शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:07 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सुजाण पालकत्व’ या सदरात मानसोचार तज्ज्ञ डॉ.नीरज देव यांचा लेख ‘मुलगा मोबाइलच सोडत नाही’

हा प्रश्न सोडविण्यासाठी या समस्येला नीट समजावून घेणे गरजेचे आहे. आज मोबाइल बहुउपयोगी उपकरण म्हणून वापरल्या जातोय ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. तो केवळ दूरभाष म्हणून वापरला जात नाही तर कॅमेरा, व्हीडिओ, अल्बम, कॅल्युलेटर, कॉम्प्युटर, टीव्ही, रेडीओ, टेपरेकॉर्डर, सीडी-डिव्हीडी प्लेयर, इंटरनेट संपर्क अगदी पुस्तक म्हणूनसुद्धा आदी अनेकानेक कामांसाठी सहजतेने वापरता येणारे, सहज उपलब्ध होणारे व परवडणारे साधन म्हणून वापरला जात आहे. जेव्हा एखादे साधन इतके आकर्षक व बहुउपयोगी बनते तेव्हा त्याचे व्यसन जडणे तसे स्वाभाविकच ठरते. विशेषत: समज येण्यापूर्वीच्या वयात तो हाती लागला तर मग विचारणेच नको. आज काल तर हातात खुळखुळा धरण्याआधी मोबाइल धरला जातो व तो खुळखुळ्याचेही काम करत असल्याने हातातून सुटतच नाही. या समस्येची व्यापकता ध्यानात घेऊन पालकांनी खालील बाबी पाळायला हव्यात।०१। अगदी बालवयात, शिशूवयात मुला वा मुलीने शांत बसावे, त्रास देऊ नये म्हणून पालक त्यांना मोबाइल देताना दिसतात. ते बाळाच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक व कधी कधी मेंदूजन्य विकासाला घातक ठरते. हे कटाक्षाने टाळावे.०२। शक्यतोवर मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणूनच करायला हवा. जर ते शक्य नसेल तर घरात संपकार्साठी लॅण्डलाईन फोन शक्यतो वापरावा. मोबाईल बंद ठेवावा. फोटो, व्हीडिओ इत्यादी बाबींसाठी शक्यतोवर कॅमेरा इत्यादीसारखी साधनेच वापरावीत. क्रिकेट मॅच, धारावाहिक, बातम्या इत्यादी पाहण्यासाठी मोबाइलचा वापर टाळावा. शक्यतोवर टीव्ही वा एलसीडीचा वापर करावा. थोडक्यात होता होईल तितका मोबाइलचा वापर कमी करावा.०३। घरात असताना मुलांसोबत प्रत्यक्ष संवादाला अधिक वेळ द्यावा. त्यातही मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, त्याच्यातील उपजत कलागुणांना वाव देणे, कौतुक करणे इत्यादी बाबी केल्या तर मुलांचे लक्ष मोबाइलवरून कमी करणे शक्य होऊ शकते.०४। मुलांनी उन्हातान्हात क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळून आजारी पडण्यापेक्षा मोबाइलवर त्यांनी ते खेळ खेळावेत, असा चुकीचा सल्ला काही पालक देत असतात. असा सल्ला टाळून मुलांना मैदानी खेळ खेळायला पालकांनी प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे मुलांचा मुलांशी संपर्क वाढतो, त्यांच्या सामाजिक समायोजनाला मदत होते. मैदानी खेळाकडे लक्ष वाढल्याने मोबाइलकडे लक्ष जाण्याची शक्यता कमी व्हायला मदत होते.०५। त्याचप्रमाणे बुद्धिबळ, कॅरम इत्यादी बैठे खेळ प्रत्यक्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. वाटल्यास आरंभी आपण त्यांच्यासोबत खेळून नंतर इतर मुलांसोबत खेळायला उत्तेजन द्यावे. या प्रकारच्या खेळांमुळे बुद्धीच्या विकासासोबत संयम, वाट पहाण्याची तयारी, एकाग्रता आदी बाबींचा विकास मुलांत होतो. प्रत्यक्ष खेळण्याकडे चित्त लागल्याने, त्यातील जयापजयाचे थ्रिल अनुभवल्याने मोबाइलवर लक्ष जाण्याची शक्यता कमी होते.या व अशा काही बाबींचा कौशल्याने केलेला वापर मुलांना मोबाइलपासून परावृत्त करायला उपयोगी ठरु शकतो. मोबाइल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि मुलं असे समीकरणच झाले आहे. या समीकरणात आई-वडील आले की व्यस्त समीकरणाला सुरवात होते. अर्थात आई-वडीलच कशाला, नवरा-बायकोचे नातेही याच व्यस्ततेत बसते. मोबाइलचा अति वापर मुलं करतात, ही प्रत्येक पालकासाठी मोठी समस्या बनलेली आहे. यातून सुटका कशी करावी हा त्याहीपेक्षा गहन प्रश्न बनला आहे. यातून काही प्रकारच्या मानसिक समस्या वा मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांचा विचार करण्यासाठी सायबर सायकॉलॉजीची निर्मिती अलिकडेच करण्यात आलेली आहे.