सात वर्गाना केवळ चारच शिक्षक
By Admin | Updated: November 6, 2015 00:14 IST2015-11-06T00:14:39+5:302015-11-06T00:14:39+5:30
वर्गखोल्याही तीनच : विद्याथ्र्याचे नुकसान, खोडसगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

सात वर्गाना केवळ चारच शिक्षक
लहान शहादा : खोडसगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त संख्या, वर्गखोल्यांची कमतरता यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेने आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रारी करून, शिक्षकांची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. शासन एकीकडे गुणवत्ता वाढीसाठी प्रय} करीत आहे. विद्यार्थी गळती रोखावी, पटसंख्या वाढावी यासाठी विविध उपक्रमांचेही आयोजन ेकेले जात आहे. परंतु दुसरीकडे शिक्षकांची कमतरता, शाळा खोल्यांची अपूर्ण संख्या यामुळे विद्याथ्र्याच्या शैक्षणिक आणि गुणवत्तेच्या नुकसानीकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. अशीच स्थिती नंदुरबारपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडसगाव येथील शाळेतील आहे. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. गेल्या वर्षार्पयत पहिली ते सहावीचे वर्ग होते. यंदापासून सातवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. एकीकडे वर्ग वाढविले जात आहेत, तर दुसरीकडे शिक्षक संख्या आहे तशीच आहे. सात वर्गासाठी अवघे चार शिक्षक कार्यरत आहेत. त्यातही एका शिक्षकाला मुख्याध्यापकाचा पदभार असल्यामुळे इतर सर्व शैक्षणिक कामे त्यांना करावी लागतात. वर्गखोल्यांसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्गखोली बांधकाम मंजूर करण्यात आले. गेल्या वर्षापासून बांधकाम सुरू असले तरी त्याची गती अतिशय धिमी असल्यामुळे आणखी किमान एक ते दोन वर्ष वर्गखोल्या उपलब्ध होऊ शकणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे तोर्पयत विद्याथ्र्याना गोठय़ासारख्या स्थितीतच राहावे लागेल हे स्पष्ट आहे. वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने करावे. आणखी चार शिक्षकांची या ठिकाणी नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुस:या सत्रापासून याबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तीन खोल्यात भरतात सात वर्ग वर्गखोल्यांचीदेखील अडचणच आहे. अवघ्या तीन वर्गखोल्यांमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग बसवावे लागतात. अर्थात एका खोलीत दोन वर्ग भरवण्यात येत आहे. त्यामुळे कुठल्या बाजूला काय शिकवले जाते याचा काहीही ताळमेळ राहत नाही. एखादा शिक्षक गैरहजर राहिल्यास वर्ग सांभाळताना मोठी तारांबळ होते. अशा स्थितीत गुणवत्ता कशी टिकणार, शैक्षणिक उपक्रम कसे घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.