शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मोदींच्या आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:48 IST

चुडामण बोरसे । जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षापेक्षाही आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला ...

चुडामण बोरसे ।जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षापेक्षाही आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे जनतेला त्रास देण्याचे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप भारतीय नागरी हक्क कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी त्या जळगावात आल्या होत्या. त्यांच्याशी झालेला हा संवादप्रश्न- कायद्याला प्रचंड विरोध असूनही सरकार ऐकायला तयार नाही?उत्तर- मूळात सीएए हा कायदा आणि एनआरसी आणि एनपीए ही विधेयके संविधान आणि राष्टÑवादाच्या विरोधात आहेत. यात दुरुस्ती करावी आणि यात शेजारील राष्टÑांनाही समावेश करुन घेण्यात यावे, अशी मागणी आहे. सरकारलाही एक दिवस जाग येईल, याची खात्री आहे.प्रश्न- सरकारविरुद्धच्या लढाईत आपल्यासोबत कोण आहेत?उत्तर - सीएए, एनआरसी आणि एनपीएमध्ये सुधारणा करण्यात यावी, याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशात काय सुरु आहे. हे मी सांगण्याची गरज नाही, उद्योगपती राहूल बजाज यांनीच सर्व काही सांगून टाकले आहे. सरकारविरुद्धची ही लढाई आम्ही नाही तर युवकच लढत आहेत. ही विचारांची लढाई आहे. त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत आणि राहू. विरोधकांनीही एकत्र यावे, अन्यथा विरोधकांंवरील जनतेचा विश्वास उडेल.प्रश्न- गुजरातमधील दंगलीनंतर पीडीतांना मदत केली तरीही आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले?उत्तर - गुजरात दंगलीनंतर आम्ही अनेक गरजूंना मदत केली. यातून काही तक्रारी झाल्या. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. आमची बाजू सत्याची आहे. सत्य कधीही लपून राहत नाही, याची खात्री आहे. आणि चांगले काम करण्याचे चांगले परिणाम होतात, यावर माझा विश्वास आहे.सीएएतून सरकारला काय साध्य करायचे आहे?नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षातील कार्यकाळापेक्षाही दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच लोक अधिक घाबरले आहेत. या सरकारला कामगार, शेतकरी, ओबीसी, अल्पसंख्यांक, दलित ही रेषेच पुसून टाकायची आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे डोळझाक करुन अन्य प्रश्न पुढे केले जात आहेत. हा कायदा आणणे म्हणजे त्याचाच एक भाग आहे.७०० स्वयंसेवक आसाममध्येकेंद्राने आणलेल्या कायदा आणि विधेयकांना विरोध करण्यासाठी आसाममध्ये फाऊंडेशनचे ७०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. फाऊंडेशनच्यावतीने आदिवासी क्षेत्रातील वनजमीनी आणि त्यासंबंधीचे कायदे यावर जनजागृती केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी संविधान बचाव नागरी कृती समितीचे मुकुंद सपकाळे, प्रा. प्रितीलाल पवार, दिलीप सपकाळे उपस्थित होते.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव