शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मोदींच्या आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:48 IST

चुडामण बोरसे । जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षापेक्षाही आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला ...

चुडामण बोरसे ।जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षापेक्षाही आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे जनतेला त्रास देण्याचे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप भारतीय नागरी हक्क कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी त्या जळगावात आल्या होत्या. त्यांच्याशी झालेला हा संवादप्रश्न- कायद्याला प्रचंड विरोध असूनही सरकार ऐकायला तयार नाही?उत्तर- मूळात सीएए हा कायदा आणि एनआरसी आणि एनपीए ही विधेयके संविधान आणि राष्टÑवादाच्या विरोधात आहेत. यात दुरुस्ती करावी आणि यात शेजारील राष्टÑांनाही समावेश करुन घेण्यात यावे, अशी मागणी आहे. सरकारलाही एक दिवस जाग येईल, याची खात्री आहे.प्रश्न- सरकारविरुद्धच्या लढाईत आपल्यासोबत कोण आहेत?उत्तर - सीएए, एनआरसी आणि एनपीएमध्ये सुधारणा करण्यात यावी, याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशात काय सुरु आहे. हे मी सांगण्याची गरज नाही, उद्योगपती राहूल बजाज यांनीच सर्व काही सांगून टाकले आहे. सरकारविरुद्धची ही लढाई आम्ही नाही तर युवकच लढत आहेत. ही विचारांची लढाई आहे. त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत आणि राहू. विरोधकांनीही एकत्र यावे, अन्यथा विरोधकांंवरील जनतेचा विश्वास उडेल.प्रश्न- गुजरातमधील दंगलीनंतर पीडीतांना मदत केली तरीही आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले?उत्तर - गुजरात दंगलीनंतर आम्ही अनेक गरजूंना मदत केली. यातून काही तक्रारी झाल्या. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. आमची बाजू सत्याची आहे. सत्य कधीही लपून राहत नाही, याची खात्री आहे. आणि चांगले काम करण्याचे चांगले परिणाम होतात, यावर माझा विश्वास आहे.सीएएतून सरकारला काय साध्य करायचे आहे?नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षातील कार्यकाळापेक्षाही दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच लोक अधिक घाबरले आहेत. या सरकारला कामगार, शेतकरी, ओबीसी, अल्पसंख्यांक, दलित ही रेषेच पुसून टाकायची आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे डोळझाक करुन अन्य प्रश्न पुढे केले जात आहेत. हा कायदा आणणे म्हणजे त्याचाच एक भाग आहे.७०० स्वयंसेवक आसाममध्येकेंद्राने आणलेल्या कायदा आणि विधेयकांना विरोध करण्यासाठी आसाममध्ये फाऊंडेशनचे ७०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. फाऊंडेशनच्यावतीने आदिवासी क्षेत्रातील वनजमीनी आणि त्यासंबंधीचे कायदे यावर जनजागृती केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी संविधान बचाव नागरी कृती समितीचे मुकुंद सपकाळे, प्रा. प्रितीलाल पवार, दिलीप सपकाळे उपस्थित होते.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव