शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कठीणच म्हणायचे, कला शाखेला नाहीत प्रवेश; विद्यार्थी संख्या ५० टक्के कमी करण्याचे साकडे

By अमित महाबळ | Updated: June 25, 2023 16:26 IST

आजतागायत कोणत्याच कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या पूर्ण झालेली नाही.

जळगाव : अकरावी कला शाखेचे प्रवेश सुरू आहेत; पण पुरेसे विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे कला शाखा जिवंत ठेवण्यासह शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत म्हणून शासनाने तातडीने कला शाखेची विद्यार्थी संख्येची अट ५० टक्केपर्यंत शिथिल करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने (जुक्टो) करण्यात आली आहे.

संघटनेने म्हटले आहे, की जेमतेम पास झालेले विद्यार्थीही विज्ञान शाखेत प्रवेश घेत असल्याने कला शाखेकडे बघण्याची विद्यार्थी आणि पालक वर्गाची नकारात्मक भूमिका या शाखेच्या मुळावर उठली आहे. ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयातदेखील कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नाहीत. आजतागायत कोणत्याच कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या पूर्ण झालेली नाही.

क्षमता विचारात न घेता प्रवेश...

स्वयंअर्थसाहाय्य तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालये जेमतेम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता सरसकट विज्ञान शाखेत प्रवेश देत असल्याने कला शाखेला घरघर लागलेली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी वाणिज्य शाखेबाबत अशीच अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी शासनाने विद्यार्थी संख्येची अट शिथिल केली होती.

आताही शासनाने विनाविलंब कला शाखेची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून ही विद्याशाखा जिवंत ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा. सुनील सोनार, प्रा. डॉ. अतुल इंगळे, उपाध्यक्ष प्रा. गजानन वंजारी, मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा. डी. डी. पाटील, प्रा. शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, महानगराध्यक्ष प्रा. राहुल वराडे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर यांनी केली आहे.

ग्रामीण, शहरीमधील एवढे विद्यार्थी कमी करा

वरिष्ठ महाविद्यालयांना संलग्न असलेल्या शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या १२०वरून ६० आणि ग्रामीण माध्यमिकला संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांत ८०वरून ४० करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा येत्या दिवसांत विद्यार्थी संख्येअभावी शिक्षकवर्ग अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षक आपली नोकरी कायमची घालवून बसतील याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

अकरावीला २४,३२० जागा

जळगाव जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून अकरावीची एकूण प्रवेशक्षमता ४९,०८० आहे. यामध्ये कला शाखेची मंजूर विद्यार्थी संख्या २४,३२० आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीJalgaonजळगाव