शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्वांनी गिरविले जळगावातून संगीताचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:02 IST

बळीराम पेठेत मामाकडे राहून रचला संगीत, नाट्य क्षेत्राचा पाया

जळगाव : केवळ महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशभरातील रसिकांना आपल्या स्त्री भूमिकेने भूरळ घालणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा प्राथमिक शिक्षणासह संगीताचा पाया रचला गेला तो जळगावातील बळीरामपेठेत, असे कोणी सांगितले तर त्यावर राज्यातील नाट्य रसिकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य असून शहरासाठी भूषणावह बाब असलेल्या या क्षणांचे साक्षीदार आहेत ते म्हाळस कुटुंबीय. बालगंधर्व यांचे मामा आबाजी राघो म्हाळस यांनीच बालगंधर्व यांना जळगावात आणले व त्यांना येथे शिकविले. त्याबद्दलच्या आठवणी आजही घरात ताज्या असल्याची माहिती आबाजी म्हाळस यांचे पणतू हेमंत म्हाळस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बालगंधर्व यांचा २६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचे जळगावशी असलेले नाते, ऋणानुबंध यांचा आढावा घेतला असता त्यांच्या अनेक आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे जळगावात असलेले वास्तव्य व त्यांनी येथे गिरविलेले शालेय शिक्षण व संगीताचे धडे.संगीताचे बाळकडू शनिपेठेतूनजळगावात इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेत असतानाच वयाच्या आठव्या वर्षापासूनच बालगंधर्व यांनी संगीताचे धडे घेतले. यासाठी त्यांनी शनिपेठेतील रहिवासी महेबूब खाँ यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. येथे रचल्या गेलेल्या या पायावरच पुढे बालगंधर्व यांनी पुणे गाठले व तेथे संगीत, नाट्य क्षेत्रात आपल्या अभिनयाला सुरुवात केली. मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटविणाºया या महान कलावंताच्या कलेचा पाया जळगावात रचला गेला व ते आमच्या कुटुंबात राहिले हीच मोठी भूषणावह बाब आहे, असे हेमंत म्हाळस म्हणाले.बालगंधर्वांची मौंजही जळगावातबालपणीच बालगंधर्व यांना जळगावात आणल्याने त्यांची मौंजदेखील त्यांच्या मूळगावी न होता त्यांच्या मामांनी ती जळगावातच केली. त्यामुळे जीवनातील महत्त्वाच्या या विधीसह प्राथमिक शिक्षण,संगीताची सुरुवात जळगावातूनहोणे हा शहरासाठी मोठा ठेवा मानला जातो.मामांकडे वास्तव्यबालगंधर्व बराच काळ बळीराम पेठेतील आपले मामा आबाजी राघो म्हाळस यांच्याकडे होते. त्यांच्या आठवणी आजही म्हाळस कुटुंबिय सांगतात. १९२९ साली बालगंधर्व यांनी त्यांचे मामेभाऊ डॉ. सदाशिवराव म्हाळस यांना लिहिलेले पत्र आजही म्हाळस कुटुंबियांनी जपून ठेवले आहे. या पत्रात आबाजींच्या नावाने जळगावात संगीत भवन उभे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. यासह विविध छायाचित्रेही या कुटुंबियांकडे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव