शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

४१४ टवाळखोरांवर ‘निर्भया’चा दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:50 IST

सुनील पाटील । जळगाव : शाळा, महाविद्यालय व उद्यानांमध्ये महिला, विद्यार्थिनी व तरुणींची छेडखानी करणाऱ्या शहरातील ४१४ टवाळखोरांवर पोलिसांच्या ...

सुनील पाटील ।जळगाव : शाळा, महाविद्यालय व उद्यानांमध्ये महिला, विद्यार्थिनी व तरुणींची छेडखानी करणाऱ्या शहरातील ४१४ टवाळखोरांवर पोलिसांच्या ‘निर्भया’ पथकाने कारवाईची दंडूका उगारला असून काही प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, महिला व तरुणींच्या दिमतीला सरकारने पोलीस दलाच्या माध्यमातून ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली आहे. हे पथक शाळा, महाविद्यालय असो कि उद्याने व इतर गर्दीच्या ठिकाणी छेडखानी करणाºया टवाळखोरांवर ‘वॉच ठेवून असते.जळगाव शहरात निर्भयाची स्थापना केल्यानंतर यंदापासून भुसावळ व फैजपूर या भागातही पोलीस दलातर्फे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम असो विकृतीतून छेडखानी या घटनांना आळा बसावा यासाठीच निर्भया पथक जिल्ह्यात काम करीत आहेत.सामाजिक बांधिलकीचीही जाणनिर्भया पथकाने टवाळखोरांवर कारवाई करताना आपल्या पाल्याचे कर्तृत्व काय आहे, याची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या आई, वडीलांनाच घटनास्थळावर पाचारण केले आहे. शालेय जीवन व भविष्य पाहता गुन्हे दाखल न करता प्रतिबंधात्मक कारवाई, समज, चारचौघात प्रसाद व मुलींची माफी मागून त्यांना सोडून देण्यात आले आहे. एकंदरीत या पथकामुळे टवाळखोरांवर निश्चित आळा बसला असून यात सातत्य ठेवणे अपेक्षित असल्याचे मत महिला वकील मंजुळा मुंदडा यांनी व्यक्त केले आहे.नियंत्रण कक्षातून मिळू शकते तात्काळ मदतशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह तरुणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया व दामिनी पथक तयार करण्यात आले असून महिला व मुलींना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष ०२५७-२२२३३३३, १००, मोबाइल क्र.९८६०५०१०९१ व व्हाट्सअ‍ॅप क्रमांक ९४२२२१०७०१ नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत विशेष म्हणजे ही सुविधा २४ तास आहे. महिला पोलिसांच्या निर्भया पथकात महिला हवालदार मंजुळा तिवारी, उषा सोनवणे, सहायक फौजदार अभिमन्यू इंगळे व अनिल तायडे यांचा समावेश असून हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत तत्पर असते.का आणि केव्हा झाली ‘निर्भया’ची स्थापना१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील भौतिकोपचार शिकणाºया विद्यार्थिनीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व नंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीचे उपचार करण्यासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून सिंगापूरला हलविण्यात आले होते. तेथे रुग्णालयात १३ दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेतील पीडितेला निर्भया हे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून महिला, तरुणी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात निर्भया याच नावाने स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले. महाराष्टÑात एकाचवेळी जिल्हास्तरावर या पथकाची स्थापना करुन स्वतंत्र ‘निर्भया’ वाहन या पथकाला देण्यात आले.छेडखानी किंवा आक्षेपार्ह प्रकार घडत असेल तर महिला, विद्यार्थिनी व तरुणींनी बिनधास्तपणे ‘निर्भया’ पथकाशी संपर्क साधावा. जनतेने देखील आपल्या डोळ्यासमोर प्रकार घडत असेल तर सजग राहून पोलिसांना माहिती द्यावी. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत निर्भया पथक संपूर्ण शहरात फिरत असते. घटनेची माहिती मिळताच पाच ते दहा मिनिटात आम्ही घटनास्थळावर पोहचतो. आठ वर्षात ४१४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे.-उषा सोनवणे, निर्भया पथक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव