा पण खोदून ठेवा, असा निरोप दिला जातो. ठरल्याप्रमाणे ज्या सभासदांना शक्य होते ते १० ते १५ लोक संबंधित व्यक्तीकडे जातात. रोप लाऊन जगवायची हमी घेऊन परतात. दि.३१ मेपर्यंत सुमारे ५० घरांसमोर रोपं लावण्यात आली आहेत. गावकऱ्यांचा इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे की, उद्या कुणाचा वाढदिवस आहे हे आदल्या दिवशी या ग्रुपला माहिती कळवली जाते. काही नागरिक स्वत:च रोप लाऊन या ग्रुपला फोटो शेअर करीत आहेत.या ग्रुपची लिंक इतर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर फिरत असल्याने अनेकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत, पण काही गावांनी यापासून प्रेरणा घेऊन आपल्या गावाच्या नावाने ग्रीनआर्मी असा उपक्रम सुरू केला आहे.याकामी काही दानशूर व्यक्तींनी ट्रीगार्ड देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम येथे इतका लोकप्रिय होत आहे की, जि.प.च्या अध्यक्षा उज्वला पाटील वाढदिवसाला त्यांच्या घरासमोर रोप लावण्यासाठी फक्त अर्ध्या तासासाठी गावी आल्या होत्या. रोप लाऊन लागलीच जळगावी परतल्या होत्या.झाडांची रोपं काही लोक भेट देत आहेत. ट्रीगार्ड पण लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कोणताही पैसा खर्च न करता हे जनहिताचे मोठे काम होऊ पहात आहे.सरकार वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण पाहिजे तेवढा प्रतिसाद दिसत नाही. पण अतिशय छोट्याशा या उपक्रमातून कुठलाही पैसा खर्च न होता ४० हजार लोकसंख्येचे हे गाव ग्रीन सीटी म्हणून ओळखले जावे व कासोदा पॅटर्न म्हणून या उपक्रमाला पाठिंबा मिळावा, अशी तळमळ आयोजकांना आहे.पण हे करीत असताना या ग्रुपमधील व्यावसायीक, नोकरदार, शेतकरी, शेतमजूर सारेच आपला अतिशय मोलाचा वेळ देत आहेत. त्यामुळे हे शक्य होत आहे. ही चळवळ यशस्वी होऊन गाव, तालुका, जिल्हा ग्रीनसीटी म्हणून ओळखला जावा, असा प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :environmentवातावरणErandolएरंडोल