शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोष‍ित झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्‍ये ऑनलाईन शिक्षण पद्धत रूजली. परंतु, ग्रामीण भागात आजही अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत तर काहींकडे तेही नाहीत. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला बघायला मिळत आहे. परिणामी, अजूनही जळगाव जिल्ह्यातील लाखांच्यावर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

कोरोना विषाणूचा मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गतवर्षी मार्च महिन्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली आहे. परंतु, याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे चित्र काही दिवसातच समोर आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ही मुलं वाड्या-वस्त्यावर राहात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. या विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घरापर्यंत शिक्षण पोहोचवले. गुरूजींनी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. सोबत आकाशवाणीद्वारे शिक्षण दिले.

ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाल्यापासून पहिली ते दहावीचे शिक्षक व संबंधित संस्था त्या संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुलांसाठी अभ्यासक्रम टाकतात. हा अभ्यास शहरातील ठराविक मुलेच करतात व केलेला अभ्यास व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतात. दरम्यान, नुकत्याच शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे पुन्हा बंद पडल्या अन् ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण, हवे तसे ऑनलाईन शिक्षण अजूनही विद्यार्थ्यांना म‍िळत नाही. जिल्हा परिषद, मनपा शाळेतील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

परीक्षा मात्र सुरळीत

काही किरकोळ अडचणी वगळता ऑनलाईन परीक्षाही प्रभावी ठरली. शाळा, महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या. सुरूवातीला लॉग-इन होत नसल्याची तांत्रिक अडचण उद्भवली. नंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या. मात्र, प्रत्यक्ष शाळा व परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.