शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बालगंधर्वांनी गिरविले जळगावातून संगीताचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:02 IST

बळीराम पेठेत मामाकडे राहून रचला संगीत, नाट्य क्षेत्राचा पाया

जळगाव : केवळ महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशभरातील रसिकांना आपल्या स्त्री भूमिकेने भूरळ घालणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा प्राथमिक शिक्षणासह संगीताचा पाया रचला गेला तो जळगावातील बळीरामपेठेत, असे कोणी सांगितले तर त्यावर राज्यातील नाट्य रसिकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य असून शहरासाठी भूषणावह बाब असलेल्या या क्षणांचे साक्षीदार आहेत ते म्हाळस कुटुंबीय. बालगंधर्व यांचे मामा आबाजी राघो म्हाळस यांनीच बालगंधर्व यांना जळगावात आणले व त्यांना येथे शिकविले. त्याबद्दलच्या आठवणी आजही घरात ताज्या असल्याची माहिती आबाजी म्हाळस यांचे पणतू हेमंत म्हाळस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बालगंधर्व यांचा २६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचे जळगावशी असलेले नाते, ऋणानुबंध यांचा आढावा घेतला असता त्यांच्या अनेक आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे जळगावात असलेले वास्तव्य व त्यांनी येथे गिरविलेले शालेय शिक्षण व संगीताचे धडे.संगीताचे बाळकडू शनिपेठेतूनजळगावात इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेत असतानाच वयाच्या आठव्या वर्षापासूनच बालगंधर्व यांनी संगीताचे धडे घेतले. यासाठी त्यांनी शनिपेठेतील रहिवासी महेबूब खाँ यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. येथे रचल्या गेलेल्या या पायावरच पुढे बालगंधर्व यांनी पुणे गाठले व तेथे संगीत, नाट्य क्षेत्रात आपल्या अभिनयाला सुरुवात केली. मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटविणाºया या महान कलावंताच्या कलेचा पाया जळगावात रचला गेला व ते आमच्या कुटुंबात राहिले हीच मोठी भूषणावह बाब आहे, असे हेमंत म्हाळस म्हणाले.बालगंधर्वांची मौंजही जळगावातबालपणीच बालगंधर्व यांना जळगावात आणल्याने त्यांची मौंजदेखील त्यांच्या मूळगावी न होता त्यांच्या मामांनी ती जळगावातच केली. त्यामुळे जीवनातील महत्त्वाच्या या विधीसह प्राथमिक शिक्षण,संगीताची सुरुवात जळगावातूनहोणे हा शहरासाठी मोठा ठेवा मानला जातो.मामांकडे वास्तव्यबालगंधर्व बराच काळ बळीराम पेठेतील आपले मामा आबाजी राघो म्हाळस यांच्याकडे होते. त्यांच्या आठवणी आजही म्हाळस कुटुंबिय सांगतात. १९२९ साली बालगंधर्व यांनी त्यांचे मामेभाऊ डॉ. सदाशिवराव म्हाळस यांना लिहिलेले पत्र आजही म्हाळस कुटुंबियांनी जपून ठेवले आहे. या पत्रात आबाजींच्या नावाने जळगावात संगीत भवन उभे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. यासह विविध छायाचित्रेही या कुटुंबियांकडे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव