शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गरज आहे ‘पालक-पाल्य’ संवादाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:34 PM

सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ ...

सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ तासही घालवतोय. वेळ नाही ‘म्हणत इतर गोष्टींवर खूपसा वेळही खर्ची करतोय. पण घरीदारी ‘संवाद’ साधायचंच विसरत चाललोय. विज्ञानाने जग खूप खूप जवळ आलेय. पण माणसा-माणसातील संवाद कमी होत चाललाय. आणि ‘संवाद’ हा तर मानवतेचा मुख्य आधार आहे. या आधारवडाला प्रेम, सहकार्य, त्याग इत्यादी भावनांच्या पारंब्या फुटून मानवता विस्तारत गेली, फुलत आणि फळतही गेली. याच आधारवडाच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तारत गेले. परंतु आज त्याच विज्ञानानेच आता भाषेची गरज खुंटवीत आणली आहे. घरी दूरदर्शन,मोबाईल वा इतर स्वयंचलित यंत्रांमुळे एका माणसाला दुसऱ्या माणसाशी बोलण्याची गरज कमी झालीयं, सहकार्याची भावना झपाट्याने ओसरत आहे. त्याच बरोबर प्रेम, करूणा, त्याग, सेवावृत्ती, संघप्रवृत्ती वगैरे मानवतेच्या खुणाही (हळूहळू) नष्ट होत चालल्याय. घराघरातील मुलांच्या अंगी अनेक सुप्तगुणांचा खरच खजिना असतो. त्याचप्रमाणे काही अवगुण असतात. काही कमतरताही असतात. पण या सर्वांची उकल केव्हा होते हो ? जेव्हा आपण मुलांशी संवाद साधतो तेव्हा ! अहो, मुलांना बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. त्यांना आपल्या भावना, आपले विचार, आपल्या आठवणी सांगावच्या असतात. प्रश्न विचारत उत्तरं हवी असतात. तेव्हा मुलांशी बोला, संवाद साधा, त्यांचे प्रश्न (त्यांच्या वयोगटानुसार) समजून घ्या. त्यांना न कंटाळता उत्तर द्या. त्यांच्यासाठी वेळ द्या.. असे वाटते.- चंद्रकांत भंडारी

टॅग्स :Jalgaonजळगाव