शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

वेदनेतून चांगल्या कार्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:18 IST

भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देडॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण

जळगाव : योजना करून सेवा कार्य करता येत नाही. एखादे दृश्य बघितल्यावर जी वेदना मनात निर्माण होते त्यातूनच चांगले कार्य उभे रहाते. आज गौरव होणाऱ्या संस्थांचे कार्य हे अशाच भावनेतून उभे राहिले आहे. आईच्या हृदयाची भावना मनात ठेऊन अशा कार्यांच्या पाठीशी समाजानेही उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी गुरूवारी सायंकाळी येथे आयोजित डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.केशव स्मृती सेवासंस्था समूह व जळगाव जनता सहकारी बॅँकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात २०१७-१८ चा डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वैयक्तीक गटातून सहारा अनाथालय गेवराई येथील संतोष गर्जे यांना देण्यात आला. तर संस्थात्मक गटातून औरंगाबाद येथील ‘साकार’ संस्थेस देण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सविता पानट व पदाधिकाºयांनी हा पुरस्कार स्वीकारला. वैयक्तीक गटात स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख आणि संस्था गटात स्मृतीचिन्ह व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते.प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक पुखराज पगारिया, रा.स्व. संघाचे प्रांत संघचालक मधुकरराव जाधव, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जनता सहकारी बॅँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, सत्कारमूर्ती डॉ. सविता पानट, संतोष गर्जे आदी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन करण्यात आले. यानंतर सत्कारार्थीच्या संस्थांचा कार्याची चित्रफित दाखविण्यात आली.प्रगती झाली पण...स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची प्रगती झाली. अन्नधान्य, विज्ञान, शिक्षण, वैद्यकीय सुविधा येथे आहेत. ८० कोटी लोकांच्या हातात मोबाईल आहे. मात्र दुसरीकडे दृष्टीक्षेप टाकला तर वेदना दायक दृश्य आहे. अनेकांना वेळेवर औषध मिळत नाही. आजाराशी झुंज देणारे वनवासी बांधव देशात आहेत. शाळा आहे पण शिक्षा नाही.देशात ३५ कोटींच्या जवळपास जनता दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहे. समाजातील या वर्गाचे चिंतन कोण करणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. हा अंधकार दूर करण्यासाठी दिव्या सारखे उभे राहून अंधार दूर करण्याची गरज आहे. दृश्यानुभूतीतून सेवा होते, दृश्य बघितल्यावर जी वेदना मनात निर्माण होते त्यातूनच कार्य उभे रहाते. समाजात दातृत्व करणारी मंडळीही आहे. या मार्गावरून चालणारे थकणार नाहीत, अशी मदत समाजाने सेवा भावाने कार्य करणाºयांना करावी, असे आवाहन त्यांनी केले.उद्योजक पुखराज पगारिया यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले. ‘साकार’ संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात पुरस्कार मिळणे ही आम्हा सर्वांच्या कार्याची पावती असल्याचे डॉ. सविता पानट म्हणाल्या.डॉ. आचार्य कुटुंबियांची उपस्थितीयावेळी अनुराधा आचार्य, मुलगी डॉ. आरती आचार्य-हुजुरबाजार, जावई डॉ. संजीव हुजूरबााजर, नातू शिवम हे देखील उपस्थित होते. यासह संघ परिवारातील स्वयंसेवक, केशव स्मृती अंतर्गत संस्थांचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संगिता अट्रावलकर व संदीप लाड यांनी केले. किरण सोहळे यांनी वैयक्तीक गीत सादर केले. प्राचार्य अनिल राव यांनी आभार मानले.अनाथांच्या नाथा तुज नमोभैय्याजी जोशी पुढे म्हणाले की, ‘अनाथांच्या नाथा तुज नमो’ आज या भजनाची आठवण झाली. ज्यांचा येथे सत्कार होत आहे त्या व्यक्ती व संस्था नमन करण्यासारख्याच आहेत. पुरस्कार अशा व्यक्तीच्या नावाने दिला जातोय ती व्यक्ती ‘आचार्य दादा नावाने ओळखली जात होती. समर्पण, संवेदना, कर्तृत्व, जीवनभराची सक्रियता म्हणजे दादा. या नावामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढते आहे. सेवा हा बोलण्याचा विषय नाही. ज्यांचा येथे सत्कार झाला त्यांना आपण उपकृत करत आहोत असो भावही नसावा. समाज असा घडावा की अशा संस्थांची गरज राहू नये.वेदनांशी समरस व्हा...समाजाने दुसºयांच्या वेदनांशी समरस व्हावे, अशी अपेक्षा संतोष गर्जे यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार अनाथालयातील माझ्या लेकरांना व मदत करणाºयांना समर्पित करतो, असेही ते म्हणाले. या व्यक्तींमुळेच जगण्याचा मार्ग मिळाल्याचे ते म्हणाले.