शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

यापुढे निवेदन नाही, ठोकशाहीनेच जाब विचारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:28 IST

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या ...

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या साईडपट्ट्या १५ दिवसांत न भरल्यास शिवसेनेकडून ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन न देता ठोकशाहीने जाब विचारण्यात येईल, असा इशारा गुरूवारी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना दिला. सिन्हा यांनी गुरूवारपासूनच खड्डे बुजण्यास सुरूवात करण्याचे आश्वासन दिले.राष्टÑीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीही या ठिकाणी अपघात झाला होता. तसेच भुसावळ ते धुळे दरम्यान महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब झाल्या असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. यापूर्वी एरंडोलजवळ अपघातात ९ जणांचा बळी गेला होता. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाºयांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा दोन अपघात झाल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपुरे, महानगराध्यक्ष मोहन तिवारी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी ‘नही’चे कार्यालय गाठले.‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना निवेदन न देता केवळ चर्चा केली. त्यात यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊनही उपयोग झालेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. महामार्गावर आणखी बळी गेल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी विचारणा केली. सिन्हा यांनी मक्तेदाराला मटेरियल मिळत नव्हते. त्यामुळे उशीर झाला. त्याला नोटीसही दिली.अखेर दुसरीकडून मटेरीयल उचलण्यास सांगितले आहे, असे सांगितले.खड्डे बुजण्याचे आश्वासनगुरूवारदुपारी २ वाजेपासूनच अजिंठा चौफुली ते इच्छादेवी दरम्यानचे खड्डे बुजायला सुरूवात करीत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, चेतन प्रभूदेसाई, राहुल नेतलेकर, लोकेश पाटील, मंगला बारी, राहुल पोतदार, जितू बारी, राजेंद्र पाटील, विजय चौधरी आदी उपस्थित होते.चार दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा ठोकून काढणारईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसांत तर धुळे ते भुसावळपर्यंतच्या महामार्गाच्या साईडपट्ट्या दुरूस्तीचे काम १५ दिवसांत करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत हे खड्डे न बुजल्यास तसेच १५ दिवसांत साईडपट्ट्यांचे दुरूस्तीचे काम न झाल्यास शिवसेना यापुढे निवेदन देणार नाही. ठोकशाहीने उत्तर देईल. ‘नही’च्या अधिकाºयांनी वाटल्यास पोलीस बंदोबस्त घ्यावा, असा दम भरण्यात आला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव