शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:07 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सुजाण पालकत्व’ या सदरात मानसोचार तज्ज्ञ डॉ.नीरज देव यांचा लेख ‘मुलगा मोबाइलच सोडत नाही’

हा प्रश्न सोडविण्यासाठी या समस्येला नीट समजावून घेणे गरजेचे आहे. आज मोबाइल बहुउपयोगी उपकरण म्हणून वापरल्या जातोय ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. तो केवळ दूरभाष म्हणून वापरला जात नाही तर कॅमेरा, व्हीडिओ, अल्बम, कॅल्युलेटर, कॉम्प्युटर, टीव्ही, रेडीओ, टेपरेकॉर्डर, सीडी-डिव्हीडी प्लेयर, इंटरनेट संपर्क अगदी पुस्तक म्हणूनसुद्धा आदी अनेकानेक कामांसाठी सहजतेने वापरता येणारे, सहज उपलब्ध होणारे व परवडणारे साधन म्हणून वापरला जात आहे. जेव्हा एखादे साधन इतके आकर्षक व बहुउपयोगी बनते तेव्हा त्याचे व्यसन जडणे तसे स्वाभाविकच ठरते. विशेषत: समज येण्यापूर्वीच्या वयात तो हाती लागला तर मग विचारणेच नको. आज काल तर हातात खुळखुळा धरण्याआधी मोबाइल धरला जातो व तो खुळखुळ्याचेही काम करत असल्याने हातातून सुटतच नाही. या समस्येची व्यापकता ध्यानात घेऊन पालकांनी खालील बाबी पाळायला हव्यात।०१। अगदी बालवयात, शिशूवयात मुला वा मुलीने शांत बसावे, त्रास देऊ नये म्हणून पालक त्यांना मोबाइल देताना दिसतात. ते बाळाच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक व कधी कधी मेंदूजन्य विकासाला घातक ठरते. हे कटाक्षाने टाळावे.०२। शक्यतोवर मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणूनच करायला हवा. जर ते शक्य नसेल तर घरात संपकार्साठी लॅण्डलाईन फोन शक्यतो वापरावा. मोबाईल बंद ठेवावा. फोटो, व्हीडिओ इत्यादी बाबींसाठी शक्यतोवर कॅमेरा इत्यादीसारखी साधनेच वापरावीत. क्रिकेट मॅच, धारावाहिक, बातम्या इत्यादी पाहण्यासाठी मोबाइलचा वापर टाळावा. शक्यतोवर टीव्ही वा एलसीडीचा वापर करावा. थोडक्यात होता होईल तितका मोबाइलचा वापर कमी करावा.०३। घरात असताना मुलांसोबत प्रत्यक्ष संवादाला अधिक वेळ द्यावा. त्यातही मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, त्याच्यातील उपजत कलागुणांना वाव देणे, कौतुक करणे इत्यादी बाबी केल्या तर मुलांचे लक्ष मोबाइलवरून कमी करणे शक्य होऊ शकते.०४। मुलांनी उन्हातान्हात क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळून आजारी पडण्यापेक्षा मोबाइलवर त्यांनी ते खेळ खेळावेत, असा चुकीचा सल्ला काही पालक देत असतात. असा सल्ला टाळून मुलांना मैदानी खेळ खेळायला पालकांनी प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे मुलांचा मुलांशी संपर्क वाढतो, त्यांच्या सामाजिक समायोजनाला मदत होते. मैदानी खेळाकडे लक्ष वाढल्याने मोबाइलकडे लक्ष जाण्याची शक्यता कमी व्हायला मदत होते.०५। त्याचप्रमाणे बुद्धिबळ, कॅरम इत्यादी बैठे खेळ प्रत्यक्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. वाटल्यास आरंभी आपण त्यांच्यासोबत खेळून नंतर इतर मुलांसोबत खेळायला उत्तेजन द्यावे. या प्रकारच्या खेळांमुळे बुद्धीच्या विकासासोबत संयम, वाट पहाण्याची तयारी, एकाग्रता आदी बाबींचा विकास मुलांत होतो. प्रत्यक्ष खेळण्याकडे चित्त लागल्याने, त्यातील जयापजयाचे थ्रिल अनुभवल्याने मोबाइलवर लक्ष जाण्याची शक्यता कमी होते.या व अशा काही बाबींचा कौशल्याने केलेला वापर मुलांना मोबाइलपासून परावृत्त करायला उपयोगी ठरु शकतो. मोबाइल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि मुलं असे समीकरणच झाले आहे. या समीकरणात आई-वडील आले की व्यस्त समीकरणाला सुरवात होते. अर्थात आई-वडीलच कशाला, नवरा-बायकोचे नातेही याच व्यस्ततेत बसते. मोबाइलचा अति वापर मुलं करतात, ही प्रत्येक पालकासाठी मोठी समस्या बनलेली आहे. यातून सुटका कशी करावी हा त्याहीपेक्षा गहन प्रश्न बनला आहे. यातून काही प्रकारच्या मानसिक समस्या वा मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांचा विचार करण्यासाठी सायबर सायकॉलॉजीची निर्मिती अलिकडेच करण्यात आलेली आहे.