शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

तिशी ओलांडली; पगार कमी, नवऱ्याला नवरी मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:09 IST

काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे.

- अमित महाबळ

जळगाव : मुलामुलींची वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी विवाह जुळणे ही आता एक मोठी समस्या बनली आहे. दोघांच्याही असलेल्या अवास्तव अपेक्षा, तडजोडीस तयार नसणे, पालकांची मानसिकता यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे. दोनही बाजूने ठेवण्यात येणाऱ्या काही अटी यामध्ये अडथळा ठरत आहेत. शेतकरी मुलांना मुलगी मिळेनाशी झाली आहे. मुलगा उच्चशिक्षित असल्यास त्याला ग्रामीण भागातील, आपल्यापेक्षा कमी शिकलेली मुलगी नको असते. मुलाचा स्वत:चा फ्लॅट मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरात असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. विवाह न जमण्यात कमी पगार ही मुख्य अडचण आहे. परदेशी जाण्यास मुली आता तयार नसतात. हा एक बदल झाला आहे. मात्र, परदेशात नोकरीला असलेल्या मुलांनी काय करावे ? या प्रश्नाचे उत्तर किचकट झाले आहे. घरात सासू-सासरे नकोत ही अट काटेरी ठरत आहे.

म्हणून वाढतेय विवाहाचे वयमुलगा आणि मुलगी या दोघांच्याही काही अपेक्षा अशा असतात की, त्यामुळे त्यांचे विवाहाचे वय वाढत चालले आहे. शिक्षण, मालमत्ता, मोठ्या शहरांसाठी आग्रह, कुटुंबांतील सदस्यांची संख्या किंवा घरात सासू-सासरे नकोत आदी मुद्दे यामध्ये आहेत.

वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टरवकील, डॉक्टर असलेल्या मुला-मुलींना आपला जोडीदार समव्यावसायिक असावा, अशी अपेक्षा असते. तशी अटच त्यांच्या परिचय पत्रात टाकली जाते. अभियांत्रिकी, संशोधन क्षेत्रात शिक्षण झालेल्यांची अपेक्षा उच्चशिक्षित जोडीदार मिळावा, अशी असते.

५० टक्के तरुण तिशीपारविवाहविषयक समस्येचा धांडोळा घेताना ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण ५० टक्के तरूण तिशीपार आढळले. मुलगा असल्यास वय वर्ष २८ तर, मुलीसाठी वय वर्ष २० ते २२ नंतर पालक स्थळ पाहण्यास सुरुवात करतात.

१० टक्के चाळिशीपारयोग्य वयात विवाह न होणे ही एक मोठीच समस्या बनली आहे. वयाची तिशी उलटून जाणे ही बाब सामान्य बनली आहे. ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण १० टक्के तरूण चाळिशीपार आढळले.

अपेक्षा वाढल्या....मुला-मुलींच्या अपेक्षा खूप असतात. त्यामुळेही योग्य वयात त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. त्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा लवकर मिळत नाही. आधीच्या तुलनेत अपेक्षा खूप वाढल्या आहेत.- अजय डोहोळे

मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाहाचे वय वाढते. त्यांना मुलगी मिळत नाही. सरकारी नोकऱ्या कमी संख्येने उपलब्ध असल्या तरी त्यासाठीचा मुलींचा आग्रह कायम आहे.- लक्ष्मीकांत चौधरी

भरपूर उत्पन्न, उच्च शिक्षणाच्या अवास्तव अपेक्षा यामुळे मुला-मुलींचे विवाह जमण्यात अडथळे येतात. ज्याच्याकडे शेती कमी आहे आणि जो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, अशा मुलांसमोरील समस्या मोठी आहे.- सुमित पाटील

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न