शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील ४१ पैकी १७ गावे झाली कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 23:46 IST

रावेर तालुक्यातील ४१ पैकी १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

ठळक मुद्दे१७ गावातील ९ जणांचा झाला मृत्यू७२ जणांनी केली कोरोनावर मात

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ४१ कोरोनाबाधित गावांपैकी खानापूर, निंभोरासीम, ऐनपूर,  कुसूंबा बु ।।, रमजीपूर, कुंभारखेडा, मस्कावद बु ।।, भोकरी, तामसवाडी, सावखेडा खु, तांदलवाडी, मस्कावद सीम, वाघोड, लोहारा, वाघोदा खुर्द ।।, कर्जोद व निंबोल ही १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ७२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली. रावेर व सावदा शहरासह तालुक्यातील ४१ गावात ४३९ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यापैकी खानापूर, निंभोरासीम, ऐनपूर,  कुसूंबा बु ।।, रमजीपूर, कुंभारखेडा, मस्कावद बु ।।, भोकरी, तामसवाडी, सावखेडा खु, तांदलवाडी, मस्कावद सीम, वाघोड, लोहारा, वाघोदा खुर्द ।।, कर्जोद व निंबोल या १७ गावातील ७२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने उभय गावे कोरोनामुक्त झाले आहेत. या गावांमधील आजपावेतो आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी त्या काही गावांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची ३८ दिवसांची कालमर्यादा संपली नसल्याने प्रतिबंधित क्षेत्र अद्याप कायम आहेत.   दरम्यान, चिनावल, विवरे बु, रसलपूर, अहिरवाडी, केर्‍हाळे बु ।।, पाल, गाते, खिरोदा, उदळी, बु ।।, उटखेडा, कोचूर बु ।। व बक्षीपूर येथील एखाद दोन रूग्ण औषधोपचार घेत असून ८७ रूग्ण उभय गावातूनही कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.       दरम्यान वाघोदा बु।। येथील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १३ जण औषधोपचार घेत आहेत पिंप्री येथी १५ कोरोना बाधितांपैकी ७ जण कोरोनामुक्त झााले असून आठ जण कोविड केअर सेंटरला औषधोपचार घेत आहेत.दरम्यान, खिर्डी बु।।, अटवाडे, खिरवड, निंंभोरा बु ।।, सुनोदा, सुदगाव, नेहता व अजंदे येथील ३१ जण रावेर, फैजपूर, भुसावळ व जळगाव येथील कोरोना रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत तर २० जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, रावेर व सावदा शहरातील १९५ कोरोना बाधित रुग्णांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला असून ९९ जण कोरोना मुक्त झाले आहेत तर ८१ जण कोरोनावर औषधोपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली आहे. खानापूरला खबरदारी म्हणून पुन्हा जनता कर्फ्यूतालुक्यातील खानापूर येथे २५ रूग्ण कोरोना बाधित निघाल्यानंतर तीन जणांचा मृत्यू तर २२ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मात्र शेवटच्या रूग्णानंतर आता ११ दिवस झाले तरी एकही रूग्ण आढळून आला नसल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. मात्र तरीही ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने पुन्हा शेतकरी व शेतमजूर वगळता तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी एकदिलाने जनता कर्फ्यू दुसर्‍यांदा अंमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने एकच कौतुक होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर