शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सात दिवसात रक्कम न भरल्यास दंड आकारण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:57 IST

न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश देऊनही मोबदला मिळत नाही, सततच्या दुष्काळाने त्यात अधिक भर पाडली आणि तहसीलदारांनी ९ लाख रुपये कब्जा हक्काची रक्कम मिळाली नाही म्हणून अमळनेर तालुक्यातील पाडळसरेवासीयांना नोटीस देऊन सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची अवस्था ‘आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना’ सारखी झाली आहे.

ठळक मुद्देन्यायालयाने निकाल देवून २ ते ३ वर्षे झालीत तरी मोबदला नाहीदुष्काळी परिस्थितीमुळे प्रकल्पग्रस्तांना भूखंड कब्जा हक्काची रक्कम भरणे अवघड

अमळनेर/ कळमसेर : न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश देऊनही मोबदला मिळत नाही, सततच्या दुष्काळाने त्यात अधिक भर पाडली आणि तहसीलदारांनी ९ लाख रुपये कब्जा हक्काची रक्कम मिळाली नाही म्हणून पाडळसरेवासीयांना नोटीस देऊन सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची अवस्था ‘आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना’ सारखी झाली आहे.तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या पाडळसरे धरणामुळे सर्व प्रथम १०० टक्के बुडिताखाली येणाऱ्या गावातील २८० घरातील कुटुंबियांच्या जमिनीचे दोन हजार साली संपूर्ण संपादन करण्यात आले आहे, मात्र तुटपुंजा सरकारी मोबदला देऊन प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसून स्थलांतर करण्यासाठी कळमसरे शेत शिवारातील १३ गटातील १८ हेक्टर ३२ आर जमिनीत ८ आॅगस्ट २००३ या वर्षी भूखंड वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या कडून काढण्यात आले. तर २० आॅक्टोबर रोजी २८८ प्रकल्पग्रस्ताना भूखंड वाटप केलेल्या जमिनीचा संपादन खर्च, अतिरिक्त जमीन संपादनाची किंमत, भूखंडावर करण्यात आलेले सीमांकनासाठी दगडी खुणांवरील खर्च प्रकल्पग्रस्तांकडून वैयक्तिक पातळीवर वसूल करण्याचे आदेशानुसार २८८ भूखंड धारकांपैकी २३३ धारकांनी कब्जा हक्काची रक्कम भरली आहे, मात्र जवळपास ५५ भूखंड धारकांनी २००३ पासून आज पावेतो कब्जा हक्काची रक्कम भरली नाही. त्यांना अमळनेरचे तहसीलदार यांनी तलाठी मार्फत नोटीस बजावली असून त्यांनी ७ दिवसात भूखंड कब्जा हक्काची रक्कम भरली नाही तर कायद्यानुसार कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या १७४ नुसार थकबाकीची एक चतुर्थाश रक्कम अतिरिक्त दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे. मात्र शासनाने घरे व जमीनी संपादन करून तूटपूंजा सरकारी मोबदला देवून मोकळे झाले आहेत. तथापि मोबदला वाढवून मिळावा म्हणून गावातील प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी न्यायालयात २०११ व १२ या वर्षीच आपले दावे दाखल केले होते. त्याच्यावर कामकाज होऊन प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निकाल लागला आहे. न्यायालयीन निकालानुसार अनेक कुटुंबीयांना मोबदला मागणीपत्र तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सर्कल विभागात व नंतर मुख्य कार्यालयात कार्यकारी संचालक यांच्याकडे दिले आहे. जवळपास ६० प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी वाढीव भूसंपादन मोबदलासाठीचे मागणी पत्र दिले असून न्यायालयाने निकाल देवून २ ते ३ वर्षे झालीत तरी मोबदला मिळत नाहीत, आणि शेवटी तडजोडी अंती काही रक्कम सोडायला प्रकल्पग्रस्त तयार असूनही मोबदल्यासाठी दिरंगाई व चालढकल केली जात आहे. यात तुटपुंज्या मोबदल्यात नवीन जमिनीत घरेच बांधणे अवघड काम असताना गेल्या ४ वर्षांपासून सततची नापिकी व पाचवीला पुजलेली दुष्काळी परिस्थितीमुळे कुटुंब चालविणे अवघड असलेल्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड कब्जा हक्काची रक्कम भरणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन निवाड्याचा मोबदला देण्याऐवजी १५ वर्षांपासून सुस्त असलेले प्रशासन आणि महसूल विभाग अचानकपणे दुष्काळी परिस्थितीत जागे झाले आहे. 

टॅग्स :Damधरण