शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

योजना गरजूंपर्यंत पोहचाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:20 IST

विजयकुमार सैतवालगरजूंना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी इतर प्राथमिक सुविधांसोबतच आरोग्याच्या सुविधेकडेही विशेष लक्ष दिले जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या बाबतीत नेहमीच रुग्णांची हेळसांड होत असल्याचा अनुभव नवा नाही. आताही पुन्हा गेल्या आठवड्यात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने तिच्यासह नवजात बालकास तब्बल सात तास ताटकळत राहावे लागल्याचा दुर्दैवी अनुभव जिल्हा ...

विजयकुमार सैतवालगरजूंना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी इतर प्राथमिक सुविधांसोबतच आरोग्याच्या सुविधेकडेही विशेष लक्ष दिले जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या बाबतीत नेहमीच रुग्णांची हेळसांड होत असल्याचा अनुभव नवा नाही. आताही पुन्हा गेल्या आठवड्यात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने तिच्यासह नवजात बालकास तब्बल सात तास ताटकळत राहावे लागल्याचा दुर्दैवी अनुभव जिल्हा रुग्णालयात आला. त्यामुळे शासकीय योजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अर्थसंकल्प असो अथवा कोणत्याही घोषणा असो त्या वेळी शासकीय योजनांचा तसेच त्यासाठी तरतुदीचा पाऊस पडतो. मात्र प्रत्येक विभागातच त्या थेट तळागळापर्यंत पोहतात का असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. यामध्ये आरोग्याचा प्रश्नही अपवाद नाही. तसे पाहता आरोग्यासाठी विशेष तरतुदी करून सामान्यांचे आरोग्य उत्तम राखण्याकडे कल असतो. मात्र प्रत्यक्षात याची बोंब असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. यामध्ये रुग्णवाहिका मिळविणे असो अथवा आरोग्य विमा असो, यामध्ये रुग्णांना सहसजासहजी काही मिळत नाही. त्यामुळे अखेर ते याचा नाद सोडून देतात.असाच प्रत्यय जिल्हा रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका महिलेला आला. प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर येथे महिलेची प्रसूती तर झाली, मात्र ज्या वेळी तिला घरी न्यायचे होते, त्या वेळी प्रसूत महिलांसाठी असलेल्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधूनही केवळ वेळ मारून नेण्यात आली. सकाळी ११ वाजता रुग्णवाहिका येईल, तेव्हा न आल्याने पुन्हा संपर्क साधल्याने १२ वाजता येईल, असे पुन्हा सांगण्यात आले. त्यामुळे महिलेला या योजनेचा कटू अनुभव आला. अखेर संध्याकाळी सहा वाजता या महिलेला खाजगी रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. त्यामुळे या योजनेचा काय फायदा, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. यावल तालुक्यातून जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या या महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने केवळ शासकीय योजनांचे गाजर दाखविले जात असल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करीत कोणीच लक्ष देत नसल्याने नातेवाईकाला अखेर वृत्तपत्राचा आधार घेऊन आपली आपबिती सांगावी लागल्याने शासन व योजना राबविणारेच योजनांबाबत किती गांभीर्य दाखवितात, असा सवाल या निमित्तीने उपस्थित केला जात आहे. आरोग्यासाठी असलेल्या आरोग्य विमा योजनाही सामान्यांना मिळविण्यासाठी कोणाकोणाचा आधार घ्यावा लागतो व त्यात त्यांच्या अज्ञानाचा कसा फायदा घेतलो जातो, याचे अनेक वाईट अनुभव आल्याचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सांगत असतात. त्यामुळे शासकीय योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी संबंधितांनी खºया अर्थाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव