ठळक मुद्देपाच पावले सरकला रथरथयात्रा झाली रद्द
पाचोरा : मंत्रघोषाच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात येथील पारंपरिक रथाचे रविवारी सकाळी पूजन उत्साहात करण्यात आले, तर यापूर्वीच रथयात्रा रद्द केल्याचे आयोजकांनी जाहीर केले होते.बालाजी महाराजांच्या रथाचे पूजन सकाळी साडेअकराला करण्यात आले. यावर्षी रथाच्या पूजेचा मान भालचंद्र पाटील आणि संगीता पाटील या दांपत्याला मिळाला. बालाजी महाराजांच्या रथाला दोर बांधून लोक समूहाद्वारे केवळ पाच पावले रथ ओढण्यात आला. यावेळी रथासमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. लहानमोठी दुकाने सजल्याचे दिसून आले.बालाजी रथाची आख्यायिकापाचोरा येथील अर्जुन पाटील यांचे वंशज रामा पाटील यांचे भाऊ श्यामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारी करायचे. एकदा ते पंढरपूरला वारीसाठी गेलेले असताना चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातलेला असताना त्यांना श्री बालाजी महाराजांची दगडी मूर्ती त्यांना गवसली. परमेश्वर प्रसन्न झाला. या भावनेने त्यांनी ती मूर्ती दिंडीसोबत पाचोर्याला आणले आणि हा वृत्तांत आपल्या भावांना सांगितला. श्यामा पाटील यांना गृलबाळ नसल्याने त्यांच्या वाट्याला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री बालाजी मंदिर तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगाव राजा येथील पंडित व महंत यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि तेव्हापासून रथाची मिरवणूक उत्सव सुरू झाला.रथ थांबवणे,वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग केला जातो. मोगरी लावण्याचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व संपूर्ण परिवाराने पार पडले. परशुराम अहिरे आणि त्यांचे सहकारी नितीन शिरसाठ यांनी पारंपरिक पद्धतीने रथासमोर मशाल लावण्याचे काम पहिले. सयाजी पाटील परिवार आणि भक्त यांच्या अथक परिश्रमातून दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लक्षवेधी ठरते.बालाजी महाराजांच्या रथाची परंपराबालाजी महाराजांचा रथ हा पाचोरा नगरदेवळा येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला आहे. रथाची उंची ३० फूट इतकी आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले असून त्यावर कळस ठेवला जातो. अग्रभागी लाकडी घोडे आणि सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती बसवलेली असते. त्यांच्या दोन्ही बाजूस चोपदार यांच्या मूर्ती उभ्या केलेल्या असतात तर मागील बाजूस राक्षसाच्या मूर्ती उभ्या केलेल्या असतात. पुढील भागाच्या कळसाचे खाली परी आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवल्या होत्या. रथाचे चारही बाजूस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, ऊस, झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सुशोभित केला जातो. तसेच रथावर विजेची रोषणाई केली जात असल्यामुळे रथ खूपच विलोभनीय भासतो.उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पीएसआय गणेश चोबे, एपीआय राहुल मोरे, पी एस आय विकास पाटील यांचेसह सर्व पोलीस प्रशासनाने चोख प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.पाचोऱ्याला बालाजी रथपूजन जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 13:52 IST