शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:07 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सुजाण पालकत्व’ या सदरात मानसोचार तज्ज्ञ डॉ.नीरज देव यांचा लेख ‘मुलगा मोबाइलच सोडत नाही’

हा प्रश्न सोडविण्यासाठी या समस्येला नीट समजावून घेणे गरजेचे आहे. आज मोबाइल बहुउपयोगी उपकरण म्हणून वापरल्या जातोय ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. तो केवळ दूरभाष म्हणून वापरला जात नाही तर कॅमेरा, व्हीडिओ, अल्बम, कॅल्युलेटर, कॉम्प्युटर, टीव्ही, रेडीओ, टेपरेकॉर्डर, सीडी-डिव्हीडी प्लेयर, इंटरनेट संपर्क अगदी पुस्तक म्हणूनसुद्धा आदी अनेकानेक कामांसाठी सहजतेने वापरता येणारे, सहज उपलब्ध होणारे व परवडणारे साधन म्हणून वापरला जात आहे. जेव्हा एखादे साधन इतके आकर्षक व बहुउपयोगी बनते तेव्हा त्याचे व्यसन जडणे तसे स्वाभाविकच ठरते. विशेषत: समज येण्यापूर्वीच्या वयात तो हाती लागला तर मग विचारणेच नको. आज काल तर हातात खुळखुळा धरण्याआधी मोबाइल धरला जातो व तो खुळखुळ्याचेही काम करत असल्याने हातातून सुटतच नाही. या समस्येची व्यापकता ध्यानात घेऊन पालकांनी खालील बाबी पाळायला हव्यात।०१। अगदी बालवयात, शिशूवयात मुला वा मुलीने शांत बसावे, त्रास देऊ नये म्हणून पालक त्यांना मोबाइल देताना दिसतात. ते बाळाच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक व कधी कधी मेंदूजन्य विकासाला घातक ठरते. हे कटाक्षाने टाळावे.०२। शक्यतोवर मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणूनच करायला हवा. जर ते शक्य नसेल तर घरात संपकार्साठी लॅण्डलाईन फोन शक्यतो वापरावा. मोबाईल बंद ठेवावा. फोटो, व्हीडिओ इत्यादी बाबींसाठी शक्यतोवर कॅमेरा इत्यादीसारखी साधनेच वापरावीत. क्रिकेट मॅच, धारावाहिक, बातम्या इत्यादी पाहण्यासाठी मोबाइलचा वापर टाळावा. शक्यतोवर टीव्ही वा एलसीडीचा वापर करावा. थोडक्यात होता होईल तितका मोबाइलचा वापर कमी करावा.०३। घरात असताना मुलांसोबत प्रत्यक्ष संवादाला अधिक वेळ द्यावा. त्यातही मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, त्याच्यातील उपजत कलागुणांना वाव देणे, कौतुक करणे इत्यादी बाबी केल्या तर मुलांचे लक्ष मोबाइलवरून कमी करणे शक्य होऊ शकते.०४। मुलांनी उन्हातान्हात क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळून आजारी पडण्यापेक्षा मोबाइलवर त्यांनी ते खेळ खेळावेत, असा चुकीचा सल्ला काही पालक देत असतात. असा सल्ला टाळून मुलांना मैदानी खेळ खेळायला पालकांनी प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे मुलांचा मुलांशी संपर्क वाढतो, त्यांच्या सामाजिक समायोजनाला मदत होते. मैदानी खेळाकडे लक्ष वाढल्याने मोबाइलकडे लक्ष जाण्याची शक्यता कमी व्हायला मदत होते.०५। त्याचप्रमाणे बुद्धिबळ, कॅरम इत्यादी बैठे खेळ प्रत्यक्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. वाटल्यास आरंभी आपण त्यांच्यासोबत खेळून नंतर इतर मुलांसोबत खेळायला उत्तेजन द्यावे. या प्रकारच्या खेळांमुळे बुद्धीच्या विकासासोबत संयम, वाट पहाण्याची तयारी, एकाग्रता आदी बाबींचा विकास मुलांत होतो. प्रत्यक्ष खेळण्याकडे चित्त लागल्याने, त्यातील जयापजयाचे थ्रिल अनुभवल्याने मोबाइलवर लक्ष जाण्याची शक्यता कमी होते.या व अशा काही बाबींचा कौशल्याने केलेला वापर मुलांना मोबाइलपासून परावृत्त करायला उपयोगी ठरु शकतो. मोबाइल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि मुलं असे समीकरणच झाले आहे. या समीकरणात आई-वडील आले की व्यस्त समीकरणाला सुरवात होते. अर्थात आई-वडीलच कशाला, नवरा-बायकोचे नातेही याच व्यस्ततेत बसते. मोबाइलचा अति वापर मुलं करतात, ही प्रत्येक पालकासाठी मोठी समस्या बनलेली आहे. यातून सुटका कशी करावी हा त्याहीपेक्षा गहन प्रश्न बनला आहे. यातून काही प्रकारच्या मानसिक समस्या वा मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांचा विचार करण्यासाठी सायबर सायकॉलॉजीची निर्मिती अलिकडेच करण्यात आलेली आहे.