शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

काशिनाथ चौकात खड्ड्यांमुळे होतेय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:42 IST

रस्त्यात पडले मोठमोठे खड्डे : भाजीविक्रेत्यांनीही केले अतिक्रमण, वाहनचालकांना करावा लागतो वाहतुक कोंडीचा सामना

जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणारा रस्ता अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने संथ गतीने जातात. काही मोठी वाहने या खड्ड्यांमध्येच अडकतात. तर भाजी विक्रेत्यांनी या रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडले आहे. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यात बळिराम पेठ आणि इतर भागातील भाजी बाजार हटवण्यात आला. काही भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली. या काळात रोजगार गेलेल्या अनेकांनी भाजी आणि फळे विक्रीच्या गाड्या लावून आपल्या रोजगाराची सोय केली.पण हे करताना अनेकांनी या महत्त्वाच्या राज्य मार्गावर हातगाड्या लावल्या. अनेक जण येथे फळे आणि भाज्या घेण्यासाठी वाहने थांबवतात. त्यातच काही ठिकाणी साईडपट्ट्या खोल असल्याने वाहने भररस्त्यातच थांबवली जातात.भाजी विक्रेत्यांनी अजिंठा चौफुलीपासून ते काशिनाथ चौकाच्या पुढपर्यंतच्या रस्त्यावर हातगाड्या आणि मोठमोठी दुकाने थाटायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. शुक्रवार आणि शनिवार या शहरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. आणि चिखलही झाला होता. या चिखलात दुचाकी देखील अडकल्या होत्या. शहरातून औद्योगिक वसाहत, पुढे अजिंठा आणि औरंगाबादला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर अहोरात्र वाहतुक सुरु असते. या भागातून मोठमोठे टँकर, ट्रक, जात असतात. रात्री जामनेर, सोयगाव या तालुक्यांमधून शेतकरी मालाच्या गाड्या घेऊन येतात. त्यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीनुसतेच खड्डेकशिनाथ चौकाकडून मेहरुणकडे जाणारा रस्ता हा कायमस्वरुपी समस्यांच्या गर्तेत असतो. स्थानिक नगरसेवक आणि मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. पाऊस पडल्यावर येथे रस्ताच दिसत नाही. नुसतेच खड्डे दिसून येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक वैतागले आहे. त्यातच बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या बाजुला फळविक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारक वैतागले आहे.रात्रीचा प्रवास जीव मुठीत धरूनया भागातून औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार रात्री अपरात्री सायकल, दुचाकीने प्रवास करत असतात. त्यात अनेकदा पथदिवे बंद असतात. मोठमोठे खड्डे, खोल गेलेल्या साईडपट्ट्या,चिखलामुळे निसरडे झालेले रस्ते यामुळे हा अजिंठा चौफुलीपर्यंतचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव