जळगाव : जळगाव ते औरंगाबाद महामार्गावरील दुरुस्तीच्या कामामध्ये फर्दापूर ते जळगावदरम्यान चौपदरीकरणाच्या ठिकाणी पुलाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, या कामाच्या चौकशीबाबत आरटीआय कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता जिल्हाधिकाऱ्यांसह पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी `नही`ला चौकशीचे पत्र दिले होते. त्यानुसार, महामार्ग प्राधिकरणाचे जालना विभागाचे अधिकारी १९ जानेवारी रोजी या कामाची पाहणी करणार आहेत.
इन्फो :
`नही`चे अधिकारी आज पाहणी करणार
गुप्ता यांनी प्रथम जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, राऊत यांनी लागलीच`नही`ला पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले होते. तसेच यावेळी गुप्ता यांनी पंतप्रधान कार्यालयापासून विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जालना विभागाचे कार्यकारी अभियंता ओंकार चांडक व इतर अधिकारी मंगळवारी जळगावला येऊन कामाची पाहणी करणार आहेत.
इन्फो :
जळगाव तेे औरंगाबाद या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याबाबत तक्रार आली आहे. मंगळवारी जळगावला येऊन कामाची पाहणी करण्यात येणार आहे.
ओंकार चांडक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण