शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जळगाव शहरातील तांबापुरात झळकले आक्षेपार्ह फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 12:18 IST

शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.

ठळक मुद्देपोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती? तांबापुरात दंगलीचा इतिहास

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : : शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.फलकावर वादग्रस्त मजकूरशिरसोली नाकाकडून इच्छादेवी चौकाकडे जात असताना डाव्या बाजुच्या भींतीवर व श्यामा फायर संकुलाच्या समोर मेहरुणकडे जाणाºया रस्त्यावरील विजेच्या खांबावर हे वादग्रस्त फलक लावण्यात आले आहेत. सध्या राष्टÑीय व आंतरराष्टÑीयस्तरावर चर्चेचा विषय ठरलेल्या विषयाशी निगडीत हे फलक लावण्यात आले असून त्यावर काही छायाचित्रही आहेत. आक्षेपार्ह मजकूरामुळे दोन  गटात मोठा वाद होऊ शकतो असा हा मजकूर आहे. आधीच या विषयावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत.विना परवानगी लागले फलक?मिळालेल्या माहितीनुसार हे फलक मनपाची परवानगी न घेताच लावण्यात आले आहेत. या परिसरात राष्टÑपुरुषाचा पुतळा देखील आहे. या फलकावर भावना दुखावणारा मजकूर असल्याने या भागात केव्हाही ठिणगी पडू शकते, तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी वेळ येण्याआधीच मनपा व पोलीस प्रशासनाने हे फलक हटवावे व भींतीवरील वादग्रस्त मजकूर देखील काढावा, असा सूर उमटत आहे. 

सहा वर्षात दोन वेळा दंगल अन् संचारबंदीतांबापुरात दंगलीचा इतिहास आहे. जानेवारी २०१२ मध्ये दोन गटात मोठी दंगली उसळली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मकरसंक्रातीलाच दंगल उसळली होती. या दंगलीत तत्कालिन पोलीस निरीक्षक बी.के.कंजे, उपनिरीक्षक डी.डी.इंगोले या दोन अधिकाºयांसह काही कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लावण्यात आली होती. 

पोलीस चौकी असून  उपयोग काय?तांबापुरा हा परिसर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. जिल्ह्यातील संवेदनशील भागाच्या नकाशावर अग्रस्थानी असलेल्या या परिसरात आतापर्यंत अनेकदा दंगली उसळल्या आहेत. तसेच नेहमीच या भागात किरकोळ कारणावरुन मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे तांबापुरा व इच्छादेवी चौक या परिससरात स्वतंत्र पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहे. त्याशिवाय बीट मार्शल यांचा वावर या भागात सतत असतो. डोळ्यात तेल घालून या परिसरात यंत्रणेचे लक्ष असते. असे असतानाही वादग्रस्त फलक झळकूनही त्याची पोलिसांकडून तसेच मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले  जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा