शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नेते, संजय राऊतांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 22:20 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.

जळगाव - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे टिकेल, असे म्हटले आहे. अंतर्गत धुसफूस असली तरीही हे सरकार 5 वर्षे पूर्ण करणार, असे राऊत यांनी म्हटले. जळगाव दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. मात्र, येथेच पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही राऊत यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. या भेटीनंतर दोनच दिवसांत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशातील आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींमुळे गेल्या 7 वर्षात भाजपला राष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळालंय, असेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.  

सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र येऊन पाच वर्ष पूर्ण करण्याची कमिटमेंट केलेली आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगवेगळी असून अंतर्गत धुसफूस असली तरी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकारमधील काँग्रेसच्या भूमिकेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचं असतं, तसेच प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री त्यांचा असावा अशी महत्त्वाकांक्षा असते, असेही राऊत यांनी म्हटले. 

सरकार 5 वर्षे टिकणार - शरद पवार

"आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचंही कौतुक करत तो विश्वासाचा पक्ष असल्याचं म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील आठवण काढली. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी सरकारबद्दल विश्वास व्यक्त केला. 

पाटील-राऊत यांची जुगलबंदी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं तर आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. मात्र, त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची, अशा शब्दात उत्तर दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी आहे, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही असा जोरदार टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 

नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र, वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो. 

टॅग्स :JalgaonजळगावSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार