शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तहसीलदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:44 IST

लाभार्थी रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचित

जळगाव : वरणगाव येथील मजूर वस्तीतील लोकांची रेशनकार्डसाठीची माहिती तहसील कार्यालयाकडून अपलोड न झाल्याने या लोकांना रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचीत रहावे लागत आहे. त्याबाबत बुधवारी झालेल्या ‘दिशा’च्या बैठकीत तक्रार होताच जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ तहसीलदारांंना नोटीस बजवण्याचे आदेश दिले.बैठकीत पुरवठा विभागाकडील उज्ज्वला योजना व अन्य योजनांवर चर्चा सुरू असतानाच वरणगाव नगराध्यक्षांनी मजूर वस्तीतील लोकांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा मांडला.याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना विचारणा केली असता या कार्डधारकांची माहिती अपलोड झाली नव्हती.भुसावळ तहसीलशी बोलणे झाले आहे. त्यांच्याकडून माहिती अपलोड करून लवकरच लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले.त्यावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी भुसावळ तहसीलदारांचे काम असमाधानकारक असल्याचा शेरा मारत माहिती अपलोड करण्याचे काम प्रशासनाचेच असताना नागरिकांना फेºया का माराव्या लागत आहेत? असा सवाल करीत भुसावळ तहसीलदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.आमदार भोळेंनी केली अमृतच्या मक्तेदाराची तक्रारबैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी अमृत योजनेच्या मक्तेदराच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मक्तेदाराने उशीरा ऐन पावसाळ्यात काम सुरू केले. त्यामुळे खोदलेले रस्ते व पाऊस यामुळे चिखल होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. तसेच मक्तेदाराने रस्ते तातडीने दुरूस्त करणे अपेक्षित असताना ते केले नाहीत. रिंगरोडसारख्या रहदारीच्या रस्त्यावर स्लॅब कल्व्हर्टचे काम दोन महिन्यांपासून रखडले असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या निविदेतच्या अटी-शर्र्तींमध्येच ही तरतूद नाही, असे मत मांडले. त्यावर आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी यांना ‘तुमची कुणीतरी दिशाभूल केली आहे. निविदेत तशी अट आहे.’ असे सांगितले. मनपा आयुक्त उदय टेकाळे यांनीही त्यास दुजोरा देत आधी काँक्रीटीकरणाची अट होती ती बदलून डांबरीकरणाची केली असल्याचे सांगितले.हगणदरीमुक्तीवर जिल्हाधिकाºयांचेच प्रश्नचिन्हहगणदरीमुक्तीच्या विषयावर पदाधिकाºयांनी तक्रारी करताच, जिल्हाधिकाºयांनीही त्यास सहमती दर्शविली. रस्त्यावर जाणाºयांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक शौचालयांची साफसफाई होत नाही. अनेक ठिकाणी तर शौचालयापर्यंत जायला रस्ताच नाही, अशी परिस्थिती आहे. भुसावळची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्ण मोहीम हाती घ्या तरच हगणदरीमुक्ती शक्य होईल, असे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव