शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

रावेर तालुक्यातील ४१ पैकी १७ गावे झाली कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 23:46 IST

रावेर तालुक्यातील ४१ पैकी १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

ठळक मुद्दे१७ गावातील ९ जणांचा झाला मृत्यू७२ जणांनी केली कोरोनावर मात

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ४१ कोरोनाबाधित गावांपैकी खानापूर, निंभोरासीम, ऐनपूर,  कुसूंबा बु ।।, रमजीपूर, कुंभारखेडा, मस्कावद बु ।।, भोकरी, तामसवाडी, सावखेडा खु, तांदलवाडी, मस्कावद सीम, वाघोड, लोहारा, वाघोदा खुर्द ।।, कर्जोद व निंबोल ही १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ७२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली. रावेर व सावदा शहरासह तालुक्यातील ४१ गावात ४३९ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यापैकी खानापूर, निंभोरासीम, ऐनपूर,  कुसूंबा बु ।।, रमजीपूर, कुंभारखेडा, मस्कावद बु ।।, भोकरी, तामसवाडी, सावखेडा खु, तांदलवाडी, मस्कावद सीम, वाघोड, लोहारा, वाघोदा खुर्द ।।, कर्जोद व निंबोल या १७ गावातील ७२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने उभय गावे कोरोनामुक्त झाले आहेत. या गावांमधील आजपावेतो आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी त्या काही गावांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची ३८ दिवसांची कालमर्यादा संपली नसल्याने प्रतिबंधित क्षेत्र अद्याप कायम आहेत.   दरम्यान, चिनावल, विवरे बु, रसलपूर, अहिरवाडी, केर्‍हाळे बु ।।, पाल, गाते, खिरोदा, उदळी, बु ।।, उटखेडा, कोचूर बु ।। व बक्षीपूर येथील एखाद दोन रूग्ण औषधोपचार घेत असून ८७ रूग्ण उभय गावातूनही कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.       दरम्यान वाघोदा बु।। येथील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १३ जण औषधोपचार घेत आहेत पिंप्री येथी १५ कोरोना बाधितांपैकी ७ जण कोरोनामुक्त झााले असून आठ जण कोविड केअर सेंटरला औषधोपचार घेत आहेत.दरम्यान, खिर्डी बु।।, अटवाडे, खिरवड, निंंभोरा बु ।।, सुनोदा, सुदगाव, नेहता व अजंदे येथील ३१ जण रावेर, फैजपूर, भुसावळ व जळगाव येथील कोरोना रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत तर २० जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, रावेर व सावदा शहरातील १९५ कोरोना बाधित रुग्णांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला असून ९९ जण कोरोना मुक्त झाले आहेत तर ८१ जण कोरोनावर औषधोपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली आहे. खानापूरला खबरदारी म्हणून पुन्हा जनता कर्फ्यूतालुक्यातील खानापूर येथे २५ रूग्ण कोरोना बाधित निघाल्यानंतर तीन जणांचा मृत्यू तर २२ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मात्र शेवटच्या रूग्णानंतर आता ११ दिवस झाले तरी एकही रूग्ण आढळून आला नसल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. मात्र तरीही ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने पुन्हा शेतकरी व शेतमजूर वगळता तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी एकदिलाने जनता कर्फ्यू दुसर्‍यांदा अंमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने एकच कौतुक होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर