शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:39 PM

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डाव

जळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरूप्रकाश आंबेडकर : मनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डावजळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारण