शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

बेलगंगेच्या सातबारा उताऱ्यावर ‘अंबाजी’चे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 6:36 PM

हरकती फेटाळल्या : चाळीसगावव तालुक्याच्या आशा पल्लवित

चाळीसगाव, जि.जळगाव : बेलगंगा साखर कारखान्याच्या सातबारा उताºयावर अखेर ‘अंबाजी शुगर इंडस्ट्रीज’चे नाव लागले असून येत्या हंगामात कारखान्यातून गाळप सुरु व्हावे, अशा अपेक्षा तालुकाभरातून पल्लवित झाल्या आहेत. मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील यांना मंगळवारी महसूल विभागाने पत्र दिले असून सर्व हरकती फेटाळून लावल्या आहेत. ही प्रक्रिया सहा महिने चालली.जिल्हा मध्यवर्ती बँकेची मालकी असणारा बेलगंगा साखर कारखाना अंबाजी ग्रुपने लिलावात ४० कोटी रुपयांना विकत घेतला. यासाठी भूमीपुत्रांची साखळी जोडून रक्कम संकलित केली गेली. ११ जानेवारी रोजी हस्तांतर प्रक्रियादेखील पूर्ण झाली. मात्र विक्री प्रक्रियेवर हरकती घेतल्याने सातबाºयावर अंबाजीचे नाव लागले नव्हते. मंगळवारी महसूल विभागाने सातबाºयावर नाव लागल्याचे पत्र दिले. यानंतर अंबाजीच्या नावाचा आॅनलाईन सातबारा उताराही काढण्यात आला.हरकती फेटाळल्या, आशा पल्लवितबेलगंगा विक्री प्रक्रियेवर एकूण सात हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींवर दोन ते अडीच महिने तहसीलदारांसमोर सुनावणी देखील झाली. या सर्व हरकती फेटाळण्यात आल्याने बेलगंगेच्या उताºयावर ‘अंबाजी’चे नाव लावण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सहा महिने गेले.चाळीसगाव तालुक्यात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर ऊस उभा आहे. गेल्या महिन्यात कारखान्यात रोल आणि गव्हाणीचे पूजन झाले. ऊसतोड मजुरांशी करारही करण्यात आला असून, त्यांना चार कोटी रुपये वाटण्यात आले आहे. कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत आहे. त्यामुळे येत्या हंगामात कारखान्यातून गाळप व्हावे. अशा अपेक्षा व्यक्त होत आहे.२००९ मध्ये कारखान्याचे गाळप सुरू असतानाच त्याला कुलूप लागले. मध्यंतरीच्या १० वर्षात तालुक्याचे राजकारण कारखान्याभोवती फिरत राहिले. निवडणुकींचे जाहीरनामे असो की भाषणे बेलगंगेचा नुसता जप झाला. पदयात्राही निघाल्या. मात्र कारखान्याचे कुलूप उघडले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी भूमीपुत्रांना एकत्र करुन लोकसहभागातून कारखाना विकत घेतला. यामुळे तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर मोठी कलाटणी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहे. उंबरठ्यावर आलेल्या लोकसभा आणि पुढील वर्षी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत ‘बेलगंगे’च्या नावाने ‘चांगभलं’ होणार असल्याचे सूरदेखील आत्तापासूनच उमटू लागले आहे.बेलगंगा ते अंबाजी१९७८ मध्ये पहिल्यांदा बेलगंगा कारखान्यातील यंत्रे फिरली. तालुक्यात गोड अर्थकारणासह उन्नत्तीचा पाया रचला गेला. गेल्या ४० वर्षाच्या कालखंडात कारखान्यात अनेक स्थित्यंतरे घडून आली. एकेकाळी चाळीसगाव तालुक्यासाठी ‘कुबेर’ ठरलेला हा कारखाना दहा वर्षे बंदही राहिला. येत्या गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज होत असतांना चाळीस वर्षाच्या प्रवासाला उजाळा मिळणार आहे.नाव असेल ‘बेलगंगा’चबेलगंगा या नावाशी तालुक्याचे भावनिक नाते जुळले आहे. ‘बेलगंगा’ ही एक अमीट ओळख असून कारखाना विकत घेतला असला तरी त्याचे नाव बदलणार नाही. यापुढेही ‘बेलगंगा’ हे नाव कायम राहणार आहे.- चित्रसेन पाटीलमाजी चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव