शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जळगाव शहरातील तांबापुरात झळकले आक्षेपार्ह फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 12:18 IST

शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.

ठळक मुद्देपोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती? तांबापुरात दंगलीचा इतिहास

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : : शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मजकूर हा देश व राज्य पातळीवर गाजत असलेल्या विषयाशी संबंधित आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.फलकावर वादग्रस्त मजकूरशिरसोली नाकाकडून इच्छादेवी चौकाकडे जात असताना डाव्या बाजुच्या भींतीवर व श्यामा फायर संकुलाच्या समोर मेहरुणकडे जाणाºया रस्त्यावरील विजेच्या खांबावर हे वादग्रस्त फलक लावण्यात आले आहेत. सध्या राष्टÑीय व आंतरराष्टÑीयस्तरावर चर्चेचा विषय ठरलेल्या विषयाशी निगडीत हे फलक लावण्यात आले असून त्यावर काही छायाचित्रही आहेत. आक्षेपार्ह मजकूरामुळे दोन  गटात मोठा वाद होऊ शकतो असा हा मजकूर आहे. आधीच या विषयावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत.विना परवानगी लागले फलक?मिळालेल्या माहितीनुसार हे फलक मनपाची परवानगी न घेताच लावण्यात आले आहेत. या परिसरात राष्टÑपुरुषाचा पुतळा देखील आहे. या फलकावर भावना दुखावणारा मजकूर असल्याने या भागात केव्हाही ठिणगी पडू शकते, तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी वेळ येण्याआधीच मनपा व पोलीस प्रशासनाने हे फलक हटवावे व भींतीवरील वादग्रस्त मजकूर देखील काढावा, असा सूर उमटत आहे. 

सहा वर्षात दोन वेळा दंगल अन् संचारबंदीतांबापुरात दंगलीचा इतिहास आहे. जानेवारी २०१२ मध्ये दोन गटात मोठी दंगली उसळली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मकरसंक्रातीलाच दंगल उसळली होती. या दंगलीत तत्कालिन पोलीस निरीक्षक बी.के.कंजे, उपनिरीक्षक डी.डी.इंगोले या दोन अधिकाºयांसह काही कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लावण्यात आली होती. 

पोलीस चौकी असून  उपयोग काय?तांबापुरा हा परिसर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. जिल्ह्यातील संवेदनशील भागाच्या नकाशावर अग्रस्थानी असलेल्या या परिसरात आतापर्यंत अनेकदा दंगली उसळल्या आहेत. तसेच नेहमीच या भागात किरकोळ कारणावरुन मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे तांबापुरा व इच्छादेवी चौक या परिससरात स्वतंत्र पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहे. त्याशिवाय बीट मार्शल यांचा वावर या भागात सतत असतो. डोळ्यात तेल घालून या परिसरात यंत्रणेचे लक्ष असते. असे असतानाही वादग्रस्त फलक झळकूनही त्याची पोलिसांकडून तसेच मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले  जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा