शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तहसीलदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:44 IST

लाभार्थी रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचित

जळगाव : वरणगाव येथील मजूर वस्तीतील लोकांची रेशनकार्डसाठीची माहिती तहसील कार्यालयाकडून अपलोड न झाल्याने या लोकांना रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचीत रहावे लागत आहे. त्याबाबत बुधवारी झालेल्या ‘दिशा’च्या बैठकीत तक्रार होताच जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ तहसीलदारांंना नोटीस बजवण्याचे आदेश दिले.बैठकीत पुरवठा विभागाकडील उज्ज्वला योजना व अन्य योजनांवर चर्चा सुरू असतानाच वरणगाव नगराध्यक्षांनी मजूर वस्तीतील लोकांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा मांडला.याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना विचारणा केली असता या कार्डधारकांची माहिती अपलोड झाली नव्हती.भुसावळ तहसीलशी बोलणे झाले आहे. त्यांच्याकडून माहिती अपलोड करून लवकरच लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले.त्यावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी भुसावळ तहसीलदारांचे काम असमाधानकारक असल्याचा शेरा मारत माहिती अपलोड करण्याचे काम प्रशासनाचेच असताना नागरिकांना फेºया का माराव्या लागत आहेत? असा सवाल करीत भुसावळ तहसीलदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.आमदार भोळेंनी केली अमृतच्या मक्तेदाराची तक्रारबैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी अमृत योजनेच्या मक्तेदराच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मक्तेदाराने उशीरा ऐन पावसाळ्यात काम सुरू केले. त्यामुळे खोदलेले रस्ते व पाऊस यामुळे चिखल होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. तसेच मक्तेदाराने रस्ते तातडीने दुरूस्त करणे अपेक्षित असताना ते केले नाहीत. रिंगरोडसारख्या रहदारीच्या रस्त्यावर स्लॅब कल्व्हर्टचे काम दोन महिन्यांपासून रखडले असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या निविदेतच्या अटी-शर्र्तींमध्येच ही तरतूद नाही, असे मत मांडले. त्यावर आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी यांना ‘तुमची कुणीतरी दिशाभूल केली आहे. निविदेत तशी अट आहे.’ असे सांगितले. मनपा आयुक्त उदय टेकाळे यांनीही त्यास दुजोरा देत आधी काँक्रीटीकरणाची अट होती ती बदलून डांबरीकरणाची केली असल्याचे सांगितले.हगणदरीमुक्तीवर जिल्हाधिकाºयांचेच प्रश्नचिन्हहगणदरीमुक्तीच्या विषयावर पदाधिकाºयांनी तक्रारी करताच, जिल्हाधिकाºयांनीही त्यास सहमती दर्शविली. रस्त्यावर जाणाºयांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक शौचालयांची साफसफाई होत नाही. अनेक ठिकाणी तर शौचालयापर्यंत जायला रस्ताच नाही, अशी परिस्थिती आहे. भुसावळची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्ण मोहीम हाती घ्या तरच हगणदरीमुक्ती शक्य होईल, असे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव