शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

काशिनाथ चौकात खड्ड्यांमुळे होतेय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:42 IST

रस्त्यात पडले मोठमोठे खड्डे : भाजीविक्रेत्यांनीही केले अतिक्रमण, वाहनचालकांना करावा लागतो वाहतुक कोंडीचा सामना

जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणारा रस्ता अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने संथ गतीने जातात. काही मोठी वाहने या खड्ड्यांमध्येच अडकतात. तर भाजी विक्रेत्यांनी या रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडले आहे. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यात बळिराम पेठ आणि इतर भागातील भाजी बाजार हटवण्यात आला. काही भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली. या काळात रोजगार गेलेल्या अनेकांनी भाजी आणि फळे विक्रीच्या गाड्या लावून आपल्या रोजगाराची सोय केली.पण हे करताना अनेकांनी या महत्त्वाच्या राज्य मार्गावर हातगाड्या लावल्या. अनेक जण येथे फळे आणि भाज्या घेण्यासाठी वाहने थांबवतात. त्यातच काही ठिकाणी साईडपट्ट्या खोल असल्याने वाहने भररस्त्यातच थांबवली जातात.भाजी विक्रेत्यांनी अजिंठा चौफुलीपासून ते काशिनाथ चौकाच्या पुढपर्यंतच्या रस्त्यावर हातगाड्या आणि मोठमोठी दुकाने थाटायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. शुक्रवार आणि शनिवार या शहरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. आणि चिखलही झाला होता. या चिखलात दुचाकी देखील अडकल्या होत्या. शहरातून औद्योगिक वसाहत, पुढे अजिंठा आणि औरंगाबादला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर अहोरात्र वाहतुक सुरु असते. या भागातून मोठमोठे टँकर, ट्रक, जात असतात. रात्री जामनेर, सोयगाव या तालुक्यांमधून शेतकरी मालाच्या गाड्या घेऊन येतात. त्यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीनुसतेच खड्डेकशिनाथ चौकाकडून मेहरुणकडे जाणारा रस्ता हा कायमस्वरुपी समस्यांच्या गर्तेत असतो. स्थानिक नगरसेवक आणि मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. पाऊस पडल्यावर येथे रस्ताच दिसत नाही. नुसतेच खड्डे दिसून येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक वैतागले आहे. त्यातच बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या बाजुला फळविक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारक वैतागले आहे.रात्रीचा प्रवास जीव मुठीत धरूनया भागातून औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार रात्री अपरात्री सायकल, दुचाकीने प्रवास करत असतात. त्यात अनेकदा पथदिवे बंद असतात. मोठमोठे खड्डे, खोल गेलेल्या साईडपट्ट्या,चिखलामुळे निसरडे झालेले रस्ते यामुळे हा अजिंठा चौफुलीपर्यंतचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव