शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड, आपत्ती व्यवस्थापनासाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:39 PM

जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला

ठळक मुद्देअहवाल मागविला अहवाल शासनास सादर करण्याचे जिल्हा प्रशासनास कळविले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17-  नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. पूर अथवा अन्य आपत्तीमध्ये कोणी अडकल्यास त्यांना वेळीच मदत मिळण्यास अडचण होते. ऐनवेळी मदतीसाठी नौदल तसेच वायूदलाची मदत घ्यावी लागते. तसेच यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हेलिपॅड उभारावे लागते.  त्यामुळे अशा प्रसंगी वेळीच मदत मिळावी म्हणून बचाव व सुरक्षेसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड असावे, असा निर्णय घेण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड उभारल्यास आपत्तीप्रसंगी हेलिकॉप्टर उतरविणे, स्टॅण्ड बाय ठेवणे, रात्रीच्या वेळी ते सुरक्षित ठेवणे या सर्व गोष्टी शक्य होणार आहे. या सोबतच आपत्तीप्रसंगी मदत करण्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-यासाठी, पोलीस अथवा संरक्षक दलाच्या कोणत्याही कार्यवाहीसाठी मदत होणार आहे. 

अहवाल मागविला तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड बांधण्यासाठी सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे. यामध्ये जागा निश्चित करणे, निमशासकीय असल्यास संपादीत करणे, उड्डाण व उतरविण्यासाठी सोयीची जागा असणे, आजूबाजूला कोणतेही अडथळे नसणे, बांधकामाचे अंदाजपत्रक सादर करणे, जागेचे आरक्षण व परिरक्षणाची जबाबदारी निश्चित करणे याबाबत सूचित करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.