शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

तिशी ओलांडली; पगार कमी, नवऱ्याला नवरी मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:09 IST

काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे.

- अमित महाबळ

जळगाव : मुलामुलींची वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी विवाह जुळणे ही आता एक मोठी समस्या बनली आहे. दोघांच्याही असलेल्या अवास्तव अपेक्षा, तडजोडीस तयार नसणे, पालकांची मानसिकता यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे. दोनही बाजूने ठेवण्यात येणाऱ्या काही अटी यामध्ये अडथळा ठरत आहेत. शेतकरी मुलांना मुलगी मिळेनाशी झाली आहे. मुलगा उच्चशिक्षित असल्यास त्याला ग्रामीण भागातील, आपल्यापेक्षा कमी शिकलेली मुलगी नको असते. मुलाचा स्वत:चा फ्लॅट मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरात असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. विवाह न जमण्यात कमी पगार ही मुख्य अडचण आहे. परदेशी जाण्यास मुली आता तयार नसतात. हा एक बदल झाला आहे. मात्र, परदेशात नोकरीला असलेल्या मुलांनी काय करावे ? या प्रश्नाचे उत्तर किचकट झाले आहे. घरात सासू-सासरे नकोत ही अट काटेरी ठरत आहे.

म्हणून वाढतेय विवाहाचे वयमुलगा आणि मुलगी या दोघांच्याही काही अपेक्षा अशा असतात की, त्यामुळे त्यांचे विवाहाचे वय वाढत चालले आहे. शिक्षण, मालमत्ता, मोठ्या शहरांसाठी आग्रह, कुटुंबांतील सदस्यांची संख्या किंवा घरात सासू-सासरे नकोत आदी मुद्दे यामध्ये आहेत.

वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टरवकील, डॉक्टर असलेल्या मुला-मुलींना आपला जोडीदार समव्यावसायिक असावा, अशी अपेक्षा असते. तशी अटच त्यांच्या परिचय पत्रात टाकली जाते. अभियांत्रिकी, संशोधन क्षेत्रात शिक्षण झालेल्यांची अपेक्षा उच्चशिक्षित जोडीदार मिळावा, अशी असते.

५० टक्के तरुण तिशीपारविवाहविषयक समस्येचा धांडोळा घेताना ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण ५० टक्के तरूण तिशीपार आढळले. मुलगा असल्यास वय वर्ष २८ तर, मुलीसाठी वय वर्ष २० ते २२ नंतर पालक स्थळ पाहण्यास सुरुवात करतात.

१० टक्के चाळिशीपारयोग्य वयात विवाह न होणे ही एक मोठीच समस्या बनली आहे. वयाची तिशी उलटून जाणे ही बाब सामान्य बनली आहे. ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण १० टक्के तरूण चाळिशीपार आढळले.

अपेक्षा वाढल्या....मुला-मुलींच्या अपेक्षा खूप असतात. त्यामुळेही योग्य वयात त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. त्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा लवकर मिळत नाही. आधीच्या तुलनेत अपेक्षा खूप वाढल्या आहेत.- अजय डोहोळे

मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाहाचे वय वाढते. त्यांना मुलगी मिळत नाही. सरकारी नोकऱ्या कमी संख्येने उपलब्ध असल्या तरी त्यासाठीचा मुलींचा आग्रह कायम आहे.- लक्ष्मीकांत चौधरी

भरपूर उत्पन्न, उच्च शिक्षणाच्या अवास्तव अपेक्षा यामुळे मुला-मुलींचे विवाह जमण्यात अडथळे येतात. ज्याच्याकडे शेती कमी आहे आणि जो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, अशा मुलांसमोरील समस्या मोठी आहे.- सुमित पाटील

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न