शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

पुराने वाहून नेली १०० एकर शेतजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:32 PM

पहूरच्या गोगडी नदीचा फटका :कपाशी, मका, भाजीपाल्यसह पिके पाण्यात

पहूर, ता. जामनेर : महसूल मंडळ परीसरात पावसाने कहर केला. गोगडी नदीला आलेल्या महापूरात नदीकाठाच्या दूतर्फा तब्बल शंभर एकर क्षेत्रावरील उभ्या पिकांसहित शेती वाहून गेली आहे. तर अन्य शिवारातील कपाशी, सोयाबीन पिके आजही पाण्यात असल्याने कापूस वेचणीही होणार नाही. मका, ज्वारी कणसे सडून गेले आहे. त्यामुळे कोट्यवधीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा स्थितीत बांधावर बसून पिकांकडे पाहून रडण्यापलीकडे शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.गेल्या आठवड्यत झालेल्या अवकाळी पावसामुळे पहूर आणि परिसरातील पंचवीस खेड्यातील शेतकºयांवर आसमानी संकट कोसाळले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.तेलही गेले.. तूपही गेले..हाती धुपटणे आले ..शेरी येथील रहिवासी मधुकर पांडुरंग बनकर हे भुमीहीन शेतकरी असून त्यांनी शेंगोळा शिवारात जमीन भाडेपट्टयाने केली आहे. मात्र तीन एकर जमिनीत मका सडून कणसांना कोंब आले आहे. कपाशीत पाणी असल्याने कापूस वेचणी करता येत नाही. बारा ते पंधरा एकर जमीनतील जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न पाण्यात गेले आहे. सध्या उत्पन्न तर सोडाच पण शेतीला लागलेला खर्चही निघणे अवघड आहे. त्यामुळे तेलही गेले.. तूपही गेले...हाती धुपाटणे आले अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे.अनेकांची शेती वाहिलीगोगडी धरणाच्या जवळून खचार्णा पर्यंत वाहणाºया गोगडी नदीला गेल्या शनिवारी महापूर आला.यात नदीच्या दुतर्फा शंभर एकर क्षेत्रातील जमीनी सहित वाहून गेले आहे. युवराज पंडीत बनकर यांच्या साडेतीन एकर जमीनीतील कपाशी, मिरची,गिलके वाहून गेले आहे. ठिबकसंचही वाहून गेला. जमीन नदीपात्रासारखी दिसून येत आहे. याच काठावरील ओंकार पंडीत बनकर, नितीन रघुनाथ वारूळे अशा सत्तर शेतकºयांची जमीन पिकांसह वाहून गेली. शिवनगरशिवारातील एकनाथ संपत करंवदे यांचे वीस एकर क्षेत्रात कपाशी, सोयाबीन ,मिरची,गिलके पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन सडल्याच्या अवस्थेत दिसून येत आहे. मिरची,गिलके नष्ट झाली आहे.सात हजार शेतकºयांच्याशेतातील नुकसानीचे पंचनामेपहूर मंडळातील १७ गावात १३ हजार ४६६ हेक्टर शेतीचे क्षेत्र असून १० हजार १०५ शेतकरी आहेत.पैकी ७ हजार २३७ शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे केले आहेत. राहिलेले पंचनामेही पूर्ण होत आले आहे. साडेतीन हजार हेक्टरवर मका तर १८ हजार ५०० हेक्टर कपाशी लागवड झाली आहे. तलाठी, ग्रामसेवक, क्रुषी साहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसानबाधित क्षेत्रांचचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी सांगितले आहे.दरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरूण शेवाळे यांनी पाहणी करण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.