शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

यापुढे निवेदन नाही, ठोकशाहीनेच जाब विचारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:28 IST

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या ...

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या साईडपट्ट्या १५ दिवसांत न भरल्यास शिवसेनेकडून ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन न देता ठोकशाहीने जाब विचारण्यात येईल, असा इशारा गुरूवारी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना दिला. सिन्हा यांनी गुरूवारपासूनच खड्डे बुजण्यास सुरूवात करण्याचे आश्वासन दिले.राष्टÑीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीही या ठिकाणी अपघात झाला होता. तसेच भुसावळ ते धुळे दरम्यान महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब झाल्या असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. यापूर्वी एरंडोलजवळ अपघातात ९ जणांचा बळी गेला होता. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाºयांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा दोन अपघात झाल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपुरे, महानगराध्यक्ष मोहन तिवारी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी ‘नही’चे कार्यालय गाठले.‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना निवेदन न देता केवळ चर्चा केली. त्यात यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊनही उपयोग झालेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. महामार्गावर आणखी बळी गेल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी विचारणा केली. सिन्हा यांनी मक्तेदाराला मटेरियल मिळत नव्हते. त्यामुळे उशीर झाला. त्याला नोटीसही दिली.अखेर दुसरीकडून मटेरीयल उचलण्यास सांगितले आहे, असे सांगितले.खड्डे बुजण्याचे आश्वासनगुरूवारदुपारी २ वाजेपासूनच अजिंठा चौफुली ते इच्छादेवी दरम्यानचे खड्डे बुजायला सुरूवात करीत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, चेतन प्रभूदेसाई, राहुल नेतलेकर, लोकेश पाटील, मंगला बारी, राहुल पोतदार, जितू बारी, राजेंद्र पाटील, विजय चौधरी आदी उपस्थित होते.चार दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा ठोकून काढणारईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसांत तर धुळे ते भुसावळपर्यंतच्या महामार्गाच्या साईडपट्ट्या दुरूस्तीचे काम १५ दिवसांत करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत हे खड्डे न बुजल्यास तसेच १५ दिवसांत साईडपट्ट्यांचे दुरूस्तीचे काम न झाल्यास शिवसेना यापुढे निवेदन देणार नाही. ठोकशाहीने उत्तर देईल. ‘नही’च्या अधिकाºयांनी वाटल्यास पोलीस बंदोबस्त घ्यावा, असा दम भरण्यात आला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव