शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

बालशौर्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश भिल गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:30 IST

बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे.

ठळक मुद्देनीलेशची नेपाळ यात्राभंगार जमा करायचा नीलेशबालशौर्य पुरस्काराबद्दल झाला होता सत्कार

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे. बºहाणपूर (म.प्र.) पोलीस आश्रमाचे आचार्य आणि नीलेशची आई यांनी त्याला सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. उशिरा रात्री ते मुक्ताईनगरकडे निघाले. यापूवीर्ही तो घरून पळाला होता. तेव्हाही तो गोरखपूर येथेच मुलांच्या आश्रयालयात आढळला होता.नीलेश भिल पहिल्यांदा २०१७ मध्ये घरातून पळून गेला होता. तो परतल्यानंतर त्यास शैक्षणिक पुनर्वसनासाठी या आश्रमात दाखल करण्यात आले होते. तेथूनही तो बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने दिलेल्या खबरीवरून बºहाणपूर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. बºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रम येथून पळ काढल्यानंतर सहा महिन्यांनी त्याने मोबाइलवर संभाषण करून आईसोबत संपर्क साधला. त्या आधारावर त्याला विश्वासात घेऊन त्याचा पत्ता व संपर्क मिळवून मध्य प्रदेशातील बºहाणपूर (शिकारपुरा) पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी, श्रीराम गोकुळ आश्रमाचे प्रधान प्राचार्य सुरेश चौधरी आणि नीलेशची आई सुंदराबाई हे सोमवारी सकाळी ११ वाजता गोरखपूर पोहोचले. दुपारी बाराला पुरानी फुल मंडी परिसरात भंगार विक्रेत्याच्या दुकानात तो काम करताना आढळला.आश्रमातून पळालेला नीलेश गोरखपूर येथे पोहोचला. तेथे रेल्वे प्लॅटफार्मवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जमा करून भंगारात विकू लागला. आठवडाभरात त्याची मैत्री असेच भंगार जमा करणाऱ्या अजय नावाच्या मुलासोबत झाली. कधी भंगार विक्रेत्याच्या दुकानात तर कधी रेल्वेलाईन शेजारील अजयच्या झोपडीत तो झोपायचा.भंगार जमा करणाºया मुलांसोबत त्याची मैत्री जमली. गोरखपूर येथून जवळच नेपाळ हद्द असल्याने तो आपल्या सोबत्यांसोबत नेपाळ फिरून आला आणि तेथे कपडेही खरेदी केले, अशी माहिती खुद्द नीलेशने ‘लोकमत’सोबत बोलताना दिली.दरम्यान, रात्री उशिरा शिकरपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवन देशमुख, सुनील सकवार आश्रमाचे प्रधानाचार्य सुरेश चौधरी, नीलेश व त्याची आई सुंदराबाई हे रेल्वेने घराकडे परत येत आहेत.बालशौर्य पुरस्कारनीलेश भिल ३० आॅगस्ट २०१५ रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरावर बॅकवॉटरवरील घाटावर बुडणाºया ११ वर्षीय मुलाचे प्राण वाचविल्याची दखल घेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालशौर्य २०१५ या पुरस्काराने त्याला सन्मानित केले होते. २६ जानेवारी २१०६ रोजी त्याला दिल्ली येथे समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर