शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोष‍ित झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्‍ये ऑनलाईन शिक्षण पद्धत रूजली. परंतु, ग्रामीण भागात आजही अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत तर काहींकडे तेही नाहीत. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला बघायला मिळत आहे. परिणामी, अजूनही जळगाव जिल्ह्यातील लाखांच्यावर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

कोरोना विषाणूचा मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गतवर्षी मार्च महिन्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली आहे. परंतु, याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे चित्र काही दिवसातच समोर आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ही मुलं वाड्या-वस्त्यावर राहात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. या विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घरापर्यंत शिक्षण पोहोचवले. गुरूजींनी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. सोबत आकाशवाणीद्वारे शिक्षण दिले.

ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाल्यापासून पहिली ते दहावीचे शिक्षक व संबंधित संस्था त्या संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुलांसाठी अभ्यासक्रम टाकतात. हा अभ्यास शहरातील ठराविक मुलेच करतात व केलेला अभ्यास व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतात. दरम्यान, नुकत्याच शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे पुन्हा बंद पडल्या अन् ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण, हवे तसे ऑनलाईन शिक्षण अजूनही विद्यार्थ्यांना म‍िळत नाही. जिल्हा परिषद, मनपा शाळेतील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

परीक्षा मात्र सुरळीत

काही किरकोळ अडचणी वगळता ऑनलाईन परीक्षाही प्रभावी ठरली. शाळा, महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या. सुरूवातीला लॉग-इन होत नसल्याची तांत्रिक अडचण उद्भवली. नंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या. मात्र, प्रत्यक्ष शाळा व परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.