सैनिकी वारसा लाभलेले नांद्रा गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 16:43 IST2017-08-19T16:42:00+5:302017-08-19T16:43:28+5:30
78 सैनिक करताय भारतमातेची सेवा

सैनिकी वारसा लाभलेले नांद्रा गाव
आत्माराम गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील नांद्रा हे 3 हजार 500 लोकसंख्येचे गाव असुन गावातील 78 सैनिक देशसेवेसाठी कार्यरत आहेत. तर 30 माजी सैनिक गावात आहेत. त्यामुळे सैनिकी वारसा लाभलेले नांद्रा या गावाने जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे.
येथील स्वातत्र्य सेनानी लोटन सोनजी सुर्यवंशी , कपुरचंद मुथा, माधवराव लाल सुर्यवंशी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातही भाग घेवुन तुरुंगवासही भोगला आहे. तेव्हापासून ते आतार्पयत देशभक्तीची परंपरा कायम आहे. येथील जयराम तावडे हे सैन्यात ब्रिग्रेडिअरपदावर कार्यरत होते. तर नाना तावडे हे सुभेदार होते. आजही विविध पदांवर येथील तरुण सैन्य दलात देशसेवा करीत आहेत. नांद्रा गावातील जवळपास प्रत्येक घरातील एक तरुण सैन्यात कार्यरत आहे.
गावाचा कारभार
उच्चशिक्षीत महिलेच्या हाती
नांद्रा येथे हरी सोनजी पाटील यांची एक हाती सत्ता होती.त्यांच्या काळात गावातील तंटे गावातच मिटत होते.त्यामुळे गावाने कधीही पोलिस दादा पाहिलेलाच नव्हता.तोच वारसा भाऊराव पाटील यांनी सरपंचपदावर असतांना चालवला. गोपीचंद बाविस्कर , बापुराव बाविस्कर , भिमराव तावडे, सुलाबाई सुर्यवंशी , सुभाष तावडे या माजी सरपंचांनी आपापल्या परिने गावाला विकासाची दिशा दिली. आता जळगाव शासकीय आय.टि.आय.मध्ये शिक्षक असलेले विश्वंभर सुर्यवंशी यांच्या प}ी हेमलता सुर्यवंशी या उच्चविद्याविभुषित महिला गावाचा कारभार पाहत आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे.
मंदिरावर होतो गावाचा न्याय निवाडा
नांद्रा येथील ग्राम दैवत महादेव मंदिर हे गावाचे याय मंदिर म्हणुनच संबोधले जाते. गावातील वाद हे याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत मिटविले जातात. येथे झालेला न्याय निवाडा हा सर्वांनाच मान्य असतो. सन 2015 पासुन ते आज पयर्ंत कुठलाही वाद हा पोलिसात गेला नाही व एकही केस दाखल झालेली नाही.त्यामुळे नांद्रा गावात शांतता व जातीय सलोखा कायम आहे, असे विश्वंभर सुर्यवंशी यांनी सांगितले.